शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
3
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
4
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
5
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
6
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
7
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
8
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
9
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
10
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
11
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?
12
IND W vs PAK W : पुरुष असो वा महिला, नो हँडशेक फॉर्म्युला! हरमनप्रीतनं पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ
13
‘’२०२७ चा वर्ल्डकप खेळायला मिळाला तर…’’, बोलता बोलता रोहित झाला होता भावूक, तो व्हिडीओ होतोय व्हायरल  
14
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
15
गुजरातमधून आणलेला सिंह तामिळनाडूच्या प्राणीसंग्रहालयातून पळाला; स्थानिकांमध्ये घबराट...
16
EMI थकवला तर फोन, लॅपटॉप होणार लॉक! RBI चा नवा नियम; कर्ज वसुलीसाठी बँकांना मिळणार 'हे' अधिकार
17
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
18
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
19
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
20
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा

अंजनगावात अस्वच्छतेचा कहर

By admin | Updated: October 27, 2014 22:29 IST

स्वच्छ शहर व सुंदर शहराची संकल्पना अंजनगाव नगरपालिकेने धुळीस मिळविली असून शहरात ठिकठिकाणी घाणीचे सम्राज्य निर्माण झाले आहे. स्थानिक नगरपरिषदेचे याकडे दुर्लक्ष होत

अंजनगाव सुर्जी : स्वच्छ शहर व सुंदर शहराची संकल्पना अंजनगाव नगरपालिकेने धुळीस मिळविली असून शहरात ठिकठिकाणी घाणीचे सम्राज्य निर्माण झाले आहे. स्थानिक नगरपरिषदेचे याकडे दुर्लक्ष होत शहरात सर्वत्र घाणीचे सम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे डेंग्यूसदृश आजाराचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. शहरातील ३०० ते ४०० रुग्ण सद्यस्थितीत परतवाडा-आकोट-अकोला-अमरावती येथील रुग्णालयांत दाखल आहेत. ऐन दिवाळीच्या दिवशी सुध्दा अनेक कुटुंबांना खासगी व शासकीय रूग्णालयाच्या खेपा कराव्या लागल्या. विचित्र तापाने बाधित रूग्णाच्या शरीरातील पेशींचे प्रमाण अकस्मात कमी होते आणि चक्कर येणे, डोकेदुखी सुरू होते. परंतु या आजाराचे योग्य निदान करणारी पुरेशी आरोग्य यंत्रणा नगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे उपलब्ध नाही. प्रतिबंधात्मक उपाययोजना देखील आरोग्य विभागाजवळ उपलब्ध नाहीत. त्यामुळे साथरोगांचा फैलाव वेगाने होत आहे. योग्य व्यवस्थेअभावी रुग्णांना बाहेरगावी पाठवावे लागते. या जीवघेण्या आजारामुळे आतापर्यंत शहरात तीन रुग्ण दगावले आहेत. याची रितसर लेखी तक्रारसुध्दा आरोग्य विभागाकडे करण्यात आली आहे. परंतु नगर परिषदेच्या आरोग्य विभागाने केवळ तात्पुरती फवारणी करुन वेळ मारुन नेली. स्वच्छतेचा प्रश्न ही शहरातील मुख्य समस्या असून नगर पालीका प्रशासन हे सोडविण्यात अपयशी ठरली आहे. पालीका प्रशासनाने शहराची लवकरात लवकर साफसफाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शहरवासीयांनी प्रशासनाला दिला आहे. साथरोगांना आळा घालण्याची सर्वस्वी जबाबदारी नगर परिषदेच्या आरोग्य विभागाचीच असून महापालिकेने शहरात युध्दस्तरावर स्वच्छता मोहीम राबविल्यास साथरोगांवर आळा घालता येऊ शकते, असे सामान्य नागरिकांचे म्हणणे आहे. दिवसेंदिवस नगरपरिषदेच्या विरोधात नागरिकांमध्ये रोष बळावू लागला आहे.