शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

एसबीआयच्या आणखी एका खातेदाराची रक्कम चोरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 23:36 IST

सायबर गुन्हेगारांनी आणखी एका एसबीआय खात्यातून १ लाख ६० हजारांची रोकड काढल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

ठळक मुद्देकोतवालीत तक्रार : आतापर्यंतच्या नऊ घटनांमध्ये दहा लाखांची रोकड लंपास

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सायबर गुन्हेगारांनी आणखी एका एसबीआय खात्यातून १ लाख ६० हजारांची रोकड काढल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील राजू बनारसे या खातेदाराने कोतवाली पोलिसांत मंगळवारी तक्रार नोंदविली. शहरात आतापर्यंत नऊ घटनांमध्ये तब्बल दहा लाख रुपये परस्पर काढण्यात आल्याचे उघड झाले आहेत.राजू बनारसे यांच्या मोबाइलवर मंगळवारी सकाळी चार संदेश प्राप्त झाले. एसबीआयच्या खात्यातून १ लाख ६० हजार काढण्यात आल्याचे त्यांना समजले. त्यांनी तत्काळ कॅम्प स्थित एसबीआय शाखेत चौकशी केली असता, त्यांच्या खात्यातील ४० हजारांची रक्कम चारवेळा हरियाणाच्या गुडगाव येथून काढण्यात आल्याचे समजले. याबाबत बॅक मॅनेजरने कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी सांगितले. त्यानुसार त्यांनी कोतवालीत तक्रार दाखल केली. याप्रकरणात पोलिसांनी अज्ञाताविरुध्द भादंविच्या कलम ४२० अन्वये गुन्हा नोंदविला. बनारसे यांच्यासोबत घडलेला प्रकार आतापर्यंत जिल्ह्यातील नऊ जणांसोबत घडला आहे. याविषयी सायबर सेलकडून कसून चौकशी केली जात आहे.सायबर सेलकडून जिल्ह्यातील ६ एटीएमचे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरु असून अद्यापपर्यंत पोलीस यंत्रणा निष्कर्षापर्यंत पोहोचली नाही.यासंबधाने सायबर सेलचे पथक हरियाणा जाणार असल्याची माहिती पोलिस सुत्रांनी दिली.बनावट खात्यांचा वापरबँक खातेदारांच्या खात्यातून विड्रॉल झालेली रक्कम ही महाराष्ट्राबाहेर हरियाणातील गुडगाव या शहरातून काढण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. त्या अनुषंगाने सायबर सेलने माहिती काढली असता, रक्कम विड्रॉल करणाºया इसमाचे बँक खाते फेक (बनावट) असल्याचे निष्पन्न झाले.एटीएम क्लोनचाच प्रकारसायबर गुन्हेगारांनी जिल्ह्यातील एसबीआयच्या खातेदारांना टार्गेट केल्याचे निदर्शनास येत होते. मात्र, आता एक तक्रार भारतीय स्टेट बँक व बँक आॅफ महाराष्ट्रमधील खातेदारांनीही केली आहे. एटीएममध्ये स्किमर व कॅमेरा लावून खातेदारांची माहिती चोरणे आणि परस्पर खात्यातून पैसे काढण्याचा हा प्रकार असल्याची सायबर सेलने पुष्टी केली आहे.सुरक्षा रक्षक नेमण्याच्या सूचनाएटीएमची सुरक्षा वाºयावर असल्यामुळे सायबर गुन्हेगार खातेदारांची माहिती मिळवून पैसे काढण्यात यशस्वी झाले. यासंदर्भात पोलीस विभागाच सायबर सेलकडून संबंधित बँकांना पत्र पाठविण्यात आले असून, त्यामध्ये प्रत्येक एटीएममध्ये सुरक्षा रक्षक ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचप्रमाणे एटीएमच्या सुरक्षेसंबंधी सर्व उपायोजना कराव्यात, अशा सूचना दिल्या आहेत.जबाबदारी बँकेचीखातेदार बँकेवर विश्वास ठेवून पैसे जमा करतात. त्यामुळे बँक खातेदारांचे जर परस्पर पैसे काढले जात असतील, तर संबंधित खातेदारांना पैसे परत करण्याची जबाबदारी बँकेची आहे.शहरातील काही एटीएममधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी होत आहे. बँकांना पत्र देऊन सुरक्षेसंबंधी सूचना देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत बँक खात्यातून परस्पर रोकड काढल्याच्या नऊ घटना समोर आल्या आहेत.- कान्होपात्रा बन्सा,पोलीस उपनिरीक्षक, सायबर सेल.