शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

नऊ तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 22:24 IST

राज्य शासनाने १८७ तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले. मात्र, यात जिल्ह्यातील नऊ तालुक्यांचा समावेश नाही

ठळक मुद्देरवि राणा : सातबारा कोरा करून न्याय द्या

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य शासनाने १८७ तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले. मात्र, यात जिल्ह्यातील नऊ तालुक्यांचा समावेश नाही. त्यामुळे अगोदर पाच तर नव्याने नऊ असे १४ तालुक्यांचा समावेश करून कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी बडनेरा मतदारसंघाचे आ.रवि राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली.मुख्यमंत्री फडणवीस हे येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात दिवंगत नेते रा. सू. गवई यांच्या प्रस्तावित स्मारकाच्या भूमिपूजनासाठी आले असता, त्यांना जिल्ह्यातील भातकुली, अमरावती, तिवसा, दर्यापूर, धारणी, चांदूर रेल्वे, चांदूर बाजार, धामणगाव रेल्वे व नांदगाव खंडेश्र्वर या नऊ तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, तसेच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. खरीप हंगाम हातून गेले. अपुºया पावसामुळे पीक उत्पादन घटले. परिणामी शेतकरी आर्थिक संकटात असून, त्याला आधार देणे काळाची गरज असल्याचे आ. राणा म्हणाले. सरसकट प्रति एकरी ३० हजार रूपये नुकसान भरपाई देऊन शेतकºयांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, यासाठी शासनाने पाऊल उचलावे, अशी मागणी त्यांनी केली. सततची नापिकी आणि आर्थिक विंवचनेत असलेल्या शेतकºयांना येत्या काळात भीषण प्रसंगाचा सामना करण्यापूर्वी शासनाने मदतीचा हात पुढे करावा, असेही निवेदनातून म्हटले आहे. यावेळी राजू रोडगे, दिनेश टेकाम, मयुरी कावरे, जया तेलखडे, उमेश ढोणे, प्रदीप थोरात, मीनल डकरे, अभिजित देशमुख, लता रायबोले, अब्दूल रफिक आदी उपस्थित होते.