शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

शेतकºयांना नुकसानभरपाई जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 22:26 IST

यंदा जिल्ह्यात अनियमित पाऊस झाल्याने शेतमालाची अपरिमित हानी झाली आहे. दुसरीकडे हमीभाव नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

ठळक मुद्देयशोमती ठाकूर : मुख्यमंत्र्यांकडे रेटली आग्रही मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदा जिल्ह्यात अनियमित पाऊस झाल्याने शेतमालाची अपरिमित हानी झाली आहे. दुसरीकडे हमीभाव नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. यामुळे पिकांचा हमीभाव जाहीर करावा, नुकसानग्रस्तांना भरपाई मिळावी, पीक विम्याचे पैसे देण्यात यावे व रब्बीसाठी तातडीने कर्जवितरण करण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तिवस्याच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी केली. यासंदर्भात एक पत्र त्यांनी मुख्यंत्र्यांना सोमवारी अमरावती येथे दिले.जिल्ह्यातील मुख्य पीक असलेले सोयाबीन, उडीद, मूग यांची काढणी न होताच, शेतातच ते नष्ट झाले. शेंगावर आलेले सोयाबीन पीक अवकाळी पावसाने खराब झाले. यामुळे त्याचे उत्पादनदेखील घटले. अंदाजे एकरी तीन ते चार पोते शेतमाल शेतकºयांच्या घरी आला आहे. हमीभाव नसल्याने ऐन दिवाळीत व्यापाºयांनी सोयाबीन ८०० ते ११०० रुपये क्विंटल अशा तोकड्या भावात खरेदी केले. या रकमेतून काढणीचा खर्चसुद्धा निघाला नाही. जिल्ह्यातील तिवसा, मोर्शी, भातकुली, अमरावती या तालुक्यातील शेतकºयांना सोयाबीन, मूग, उडीद या पिकांचा हमीभाव जाहीर करावा. नुकसानभरपाई देण्यात यावी. शेतकºयांना पीक विम्याचे पैसे देण्यात यावे. यामुळे रब्बी हंगामाला मदत होईल. याशिवाय रब्बीसाठी तातडीने कर्ज वितरित करावे, अशी मागणी आमदार ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रातून केली आहे. या पत्रासोबतच आमदार ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यासोबत चर्चा करून वास्तविकता मांडली. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे, गृहराज्यमंत्री रणजित पाटील हेदेखील उपस्थित होते.