शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांना नुकसानभरपाई जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 22:26 IST

यंदा जिल्ह्यात अनियमित पाऊस झाल्याने शेतमालाची अपरिमित हानी झाली आहे. दुसरीकडे हमीभाव नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

ठळक मुद्देयशोमती ठाकूर : मुख्यमंत्र्यांकडे रेटली आग्रही मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदा जिल्ह्यात अनियमित पाऊस झाल्याने शेतमालाची अपरिमित हानी झाली आहे. दुसरीकडे हमीभाव नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. यामुळे पिकांचा हमीभाव जाहीर करावा, नुकसानग्रस्तांना भरपाई मिळावी, पीक विम्याचे पैसे देण्यात यावे व रब्बीसाठी तातडीने कर्जवितरण करण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तिवस्याच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी केली. यासंदर्भात एक पत्र त्यांनी मुख्यंत्र्यांना सोमवारी अमरावती येथे दिले.जिल्ह्यातील मुख्य पीक असलेले सोयाबीन, उडीद, मूग यांची काढणी न होताच, शेतातच ते नष्ट झाले. शेंगावर आलेले सोयाबीन पीक अवकाळी पावसाने खराब झाले. यामुळे त्याचे उत्पादनदेखील घटले. अंदाजे एकरी तीन ते चार पोते शेतमाल शेतकºयांच्या घरी आला आहे. हमीभाव नसल्याने ऐन दिवाळीत व्यापाºयांनी सोयाबीन ८०० ते ११०० रुपये क्विंटल अशा तोकड्या भावात खरेदी केले. या रकमेतून काढणीचा खर्चसुद्धा निघाला नाही. जिल्ह्यातील तिवसा, मोर्शी, भातकुली, अमरावती या तालुक्यातील शेतकºयांना सोयाबीन, मूग, उडीद या पिकांचा हमीभाव जाहीर करावा. नुकसानभरपाई देण्यात यावी. शेतकºयांना पीक विम्याचे पैसे देण्यात यावे. यामुळे रब्बी हंगामाला मदत होईल. याशिवाय रब्बीसाठी तातडीने कर्ज वितरित करावे, अशी मागणी आमदार ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रातून केली आहे. या पत्रासोबतच आमदार ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यासोबत चर्चा करून वास्तविकता मांडली. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे, गृहराज्यमंत्री रणजित पाटील हेदेखील उपस्थित होते.