शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; 9 प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानाला नेमकं काय घडलं?
2
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
3
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
4
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
5
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
6
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
7
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
8
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
9
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
10
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
11
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
12
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
13
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
14
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
15
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
16
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
17
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
18
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
19
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
20
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र

शेतकºयांना नुकसानभरपाई जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 22:26 IST

यंदा जिल्ह्यात अनियमित पाऊस झाल्याने शेतमालाची अपरिमित हानी झाली आहे. दुसरीकडे हमीभाव नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

ठळक मुद्देयशोमती ठाकूर : मुख्यमंत्र्यांकडे रेटली आग्रही मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदा जिल्ह्यात अनियमित पाऊस झाल्याने शेतमालाची अपरिमित हानी झाली आहे. दुसरीकडे हमीभाव नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. यामुळे पिकांचा हमीभाव जाहीर करावा, नुकसानग्रस्तांना भरपाई मिळावी, पीक विम्याचे पैसे देण्यात यावे व रब्बीसाठी तातडीने कर्जवितरण करण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तिवस्याच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी केली. यासंदर्भात एक पत्र त्यांनी मुख्यंत्र्यांना सोमवारी अमरावती येथे दिले.जिल्ह्यातील मुख्य पीक असलेले सोयाबीन, उडीद, मूग यांची काढणी न होताच, शेतातच ते नष्ट झाले. शेंगावर आलेले सोयाबीन पीक अवकाळी पावसाने खराब झाले. यामुळे त्याचे उत्पादनदेखील घटले. अंदाजे एकरी तीन ते चार पोते शेतमाल शेतकºयांच्या घरी आला आहे. हमीभाव नसल्याने ऐन दिवाळीत व्यापाºयांनी सोयाबीन ८०० ते ११०० रुपये क्विंटल अशा तोकड्या भावात खरेदी केले. या रकमेतून काढणीचा खर्चसुद्धा निघाला नाही. जिल्ह्यातील तिवसा, मोर्शी, भातकुली, अमरावती या तालुक्यातील शेतकºयांना सोयाबीन, मूग, उडीद या पिकांचा हमीभाव जाहीर करावा. नुकसानभरपाई देण्यात यावी. शेतकºयांना पीक विम्याचे पैसे देण्यात यावे. यामुळे रब्बी हंगामाला मदत होईल. याशिवाय रब्बीसाठी तातडीने कर्ज वितरित करावे, अशी मागणी आमदार ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रातून केली आहे. या पत्रासोबतच आमदार ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यासोबत चर्चा करून वास्तविकता मांडली. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे, गृहराज्यमंत्री रणजित पाटील हेदेखील उपस्थित होते.