शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

अंजनसिंगीत कडकडीत बंद, सर्वपक्षीय मोर्चा

By admin | Updated: August 29, 2016 23:58 IST

प्रथमेश सगणे आणि अजय वणवे या चिमुरड्यांवर नरबळीच्या उद्देशाने झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ...

शंकर महाराजांच्या अटकेची मागणी : नरबळीप्रकरणाचे संतप्त पडसाद अंजनसिंगी : प्रथमेश सगणे आणि अजय वणवे या चिमुरड्यांवर नरबळीच्या उद्देशाने झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ तसेच या आश्रमाचे संचालक संत शंकर महाराज यांच्या अटकेच्या मागणीसाठी सोमवारी कुऱ्हानजीकच्या अंजनसिंगी गावात कडेकोट बंद पाळण्यात आला. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन गावातून निषेध रॅली काढली. यावेळी ग्रामस्थांचा प्रचंड रोष उफाळून आला होता.अंजनसिंगीपासून कुऱ्हा हे गाव अवघ्या चार किलोेमीटर अंतरावर आहे. त्यामुळे या नरबळीच्या प्रयत्नांचे तीव्र पडसाद या गावांत उमटले आहेत. गावकऱ्यांमध्ये प्रचंड रोष व्याप्त असून दोन निरागस बालकांचा नरबळी घेण्याचा प्रयत्न ज्या शंकर महाराजांच्या आश्रमात झाला त्या शंकर महाराजांना अद्याप अटक का नाही?, असा सवाल ग्रामस्थांनी केला. गावातून काढलेल्या निषेध रॅलीत ग्रामस्थांनी प्रचंड नारेबाजी केली. अण्णाभाऊ साठे चौकातून या रॅलीचा शुभारंभ झाला. अहल्याबाई चौक, गुरूदेव चौकातून निघालेल्या रॅलीचे बसस्थानक परिसरात निषेधसभेत रूपांतर झाले. अध्यक्षस्थानी सरपंच अवधूत दिवे होते. भाकपचे विश्वास कांबळे, भाजपचे प्रभाकर कांबळे, रिपाइंचे पंजाबराव कठाणे, काँग्रेसचे सतीश थोटे, श्रीकृष्ण गायकवाड, कैलास ठाकरे, राजाभाऊ मनोहरे, प्रमोद वैद्य, पंजाब कठाणे, दादाराव गडलिंग, भगवान चंदनखेडे यांनी मोर्चाला संबोधित केले. आश्रमशाळेची मान्यता रद्द करावी, शंकर महाराजांना अटक करावी, अटकेतील आरोपींची कसून चौकशी करावी, आश्रमाच्या संपत्तीची चौकशी करावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्यात.मोर्चेकऱ्यांनी कुऱ्हा येथील ठाणेदार कांबळे यांना निवेदन दिले.