शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

अंजनगाव पंचक्रोशीतील तलाव, विहिरी कोरड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 23:01 IST

अंजनगाव बारी परिसरातील पाण्याचे प्रमुख स्रोत कोंडेश्वर तलाव, गंभीवीर तलाव तसेच कोंडेश्वर येथील विहीर कोरडी झाल्याने नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. ही परिस्थिती लक्षात घेता, भिवापूर तलावात विहीर खोदून त्यावर पाईपलाईन टाकण्यात आली आहे.

ठळक मुद्देनव्या पाईपलाईनने होणार सुविधा : रस्ते फोडले, अपघाताची शक्यता वाढली

साहेबराव राऊत।लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव बारी : अंजनगाव बारी परिसरातील पाण्याचे प्रमुख स्रोत कोंडेश्वर तलाव, गंभीवीर तलाव तसेच कोंडेश्वर येथील विहीर कोरडी झाल्याने नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. ही परिस्थिती लक्षात घेता, भिवापूर तलावात विहीर खोदून त्यावर पाईपलाईन टाकण्यात आली आहे.अंजनगाव बारी ग्रामपंचायतीने जलस्वराज योजनेमार्पत आठ कोटींच्या निधीतून कामाला सुरुवात केली आहे. हे पाणी भिवापूर तलावावरून आणले जाणार आहे. यासाठी पाइप लाइनचे काम सुरू असून, नवीन टाकी व फिल्टरची कामे सुरू आहेत. गावात नवीन पाइप लाइन टाकण्यात येत आहे.येत्या दोन वर्षांत या योजनेतून मुबलक पाणी उपलब्ध होईल. प्रत्येक घरी नळ कनेक्शन देऊन मीटर बसविण्यात येणार आहे. ही कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी १० वर्षांचा कालावधी लागला.पाईपलाईनमुळे रस्त्यांची दुर्दशागावातील संपूर्ण सिमेंट रोड २५ वर्षांच्या पाठपुराव्यानंतर तयार झाले. नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी हे रस्ते खोदावे लागले. त्यामुळे संपूर्ण गावातील रस्त्यांवर माती-चिखल पसरून हे रस्ते मातीचेच झाले आहेत, शिवाय वर्दळीमुळे वाहन अपघाताचा धोका वाढला आहे.पाण्याची सुविधा गावासाठी महत्त्वाची आहे. पाइप लाइन टाकणे झाल्यानंतर रस्ते व्यवस्थित करून देऊ.- मंदा कळंबे,सरपंच, अंजनगाव बारी