शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

अंजनगावात आमदाराच्या घराला घेराव

By admin | Updated: June 8, 2017 00:05 IST

शेतकरी संपाच्या सातव्या दिवशी काँग्रेसने आंदोलनाचा मोर्चा सांभाळला. तिवसा तालुक्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रमुख मागणीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुंडण केले.

तिवस्यात मुंडन : काँग्रेस आक्रमक, गुरुकुंज येथे डाव्यांचा चक्काजामलोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : शेतकरी संपाच्या सातव्या दिवशी काँग्रेसने आंदोलनाचा मोर्चा सांभाळला. तिवसा तालुक्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रमुख मागणीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुंडण केले.कर्जमाफीच्या आश्वासनामुळे राज्यातील जनतेने भाजपला भरभरून मतदान केले. परंतु यासरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीच काय दुष्काळी मदतही दिली नाही. त्यामुळे मागील तीन वर्षांत राज्यातील जवळपास १० हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्य शासनाने अल्पभूधारक शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांच्या उग्र भावनातिवसा : ही घोषणा म्हणजे फसवेगिरी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उग्र भावना लक्षात घेऊन शासनाने सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली. तत्पूर्वी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध केला.यावेळी नगरसेवक मधुकर भगत, पंचायत समिती सदस्य मंगेश भगोले, पं.स सदस्य लुकेश केने, आनंद शर्मा यांच्यासह दिलीप काळबांडे, सागर राऊत, रितेश पांडव, अतुल देशमुख, रामराव तांबेकर, नरेंद्र विघ्ने, योगेश वानखडे, प्रफुल्ल देशमुख, सचिन गोरे, दिवाकर भुरभुरे, स्वप्नील गंधे, सुरेंद्र साबळे, सागर बोडखे, उमेश ठाकरे, प्रशिक शापामोहन, अंकुश देशमुख, वैभव काकडे, अंकुश बनसोड, राजिक शहा आदी उपस्थित होते.बुंदिलेंचे घेरले घरदर्यापूर-अंजनगाव सुर्जी मतदारसंघाचे आ. रमेश बुंदिले यांच्या अंजनगांव येथील घराला काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरेश आडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी दुपारी घेराव घातला. यावेळी शासनविरोधी नारेबाजी करण्यात आली. आ. बुंदिले घरी नसल्याने त्यांच्या स्विय सहायकांनी आंदोलक शेतकऱ्यांची समजूत काढली. मात्र, आंदोलक आक्रमक असल्याने परिसरात काही वेळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. गुरूकुंज मोझरीत चक्काजामशेतकरी आदोलनाच्या समर्थनार्थ डाव्या पक्षांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील गुरुकुंज मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीपुढे बुधवारी चक्काजाम आंदोलन केले. आंदोलकांनी सुमारे अर्धा तास महामार्ग रोखून धरला होता. यावेळी दोन्ही बाजुने वाहतूक खोळंबली होती. परिसरातील किसान एकता मंच, एसएफआय, डीवायएफआयच्या कार्यकर्त्यांनी याआंदोलनाचे नेतृत्व केले. याआंदोलनात महिलांची उपस्थिती लक्षणिय ठरली. या वेळी ‘फडणवीस सरकार बदलनी है, मोदी सरकार हटानी है’ सारख्या सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या. तिवसा पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत आंदोलन समाप्त केले.