शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

पशुसंवर्धन म्हणजे जीवनाचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 22:50 IST

शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी जनावरे पाळणे गरजेचे आहे़ शेतकऱ्यांचा खरा आधार पशू आहे़ यामुळे पशू संर्वधन महत्त्वाचे आहे.

ठळक मुद्देवीरेंद्र जगताप : जिल्हा पशुप्रदर्शन, शरद मोहतुरे यांची गाय ठरली चॅम्पियन

आॅनलाईन लोकमतधामणगाव रेल्वे : शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी जनावरे पाळणे गरजेचे आहे़ शेतकऱ्यांचा खरा आधार पशू आहे़ यामुळे पशू संर्वधन महत्त्वाचे आहे. शंभर वर्षाचा इतिहास असलेला तळेगाव दशासरच्या शंकरपटावरील बंदी उठवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, असे प्रतिपादन धामणगावचे आमदार वीरेंद्र जगताप यांनी केले.जिल्हा परिषद पशू संवधन विभाग व स्थानिक पंचायत समिती यांच्या वतीने तळेगाव दशासर येथे आयोजित जिल्हास्तरीय पशू प्रदर्शनीत ते मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि़प़उपाध्यक्ष दत्ता ढोमणे तर प्रमुख अतिथी जि़प़सदस्या अनिता मेश्राम, पं़स़सभापती सचिन पाटील, उपसभापती वनिता राऊत, जि़प़सदस्य प्रियंका दगडकर, वैशाली बोरकर, सुरेश निमकर, पशु सवंर्धन उपायुक्त मोहन गोहत्रे, प्रादेशिक आयुक्त विजय भोजने, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी विजय रहाटे, पं़स़सदस्य गणेश राजनकर, अतुल देशमुख, प्रीती ढोबळे, रोशन कंगाले, सविता इंगळे, गटविकास अधिकारी पंकज भोयर उपस्थित होते़पशू प्रदर्शनात तब्बल ३०० मालकांनी पशुंना सहभागी केले होते़ संकरित गाय, देशी गाय, शेळी मेंढी, घोडे, कुक्कूट अशा विविध गटात जनावरांनी सहभाग होता़ दुधाळ जनावरांच्या मालकांनी अनेक बक्षिसे पटकावलीत. जिल्ह्यातील वाशीम, नांदगाव खंडेश्वर, परतवाडा, वाशीम, चांदूर बाजार, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, वर्धा, यवतमाळच्या मालकांनी पशू आणली होती. या प्रदर्शनीसाठी पशू विस्तार अधिकारी उदय देशमुख, सुभाष इंदाणे, गोपाल तायडे, अरूण वाघ, मनोज धवणे, एस़एल माळी सर्व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले़ संचालन सुनील राऊत, प्राजक्ता राऊत, तर प्रास्ताविक मोहन गोहत्रे, तर आभार प्रदर्शन मिलिंद काळे यांनी केले़संकरित गाय चॅम्पियनवकनाथ येथील शरद मोहतुरे यांची संकरित गाय चॅम्पियन ठरली. वाशीम येथील अतुल वाटाणे यांची बैलजोडी अव्वल ठरली़ संकरित जणावरांमध्ये गाई, वळू, कालवडी असे तीन गट, तर देशी जणावरांमध्ये चार गट तसेच म्हशी, शेळी, घोडे यात गट पाडले होते़ एकूण २ लाखांचे बक्षीस देण्यात आले, तर चॅम्पियन बक्षीस १० हजार रूपयांचे होते. ट्रॉफी मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांच्या मालकांना देण्यात आली़