शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
2
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
3
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
4
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
5
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
6
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
7
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
8
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
9
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
10
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
11
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
12
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
13
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
14
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
15
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
16
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
17
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
18
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
19
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
20
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?

असुरक्षिततेच्या भावनेतून आनंदने केली अनिलची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 22:30 IST

भौतिक सुविधांचा अतिरेक वाढत चालला असता मनुष्यप्राण्यात असुरक्षिततेची टोकाची भावनाही बळावली आहे. समोरचा व्यक्ती आपल्याला समजावण्यासाठी आला की अन्य उद्देशाने हे न समजून घेण्याइतपत ही भावना टोकदार झाली आहे. कंवरनगरमध्ये रविवारी दुपारी झालेले अनिल अडवाणी हत्याप्रकरण तीच असुरक्षिततेची भावना अधोरेखित करणारे ठरले आहे.

ठळक मुद्देगैरसमज बेतला जिवावर : कंवरनगर येथील अनिल अडवाणी हत्याप्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भौतिक सुविधांचा अतिरेक वाढत चालला असता मनुष्यप्राण्यात असुरक्षिततेची टोकाची भावनाही बळावली आहे. समोरचा व्यक्ती आपल्याला समजावण्यासाठी आला की अन्य उद्देशाने हे न समजून घेण्याइतपत ही भावना टोकदार झाली आहे. कंवरनगरमध्ये रविवारी दुपारी झालेले अनिल अडवाणी हत्याप्रकरण तीच असुरक्षिततेची भावना अधोरेखित करणारे ठरले आहे.शनिवारी रात्री कंवरनगरातील गल्ली क्रमांक २ मध्ये हत्येचा थरार उघड झाला. क्षुल्लक कारणावरून अनिल अडवाणीला प्राण गमवावे लागले, तर त्याचे वडील नारायण व शेजारी राहणारा तरुण किंगर हा इसम गंभीर जखमी झाला. शनिवारी उभय कुटुंबात लहान मुलांच्या वादानंतर महिलांमध्ये तूतू-मैमै झाली. तो वाद निवळला. रात्रीच्या सुमारास अनिल व आनंद हे दोघे घरी आल्यानंतर त्यांच्या पत्नींनी सकाळचा वाद त्यांच्या कानावर घातला. कंवरनगरात व्याजबट्ट्याचा व्यवसाय करणाऱ्या आनंद बुधलानीची दहशत होती. त्यामुळे त्याच्याविरोधात जाण्याचे कोणात धाडस नव्हते. मात्र, शनिवारी रात्री अनिल मोठ्या हिमतीने आनंदला विचारणा करण्यास गेला. घराबाहेर उभा राहून आनंदला आवाज देऊ लागला. आनंद त्यावेळी घरातील आतील खोलीत होता. आनंदची पत्नी बाहेर आली आणि अनिल घरासमोर असल्याचे तिने सांगितले. सकाळच्या वादातून अनिल तुम्हाला मारण्यासाठी आल्याचे पत्नीने आनंदला सांगितले. त्यामुळे आनंद मागचा-पुढचा विचार न करता चाकू घेऊन बाहेर पडला. नेमके काय झाले, हे न सांगता, न विचारता त्याने अनिलवर थेट चाकूने हल्ला चढवला. अनिलला वाचविण्यासाठी गेलेले वडील नारायण अडवाणी व शेजारी राहणारे तरुण किंगरसुद्धा आनंदच्या हल्ल्यात जखमी झाले. अनिलला रक्तबंबाळ अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात नेल्यावर तेथे मृत घोषित केले. शहरात घडणाऱ्या हत्येच्या बहुतांश घटना मद्यधुंद अवस्थेत, रागाच्या भरात किंवा द्वेषभावनेतून होतात. याशिवाय तुरळक काही घटना संपत्तीच्या वादातून योजनाबद्धरीत्या होत असल्याचे विश्लेषक सांगतात. मात्र, आपल्याला जिवे मारण्यासाठीच आल्याच्या गैरसमजुतीतून आनंदने अनिलची हत्या केल्याची बाब पुढे आली आहे. पोलीस चौकशीत आनंदने पश्चात्ताप व्यक्त करीत खुनाची कबुली दिली आहे. पोलीस यंत्रणाही या घटनेने हतबद्ध झाली आहे.४ आॅक्टोबरपर्यंत कोठडी, चाकू, कपडे जप्तहत्येनंतर आरोपी आनंद बुधलानीला अकोली रेल्वेस्थानकाहून राजापेठ पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर ४ आॅक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलिसांनी सोमवारी आनंद बुधलानीने गुन्ह्यात वापरलेला चाकू व परिधान केलेले कपडे जप्त केले आहेत.आरोपीला ४ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. त्याच्याकडून चाकू व कपडे जप्त केले आहे. गैरसमजुतीतून ही हत्या केल्याचे तो सांगत असून,त्याने गुन्ह्याची कबुली दिलीआहे.- स.ई. तडवीदुय्यम पोलीस निरीक्षक,राजापेठ ठाणे.