शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
3
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
4
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
5
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
8
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
9
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
10
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
11
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
12
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
13
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
14
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
15
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
16
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
17
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
18
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
19
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
20
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय

असुरक्षिततेच्या भावनेतून आनंदने केली अनिलची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 22:30 IST

भौतिक सुविधांचा अतिरेक वाढत चालला असता मनुष्यप्राण्यात असुरक्षिततेची टोकाची भावनाही बळावली आहे. समोरचा व्यक्ती आपल्याला समजावण्यासाठी आला की अन्य उद्देशाने हे न समजून घेण्याइतपत ही भावना टोकदार झाली आहे. कंवरनगरमध्ये रविवारी दुपारी झालेले अनिल अडवाणी हत्याप्रकरण तीच असुरक्षिततेची भावना अधोरेखित करणारे ठरले आहे.

ठळक मुद्देगैरसमज बेतला जिवावर : कंवरनगर येथील अनिल अडवाणी हत्याप्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भौतिक सुविधांचा अतिरेक वाढत चालला असता मनुष्यप्राण्यात असुरक्षिततेची टोकाची भावनाही बळावली आहे. समोरचा व्यक्ती आपल्याला समजावण्यासाठी आला की अन्य उद्देशाने हे न समजून घेण्याइतपत ही भावना टोकदार झाली आहे. कंवरनगरमध्ये रविवारी दुपारी झालेले अनिल अडवाणी हत्याप्रकरण तीच असुरक्षिततेची भावना अधोरेखित करणारे ठरले आहे.शनिवारी रात्री कंवरनगरातील गल्ली क्रमांक २ मध्ये हत्येचा थरार उघड झाला. क्षुल्लक कारणावरून अनिल अडवाणीला प्राण गमवावे लागले, तर त्याचे वडील नारायण व शेजारी राहणारा तरुण किंगर हा इसम गंभीर जखमी झाला. शनिवारी उभय कुटुंबात लहान मुलांच्या वादानंतर महिलांमध्ये तूतू-मैमै झाली. तो वाद निवळला. रात्रीच्या सुमारास अनिल व आनंद हे दोघे घरी आल्यानंतर त्यांच्या पत्नींनी सकाळचा वाद त्यांच्या कानावर घातला. कंवरनगरात व्याजबट्ट्याचा व्यवसाय करणाऱ्या आनंद बुधलानीची दहशत होती. त्यामुळे त्याच्याविरोधात जाण्याचे कोणात धाडस नव्हते. मात्र, शनिवारी रात्री अनिल मोठ्या हिमतीने आनंदला विचारणा करण्यास गेला. घराबाहेर उभा राहून आनंदला आवाज देऊ लागला. आनंद त्यावेळी घरातील आतील खोलीत होता. आनंदची पत्नी बाहेर आली आणि अनिल घरासमोर असल्याचे तिने सांगितले. सकाळच्या वादातून अनिल तुम्हाला मारण्यासाठी आल्याचे पत्नीने आनंदला सांगितले. त्यामुळे आनंद मागचा-पुढचा विचार न करता चाकू घेऊन बाहेर पडला. नेमके काय झाले, हे न सांगता, न विचारता त्याने अनिलवर थेट चाकूने हल्ला चढवला. अनिलला वाचविण्यासाठी गेलेले वडील नारायण अडवाणी व शेजारी राहणारे तरुण किंगरसुद्धा आनंदच्या हल्ल्यात जखमी झाले. अनिलला रक्तबंबाळ अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात नेल्यावर तेथे मृत घोषित केले. शहरात घडणाऱ्या हत्येच्या बहुतांश घटना मद्यधुंद अवस्थेत, रागाच्या भरात किंवा द्वेषभावनेतून होतात. याशिवाय तुरळक काही घटना संपत्तीच्या वादातून योजनाबद्धरीत्या होत असल्याचे विश्लेषक सांगतात. मात्र, आपल्याला जिवे मारण्यासाठीच आल्याच्या गैरसमजुतीतून आनंदने अनिलची हत्या केल्याची बाब पुढे आली आहे. पोलीस चौकशीत आनंदने पश्चात्ताप व्यक्त करीत खुनाची कबुली दिली आहे. पोलीस यंत्रणाही या घटनेने हतबद्ध झाली आहे.४ आॅक्टोबरपर्यंत कोठडी, चाकू, कपडे जप्तहत्येनंतर आरोपी आनंद बुधलानीला अकोली रेल्वेस्थानकाहून राजापेठ पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर ४ आॅक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलिसांनी सोमवारी आनंद बुधलानीने गुन्ह्यात वापरलेला चाकू व परिधान केलेले कपडे जप्त केले आहेत.आरोपीला ४ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. त्याच्याकडून चाकू व कपडे जप्त केले आहे. गैरसमजुतीतून ही हत्या केल्याचे तो सांगत असून,त्याने गुन्ह्याची कबुली दिलीआहे.- स.ई. तडवीदुय्यम पोलीस निरीक्षक,राजापेठ ठाणे.