शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

संतप्त ग्रामस्थांनी पीएचसीला ठोकले कुलूप

By admin | Updated: April 21, 2017 00:20 IST

नजीकच्या धामक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची प्रचंड हेळसांड होत आहे. औषधींचा तुटवडा असल्याने रूग्णांवर योग्य उपचार होत नसून

धामक येथील प्रकार : औषधींचा तुटवडा, वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित नांदगाव खंडेश्वर : नजीकच्या धामक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची प्रचंड हेळसांड होत आहे. औषधींचा तुटवडा असल्याने रूग्णांवर योग्य उपचार होत नसून वैद्यकीय अधिकारी मुख्यालयी हजर राहात नसल्यामुळे रुग्णांना मरण यातना सोसाव्या लागत आहेत. या प्रकारामुळे संतप्त धामकवासीयांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला गुरूवारी कुलूप ठोकले. जोपर्यंत रूग्णसेवेबाबत ठोस निर्णय आरोग्य यंत्रणा घेणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार धामकवासीयांनी केला आहे. धामक पीएचसीचे वैद्यकीय अधिकारी ए.व्ही.देशमुख व नागोलकर मुख्यालयी राहात नसून ते सतत गैरहजर असतात. यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कारभारावर कुणाचाच अंकुश राहिलेला नाही. येथील इतर कर्मचारी सुद्धा मुख्यालयी राहात नाहीत. त्यामुळे धामक परिसरातील रूग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. धामक प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे सात ते आठ गावांतील रूग्णांना वैद्यकीय सेवा पुरविली जाते. परंतु वैद्यकीय अधिकारीच गैरहजर असतील तर मग रूग्णांवर उपचार करणार कोण, हा प्रश्न उपस्थित होत आहे. गैरहजर राहणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची बदली करून नव्या अधिकाऱ्यांची येथे नेमणूक करावी, आरोग्य केंद्रातील रिक्त पदे त्वरित भरावी, रुग्णालयात स्वच्छता ठेवावी, पुरेसा औषधसाठा पुरवावा, ओपीडीच्या वेळेवर अधिकाऱ्यांनी हजर रहावे, २४ तास आरोग्यसेवा मिळावी, रूग्णांची हेळसांड न करता योग्य तऱ्हेने तपासणी करावी आदी मागण्या आंदोलनकर्त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे केल्या आहेत. उपरोक्त मागण्यांबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन कायम ठेवण्याचा निर्णय नागरिकांनी केला आहे. या आंदोलनामध्ये ग्रा.पं. सदस्य जयदीप काकडे, उपसरपंच जमीर खाँ पठाण, रमेश दुधमोचन, शेख इस्माईल, चंद्रशेखर कडूकार, शेख राजीक शेख रहेमान, प्रल्हाद मोहुर्ले, वासुदेव राऊत, कल्पेश सोनकुसरे, जाबीरखाँ, सुरेश राजुरकर, नारायण वैष्णव, गजानन सुरसुजे, प्रवीण नगराळे, अजय कदम, गौतम नगराळे, राजू जगताप, नरेश राऊत, वसंत मोहुर्ले, मारोती ठाकरे यांच्यासह गावातील शेकडो नागरिक सहभागी झाले होते. (शहर प्रतिनिधी)