शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त आदिवासींची वनाधिकारी, कर्मचाऱ्यांना घेराबंदी

By admin | Updated: July 13, 2017 00:05 IST

नखडी येथे वनजमिनीवरील अतिक्रमण हटविण्यास गेलेल्या वनाधिकाऱ्यांनी परतीच्यावेळी आदिवासींना डिवचल्याने संतप्त आदिवासींनी मंगळवारी रात्री १ वाजेपर्यंत नजरकैदेत ठेवले.

चुनखडी येथील प्रकरण : आदिवासींना डिवचल्याने झाला अतिरेक, सहा तास नजरकैद लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : चुनखडी येथे वनजमिनीवरील अतिक्रमण हटविण्यास गेलेल्या वनाधिकाऱ्यांनी परतीच्यावेळी आदिवासींना डिवचल्याने संतप्त आदिवासींनी मंगळवारी रात्री १ वाजेपर्यंत नजरकैदेत ठेवले. पोलिसांचा ताफा पोहोचल्यानंतर त्यांची सुटका झाली. मागील आठवड्यात चुनखडी येथे जेसीबी, हत्ती नेऊन अतिक्रमित जमीनीवर आदिवासींनी केलेली शेती उद्धवस्त करण्यात आली. आदिवासींना १२ जुलैपर्यंत मुदत देऊनही एक दिवस आधीच सिपना वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केल्याने उद्रेक झाला. वनाधिकाऱ्यांनी डिवचले सुप्रिम कोर्टाच्या आदेशाने कारवाई केली जात असताना आदिवासींनी एवढे पीक घेऊ द्या, त्यानंतर नियमाने दावे रद्द झाल्यास शेती करणार नाही, अशी मागणीवजा विनंती केली होती. मात्र, त्याला न जुमानता पिके नष्ट करण्याची कारवाई करण्यात आली. मंगळवारी दिवसभर पिके नष्ट केल्यावर वनाधिकारी चुनखडी गावात शिरले आणि आदिवासींना डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतापलेल्या आदिवासींनी त्या अधिकाऱ्यांना थेट घेराव घातला व नजरकैदेत ठेवले. सहायक वनसंरक्षक मिलिंद तोरो आणि शिंदे नामक वनकर्मचाऱ्याने अतिरेक केल्याचे आदिवासींनी सांगितले. वनकर्मचाऱ्यांना निलंबित करा सुप्रिम कोर्टाच्या आदेशाने कारवाई केली जात असेल तर वनकर्मचारी, अधिकाऱ्यांनी पेरणीपूर्वीच ही कारवाई का केली नाही. यामध्ये तेच दोषी आहेत. त्यामुळे यावनकर्मचारी, अधिकाऱ्यांना प्रथम निलंबित करण्याची मागणी मेळघाटचे आमदार प्रभुदास भिलावेकर यांनी केली आहे. यासंपूर्ण प्रकरणात लोकप्रतिनिधींना खोटे आश्वासन देऊन गोरगरिब आदिवासींवर अन्याय करणाऱ्यांना आता जमेल तसे उत्तर दिले जाणार असल्याचे भिलावेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मंगळवारी रात्री १ वाजेपर्यंत वनाधिकाऱ्यांसह जवळपास ७० कर्मचाऱ्यांना चुनखडीतील आदिवासींनी घेराबंदी करीत नजरकैद केल्याची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली होती. वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना बोलवा, अशी मागणी संतप्त आदिवासींनी केली. पोलिसांची अतिरिक्त कुमक पोहोचल्यावर त्यांची सुटका करण्यात आली. सुप्रिम कोर्टाच्या निर्णयानुसार आदिवासींनी केलेली शेती ही अतिक्रमण ठरते. वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी आदिवासींची पिके काढल्याने गावकऱ्यांनी त्यांना घेराव घातला. मध्यरात्री पोलिसांची अतिरिक्त कुमक आल्यावर त्यांची सुटका झाली. - ए.एस. मोळेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, जारिदा