शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

संतप्त आदिवासींची वनाधिकारी, कर्मचाऱ्यांना घेराबंदी

By admin | Updated: July 13, 2017 00:05 IST

नखडी येथे वनजमिनीवरील अतिक्रमण हटविण्यास गेलेल्या वनाधिकाऱ्यांनी परतीच्यावेळी आदिवासींना डिवचल्याने संतप्त आदिवासींनी मंगळवारी रात्री १ वाजेपर्यंत नजरकैदेत ठेवले.

चुनखडी येथील प्रकरण : आदिवासींना डिवचल्याने झाला अतिरेक, सहा तास नजरकैद लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : चुनखडी येथे वनजमिनीवरील अतिक्रमण हटविण्यास गेलेल्या वनाधिकाऱ्यांनी परतीच्यावेळी आदिवासींना डिवचल्याने संतप्त आदिवासींनी मंगळवारी रात्री १ वाजेपर्यंत नजरकैदेत ठेवले. पोलिसांचा ताफा पोहोचल्यानंतर त्यांची सुटका झाली. मागील आठवड्यात चुनखडी येथे जेसीबी, हत्ती नेऊन अतिक्रमित जमीनीवर आदिवासींनी केलेली शेती उद्धवस्त करण्यात आली. आदिवासींना १२ जुलैपर्यंत मुदत देऊनही एक दिवस आधीच सिपना वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केल्याने उद्रेक झाला. वनाधिकाऱ्यांनी डिवचले सुप्रिम कोर्टाच्या आदेशाने कारवाई केली जात असताना आदिवासींनी एवढे पीक घेऊ द्या, त्यानंतर नियमाने दावे रद्द झाल्यास शेती करणार नाही, अशी मागणीवजा विनंती केली होती. मात्र, त्याला न जुमानता पिके नष्ट करण्याची कारवाई करण्यात आली. मंगळवारी दिवसभर पिके नष्ट केल्यावर वनाधिकारी चुनखडी गावात शिरले आणि आदिवासींना डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतापलेल्या आदिवासींनी त्या अधिकाऱ्यांना थेट घेराव घातला व नजरकैदेत ठेवले. सहायक वनसंरक्षक मिलिंद तोरो आणि शिंदे नामक वनकर्मचाऱ्याने अतिरेक केल्याचे आदिवासींनी सांगितले. वनकर्मचाऱ्यांना निलंबित करा सुप्रिम कोर्टाच्या आदेशाने कारवाई केली जात असेल तर वनकर्मचारी, अधिकाऱ्यांनी पेरणीपूर्वीच ही कारवाई का केली नाही. यामध्ये तेच दोषी आहेत. त्यामुळे यावनकर्मचारी, अधिकाऱ्यांना प्रथम निलंबित करण्याची मागणी मेळघाटचे आमदार प्रभुदास भिलावेकर यांनी केली आहे. यासंपूर्ण प्रकरणात लोकप्रतिनिधींना खोटे आश्वासन देऊन गोरगरिब आदिवासींवर अन्याय करणाऱ्यांना आता जमेल तसे उत्तर दिले जाणार असल्याचे भिलावेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मंगळवारी रात्री १ वाजेपर्यंत वनाधिकाऱ्यांसह जवळपास ७० कर्मचाऱ्यांना चुनखडीतील आदिवासींनी घेराबंदी करीत नजरकैद केल्याची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली होती. वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना बोलवा, अशी मागणी संतप्त आदिवासींनी केली. पोलिसांची अतिरिक्त कुमक पोहोचल्यावर त्यांची सुटका करण्यात आली. सुप्रिम कोर्टाच्या निर्णयानुसार आदिवासींनी केलेली शेती ही अतिक्रमण ठरते. वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी आदिवासींची पिके काढल्याने गावकऱ्यांनी त्यांना घेराव घातला. मध्यरात्री पोलिसांची अतिरिक्त कुमक आल्यावर त्यांची सुटका झाली. - ए.एस. मोळेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी, जारिदा