शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

अन्‌ ‘त्या’ आजीबाई वर्षभरानंतर कुटुंबात परतल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:21 IST

महापालिका शहरी बेघर निवारा केंद्राचे प्रयत्न, वर्षभर देखभाल बडनेरा : अमरावतीच्या बेलपुरा भागात २६ एप्रिल २०२० रोजी रात्री ९.३० ...

महापालिका शहरी बेघर निवारा केंद्राचे प्रयत्न, वर्षभर देखभाल

बडनेरा : अमरावतीच्या बेलपुरा भागात २६ एप्रिल २०२० रोजी रात्री ९.३० च्या सुमारास एक वृद्धा आजारी अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडली होती. महापालिका शहरी बेघर निवारा केंद्राने वर्षभर या वृद्धेची देखभाल केली. त्यांच्याच प्रयत्नांतून ही वृद्धा मंगळवारी कुटुंबात परतली. पार्वताबाई भालेराव (७२) असे या महिलेचे नाव आहे.

अमरावती महापालिकेच्या शहरी बेघर निवारा केंद्राला भ्रमणध्वनीद्वारे माहिती मिळाल्यानंतर चमू बेलपुरा येथील घटनास्थळी पोहोचली आणि आजारी वृद्धेला रात्रीच औषधोपचार केले. यानंतर बडनेरा येथील संत गाडगेबाबा शहरी बेघर लोकांच्या निवारा केंद्रात २६ एप्रिल रोजी तिला ठेवण्यात आले. प्रारंभी त्यांची प्रकृती व्यवस्थित नव्हती. मात्र, सात दिवसांनी आजारातून बाहेर पडल्यानंतर हळूहळू त्यांची आधार केंद्रातील कर्मचाऱ्यांनी विचारपूस चालविली. त्या अचलपूर येथील मिल कॉलनी येथील रहिवासी असल्याचे पुढे आले. त्यानंतर त्यांची सोशल मीडियावर माहिती टाकण्यात आली. महापालिकेचे सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे व शहर अभियान व्यवस्थापक भूषण बाळे यांनी ओळख पटली जावी म्हणून मोबाईलवर या वृद्धेचा स्टेटस ठेवला. अचलपूर नगर परिषदेशी संपर्क साधण्यात आला. तेथील शहर अभियान व्यवस्थापक अजय मोरस्कर यांनी अखेर पार्वताबाई भालेराव यांचा पत्ता शोधला. त्यांनी लगोलग संस्थेचे अध्यक्ष राजीव बसवनाथे (रा. महेंद्र कॉलनी, अमरावती) यांना ही माहिती कळविली.

शहरी बेघर निवारा केंद्रात एक वर्षापासून वास्तव्यास असलेल्या पार्वताबाईंनी दोनदा मृत्यूवर मात केली. निवारावासी ताराबाई व अन्य त्यांची खूप काळजी घ्यायच्या. व्यवस्थापक ज्योती राठोड यांनी तर त्यांची स्वतःची आई म्हणून काळजी घेतली. काळजीवाहक किशोर, रोहित यांचा त्यांच्याशी सेवेतून जिव्हाळा निर्माण झाला होता. ४ मे रोजी पार्वताबाईंना घरची मंडळी घेऊन जायला आल्यावर मी घरी जाणार नाही. मी इथेच राहते, असे त्या वारंवार सांगत होत्या. त्या केंद्र सोडून जात असताना उपस्थितांचे मन हेलावून गेले आणि कंठ दाटून आला. काहींच्या डोळ्यातून नकळत अश्रू आले.

महापालिका राष्ट्रीय उपजीविका अभियान अंतर्गत पब्लिक एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीद्वारे संचालित आधार शहरी बेघर लोकांसाठी निवारा, संत गाडगेबाबा शहरी बेघर लोकांसाठी निवारा परतवाडा, अचलपूर यांच्या संयुक्त प्रयत्नाने पुन्हा आजीबाईंना घरी परत जाता आले, हे विशेष.

---------------

पार्वताबाई या नागपूर येथून आल्या होत्या. आजारी असल्याने त्या रस्ता भटकल्या व बेलपुरा भागात आढळल्या. वर्षभरानंतर त्यांची मुलगा व मुलीशी भेट झाल्याचा आम्हाला आनंद आहे. शासनाच्या योजनेमुळे बेघर बांधवांना लाभ होत आहे.

- राजीव बसवनाथे, अध्यक्ष, आधार केंद्र