शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
4
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
5
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
6
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
7
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
8
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
10
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
11
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
12
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
13
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
14
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
15
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
16
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
17
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
18
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
19
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
20
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश

विभागीय आयुक्तांशी तासभर चर्चा; तरीही पांढरी खानमपूर प्रकरणात तोडगा नाहीच

By उज्वल भालेकर | Updated: March 7, 2024 22:20 IST

प्रवेशद्वाराचे काम सुरू करा, नंतरच गावी परतणार; बौद्ध समाजबांधव निर्णयावर ठाम

अमरावती : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपूर येथील गाव सोडलेले शेकडो बौद्धबांधव गुरुवारी विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकले. यावेळी विभागीय आयुक्तांशी आंदोलकांच्या प्रतिनिधींशी तासभर चर्चा झाली; परंतु या चर्चेमध्ये कोणतीही ठोस निर्णय न झाल्याने अखेर विभागीय आयुक्त कार्यालयावरच बौद्ध समाजबांधवांनी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी विविध सामाजिक व राजकीय संघटनांनीदेखील या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.

पांढरी खानमपूर येथील गावातील मुख्य प्रवेशद्वाराला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यावरून दोन समाजामध्ये वाद सुरू झाला आहे. मागील महिन्याभरापासून हा वाद पेटला असून ६ मार्चला बौद्ध समाजबांधवांनी प्रवेशद्वाराच्या मागणीसाठी आपल्या मुला-बाळांसह तसेच गुरे-ढोरांना सोबत घेत गाव सोडले. गुरुवारी हे सर्व बौद्धबांधवांनी अमरावती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एकत्र येत विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी गावातील काही ग्रामपंचायत सदस्य, डॉ. कमल गवई तसेच इतर प्रतिनिधींनी विभागीय आयुक्तांशी तासभर चर्चा केली. परंतु त्यानंतरही कोणताही ठोस मार्ग न निघाल्याने आंदोलनकर्त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयावरच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत प्रवेशद्वाराच्या बांधकामाला सुरुवात होत नाही, तोपर्यंत गावी पुन्हा परतणार नसल्याच्या भूमिकेवर बौद्ध समाजबांधव ठाम राहतील, असा निर्णय घेतला.आयुक्तांनी मागितला तीन दिवसांचा अवधीविभागीय आयुक्त निधी पाण्डेय यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये त्यांनी गावातील नागरिकांची बाजू ऐकून घेतल्यानंतर तीन दिवस आलेल्या शासकीय सुट्ट्यांमुळे सोमवारी जिल्हाधिकारी यांच्याशी बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन देत तो पर्यंत पुन्हा गावात परतण्याची विनंती केली. गावांमध्ये पूर्ण संरक्षण आणि तसेच संबधित ॲट्रॉसिटी दाखल असलेला आरोपी कमलेश पटेल व इतर १८ जणांना अटक करण्यासंदर्भातही यावेळी चर्चा झाली. परंतु बौद्धबांधव प्रवेशद्वाराचे कामाला जोपर्यंत सुरुवात होत नाही तोपर्यंत पुन्हा गावात न परतण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याने ठोस निर्णय झाला नाही.

टॅग्स :Amravatiअमरावती