शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

विभागीय आयुक्तांशी तासभर चर्चा; तरीही पांढरी खानमपूर प्रकरणात तोडगा नाहीच

By उज्वल भालेकर | Updated: March 7, 2024 22:20 IST

प्रवेशद्वाराचे काम सुरू करा, नंतरच गावी परतणार; बौद्ध समाजबांधव निर्णयावर ठाम

अमरावती : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपूर येथील गाव सोडलेले शेकडो बौद्धबांधव गुरुवारी विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकले. यावेळी विभागीय आयुक्तांशी आंदोलकांच्या प्रतिनिधींशी तासभर चर्चा झाली; परंतु या चर्चेमध्ये कोणतीही ठोस निर्णय न झाल्याने अखेर विभागीय आयुक्त कार्यालयावरच बौद्ध समाजबांधवांनी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी विविध सामाजिक व राजकीय संघटनांनीदेखील या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.

पांढरी खानमपूर येथील गावातील मुख्य प्रवेशद्वाराला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यावरून दोन समाजामध्ये वाद सुरू झाला आहे. मागील महिन्याभरापासून हा वाद पेटला असून ६ मार्चला बौद्ध समाजबांधवांनी प्रवेशद्वाराच्या मागणीसाठी आपल्या मुला-बाळांसह तसेच गुरे-ढोरांना सोबत घेत गाव सोडले. गुरुवारी हे सर्व बौद्धबांधवांनी अमरावती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एकत्र येत विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी गावातील काही ग्रामपंचायत सदस्य, डॉ. कमल गवई तसेच इतर प्रतिनिधींनी विभागीय आयुक्तांशी तासभर चर्चा केली. परंतु त्यानंतरही कोणताही ठोस मार्ग न निघाल्याने आंदोलनकर्त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयावरच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत प्रवेशद्वाराच्या बांधकामाला सुरुवात होत नाही, तोपर्यंत गावी पुन्हा परतणार नसल्याच्या भूमिकेवर बौद्ध समाजबांधव ठाम राहतील, असा निर्णय घेतला.आयुक्तांनी मागितला तीन दिवसांचा अवधीविभागीय आयुक्त निधी पाण्डेय यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये त्यांनी गावातील नागरिकांची बाजू ऐकून घेतल्यानंतर तीन दिवस आलेल्या शासकीय सुट्ट्यांमुळे सोमवारी जिल्हाधिकारी यांच्याशी बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन देत तो पर्यंत पुन्हा गावात परतण्याची विनंती केली. गावांमध्ये पूर्ण संरक्षण आणि तसेच संबधित ॲट्रॉसिटी दाखल असलेला आरोपी कमलेश पटेल व इतर १८ जणांना अटक करण्यासंदर्भातही यावेळी चर्चा झाली. परंतु बौद्धबांधव प्रवेशद्वाराचे कामाला जोपर्यंत सुरुवात होत नाही तोपर्यंत पुन्हा गावात न परतण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याने ठोस निर्णय झाला नाही.

टॅग्स :Amravatiअमरावती