शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

विषाणूजन्य आजाराने अमरावतीकर बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 22:42 IST

पावसाबरोबर तापमानात सातत्याने होत असलेल्या बदलांमुळे शहरात विषाणूजन्य आजारांचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे. सर्दी, खोकला, ताप याचबरोबर पोटाचे विकार आणि उलट्या जुलाब आदी आजारांनी ग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.

ठळक मुद्देडेंग्यूृ संशयितांची संख्या वाढलीगॅस्ट्रोचीही लागण

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पावसाबरोबर तापमानात सातत्याने होत असलेल्या बदलांमुळे शहरात विषाणूजन्य आजारांचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे. सर्दी, खोकला, ताप याचबरोबर पोटाचे विकार आणि उलट्या जुलाब आदी आजारांनी ग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. दरम्यान जुलै महिन्याच्या पहिल्या १० दिवसांत डेंग्यू सदृश रुग्णांची संख्या ४३ वर पोहोचली आहे. त्या सर्व संशयितांचे रक्तजलनमुने परिक्षणासाठी रक्तजलनमुने यवतमाळ येथे पाठविण्यात आले आहेत. पावसाळा सुरू होताच डेंग्यूसह अन्य आजारांनी डोके वर काढले आहे.१ ते १० जुुलैदरम्यान शहरातील विविध खासगी रुग्णांलायत डेंग्यूसदृश रुग्ण उपचारार्थ दाखल असून डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या संशयित रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान ज्या भागात डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आलेत. शहरातील त्या परिसरात महापालिकेतर्फे उपाययोजना राबविल्या जात आहेत. महालक्ष्मीनगर, दस्तुरनगर, अकोली रोड, बडनेरा, चैतन्य कॉलनी, चक्रधरनगर, गाडगेनगर, दत्ता कॉलनी या भागात हे डेंग्यूसदृश रुग्ण आढळले आहेत. त्या भागातील रुग्णांच्या घरांसह अन्य परिसराची तपासणी केली असता अनेक घरातील कुलर, पाण्याचे हौद आणि झाडांच्या कुंड्यांमध्ये असलेल्या पाण्यात डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या आहेत. पाण्याचे हौद खाली करण्यास सांगितले असता अनेक जण नकार देत असल्याची वस्तुस्थितीही लक्षात आली आहे. दरम्यान अजय डफळे, मनोज निचत, सचिन काळे, राजेंद्र ढोरे, अमोल अवघड, भुपेश भोंड या डॉक्टरांसह दयासागर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांचे रक्तजलनमुने घेण्यात आले आहेत.2801जणांना गॅस्ट्रोजानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत महापालिका क्षेत्रात २८०१ रुग्णांना गॅस्ट्रोची लागण झाली. अतिसाराचेही ५२ रुग्ण आढळले, तर ८ रुग्णांना डिसेंट्री, १५ जणांना कावीळ, तर ७६ रुग्णांना विषमज्वराची लागण झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. सहा महिन्यांत शहरात कॉलराची कुणालाही लागण झाली नाही.अशी घ्यावी खबरदारीथंडी वाजून ताप भरणे, मोठ्या प्रमाणात अंगदुखी आणि अंगावर लालसर रंगाचे चट्टे दिसत असल्यास ती डेंग्यू तापाची लक्षणे असू शकतात. डेंग्यूमध्ये पूर्ण विश्रांती घेणे आवश्यक आहे. डेंग्यूचे डास साठलेल्या पाण्यात होत असल्याने घरात किंवा घराच्या आवारात पाणी साठणार नाही याची खबरदारी घेण्याची गरज आहे. श्वासाचे आजार, ताप, सर्दी, खोकला यांच्यापासून बचाव करण्यासाठी आजाराची लक्षणे दिसल्यास पुरेशी विश्रांती घ्या. पावसात भिजणे टाळा. कोमट पाण्याच्या गुळण्या करणे, गरम पाणी पिणे हे उपाय करा. अशुद्ध पाणी प्यायल्याने होणारे पोटाचे विकार, उलटया, जुलाब टाळण्यासाठी फिल्टरचा वापर करा. गाळून, उकळून थंड केलेले पाणी प्या. पाण्यामार्गे पसरणारे आजार गंभीर असल्याने औषध विके्रत्यांकडून परस्पर औषधी न घेता डॉक्टरांचा सल्ला घ्या.