शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

विषाणूजन्य आजाराने अमरावतीकर बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 22:42 IST

पावसाबरोबर तापमानात सातत्याने होत असलेल्या बदलांमुळे शहरात विषाणूजन्य आजारांचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे. सर्दी, खोकला, ताप याचबरोबर पोटाचे विकार आणि उलट्या जुलाब आदी आजारांनी ग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.

ठळक मुद्देडेंग्यूृ संशयितांची संख्या वाढलीगॅस्ट्रोचीही लागण

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पावसाबरोबर तापमानात सातत्याने होत असलेल्या बदलांमुळे शहरात विषाणूजन्य आजारांचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र समोर येत आहे. सर्दी, खोकला, ताप याचबरोबर पोटाचे विकार आणि उलट्या जुलाब आदी आजारांनी ग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. दरम्यान जुलै महिन्याच्या पहिल्या १० दिवसांत डेंग्यू सदृश रुग्णांची संख्या ४३ वर पोहोचली आहे. त्या सर्व संशयितांचे रक्तजलनमुने परिक्षणासाठी रक्तजलनमुने यवतमाळ येथे पाठविण्यात आले आहेत. पावसाळा सुरू होताच डेंग्यूसह अन्य आजारांनी डोके वर काढले आहे.१ ते १० जुुलैदरम्यान शहरातील विविध खासगी रुग्णांलायत डेंग्यूसदृश रुग्ण उपचारार्थ दाखल असून डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या संशयित रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान ज्या भागात डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आलेत. शहरातील त्या परिसरात महापालिकेतर्फे उपाययोजना राबविल्या जात आहेत. महालक्ष्मीनगर, दस्तुरनगर, अकोली रोड, बडनेरा, चैतन्य कॉलनी, चक्रधरनगर, गाडगेनगर, दत्ता कॉलनी या भागात हे डेंग्यूसदृश रुग्ण आढळले आहेत. त्या भागातील रुग्णांच्या घरांसह अन्य परिसराची तपासणी केली असता अनेक घरातील कुलर, पाण्याचे हौद आणि झाडांच्या कुंड्यांमध्ये असलेल्या पाण्यात डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या आहेत. पाण्याचे हौद खाली करण्यास सांगितले असता अनेक जण नकार देत असल्याची वस्तुस्थितीही लक्षात आली आहे. दरम्यान अजय डफळे, मनोज निचत, सचिन काळे, राजेंद्र ढोरे, अमोल अवघड, भुपेश भोंड या डॉक्टरांसह दयासागर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांचे रक्तजलनमुने घेण्यात आले आहेत.2801जणांना गॅस्ट्रोजानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत महापालिका क्षेत्रात २८०१ रुग्णांना गॅस्ट्रोची लागण झाली. अतिसाराचेही ५२ रुग्ण आढळले, तर ८ रुग्णांना डिसेंट्री, १५ जणांना कावीळ, तर ७६ रुग्णांना विषमज्वराची लागण झाल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. सहा महिन्यांत शहरात कॉलराची कुणालाही लागण झाली नाही.अशी घ्यावी खबरदारीथंडी वाजून ताप भरणे, मोठ्या प्रमाणात अंगदुखी आणि अंगावर लालसर रंगाचे चट्टे दिसत असल्यास ती डेंग्यू तापाची लक्षणे असू शकतात. डेंग्यूमध्ये पूर्ण विश्रांती घेणे आवश्यक आहे. डेंग्यूचे डास साठलेल्या पाण्यात होत असल्याने घरात किंवा घराच्या आवारात पाणी साठणार नाही याची खबरदारी घेण्याची गरज आहे. श्वासाचे आजार, ताप, सर्दी, खोकला यांच्यापासून बचाव करण्यासाठी आजाराची लक्षणे दिसल्यास पुरेशी विश्रांती घ्या. पावसात भिजणे टाळा. कोमट पाण्याच्या गुळण्या करणे, गरम पाणी पिणे हे उपाय करा. अशुद्ध पाणी प्यायल्याने होणारे पोटाचे विकार, उलटया, जुलाब टाळण्यासाठी फिल्टरचा वापर करा. गाळून, उकळून थंड केलेले पाणी प्या. पाण्यामार्गे पसरणारे आजार गंभीर असल्याने औषध विके्रत्यांकडून परस्पर औषधी न घेता डॉक्टरांचा सल्ला घ्या.