शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

अमरावती विद्यापीठाच्या गुणपत्रिकेवर आता अंकित होणार आईचेही नाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 15:27 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना आता गुणपत्रिकेवर आईचे नाव अंकित असणार आहे.

ठळक मुद्देसिनेट सभेत निर्णय परीक्षा अर्जासोबत आईचे नाव नमूद करण्याची तयारी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना आता गुणपत्रिकेवर आईचे नाव अंकित असणार आहे. येत्या काळात पदवीवरही आईचे नाव असेल, असा निर्णय शुक्रवारी सिनेट सभेत घेण्यात आला. गजानन कडू यांनी सादर केलेल्या प्रस्तावावर कुलगुरूंनी तसा निर्णय जाहीर केला.माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर आईचे नाव अंकित करून वितरित केल्या आहेत. राज्यात मुंबई, पुणे, औरंगाबाद विद्यापीठांनीदेखील गुणपत्रिका, पदवीवर आईचे नाव अंकित करून विद्यार्थ्यांना सोपविल्या आहेत. मात्र, गुणपत्रिकेवर आईचे नाव असावे, या आशयाचा प्रस्ताव सिनेट सदस्य गजानन कडू यांनी सादर केला. प्रारंभी येत्या शैक्षणिक सत्रापासून ही बाब शक्य नसल्याची नकारघंटा परीक्षा व मूल्यांकन विभागाचे संचालक हेमंत देशमुख यांची होती. मात्र, या प्रस्तावाला विवेक देशमुख यांनी बळ दिले. अशातच भीमराव वाघमारे यांनीदेखील उडी घेतली. वादंग होऊ नये, यासाठी कुलगुरू चांदेकरांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, विवेद देशमुख यांनी विद्यापीठ प्रशासनाच्या ‘गोलमाल’ भूमिकेवर जोरदार टीका केली. एखादा नवीन सदस्य धोरणात्मक निर्णय घेऊन विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रस्ताव दाखल करतो. मात्र, सदर सदस्याला बोलू न देता तो प्रस्ताव मंजूर झाल्याची बोळवण केली जाते, असा आरोप विवेक देशमुख यांनी केला. दरम्यान, परीक्षा अर्ज सुधारित करण्यासाठी विद्वत परिषदेसमोर हा विषय निर्णयार्थ आहे. याविषयी निर्णय होताच पदवी, गुणपत्रिकेवर वडिलांसह आईचे नावसुद्धा प्रकाशित होईल, असा ठाम विश्वास परीक्षा व मूल्यांकन विभागाचे संचालक हेमंत देशमुख यांनी सभागृहात दर्शविला. परीक्षा अर्जात आजमितीला एका कॉलममध्ये आईचे नाव आहे. त्यामुळे गुणपत्रिकांवर विद्यार्थ्यांना देणे शक्य असल्याचे भीमराव वाघमारे यांनी सांंगितले. कुलगुरु मुरलीधर चांदेकर यांनी सिनेट सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन येत्या शैक्षणिक सत्रापासून गुणपत्रिकांवर आईचे नाव असेल, असा निर्णय दिला.

‘‘परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून तीन वर्षांनंतर पदवीवर आईचे नाव प्रकाशित असणार आहे. सिनेट सभेत झालेल्या निर्णयानुसार गुणपत्रिकेवर आईचे नाव अंकित करूनच विद्यार्थ्यांना ती दिली जाईल.- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन विभाग.

टॅग्स :AmravatiअमरावतीEducation Sectorशिक्षण क्षेत्र