शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

अमरावती विद्यापीठात ५० गुणांच्या प्रश्नावर १०० गुणांची खैरात 

By महेश गलांडे | Updated: November 1, 2020 22:19 IST

सिनेट सदस्यांचा आरोप : विद्यापीठाचे परिपत्रक विराेधाभास निर्माण करणारे

ठळक मुद्देमहाविद्यालयांना विषयनिहाय बहुपर्यायी ४० प्रश्नांच्या प्रश्नपत्रिका तयार कराव्या लागल्या असून, ४० पैकी कोणतेही २० प्रश्न सोडवावे लागतील. विद्यर्थी पूर्ण प्रश्न सोडवू शकतील.

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी ५० गुणांचे प्रश्न सोडविल्यास १०० गुण मिळतील, या आशयाचे परिपत्रक जारी केले आहे. त्यामुळे हे परित्रक विसंगती आणि विरोधाभास निर्माण करणारे आहे, असा आरोप सिनेट सदस्य विवेक देशमुख यांनी केला आहे. परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांनी २४ ऑक्टोबर रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकावर सिनेट सदस्य विवेक देशमुख यांनी आक्षेप घेतला. अमरावती विद्यापीठाने बहुपर्यायी प्रश्नावली तयार करणे, परीक्षा घेणे, वेळापत्रक तयार करणे, मूल्यांकन, गुणदान आदी बाबी महाविद्यालयांवर सोपविल्या आहेत. २६ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. 

महाविद्यालयांना विषयनिहाय बहुपर्यायी ४० प्रश्नांच्या प्रश्नपत्रिका तयार कराव्या लागल्या असून, ४० पैकी कोणतेही २० प्रश्न सोडवावे लागतील. विद्यर्थी पूर्ण प्रश्न सोडवू शकतील. मात्र, मू्ल्यांकन करताना अचूक २० प्रश्न तपासले जातील, असे परीक्षा संचालकांनी म्हटले आहे. प्रत्येक प्रश्नाला दोन गुण मिळतील. त्यामुळे ४० पैकी ५० टक्के प्रश्नांची उत्तरे बरोबर असल्यास एका प्रश्नास दोन गुण याप्रमाणे ४० गुण म्हणजे १०० टक्के गुण प्राप्त होतील. ५० टक्के प्रश्नांच्या अचूक उत्तरावर १०० टक्के गुणांची खैरात हा अफलातून प्रयोग असल्याची टीका विवेक देशमुख यांनी केली आहे. निकालाअंती याची प्रचिती येईल, असा दावा त्यांनी केला.

बहुपर्यायी प्रश्नावलीमध्ये एका प्रश्नासाठी चार उत्तरे आहेत. त्यामुळे विद्यार्थी बेस्ट प्रश्न सोडवतील, त्याचे मूल्यांकन करण्यात येईल. कमीत कमी २० प्रश्न सोडविण्याचे निश्चित आहे. अधिक प्रश्न सोडविल्यास विद्याथ्यार्ंना तसे गुण दिले जातील.- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ. अमरावती विद्यापीठ. 

टॅग्स :examपरीक्षाAmravatiअमरावती