शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

Amravati: नव्वद वर्षीय आजीने दिला पेपर, मात्र ७ हजार निरक्षर गैरहजर 

By जितेंद्र दखने | Updated: March 18, 2024 23:41 IST

Amravati News: नवभारत साक्षरता कार्यक्रमात पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी जिल्हाभरातील १ हजार ६०३ परीक्षा केंद्रांवर रविवारी, १७ मार्च रोजी पार पडली. उल्लास ॲपवर सुमारे ३१ हजार ६९७ असाक्षरांची नोंदणी करण्यात आली आहे.

- जितेंद्र दखणे  अमरावती - नवभारत साक्षरता कार्यक्रमात पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी जिल्हाभरातील १ हजार ६०३ परीक्षा केंद्रांवर रविवारी, १७ मार्च रोजी पार पडली. उल्लास ॲपवर सुमारे ३१ हजार ६९७ असाक्षरांची नोंदणी करण्यात आली आहे. यापैकी २४ हजार ६५२ परीक्षार्थ्यांपैकी १६ हजार ८७५ महिला व ७ हजार ७७७ पुरुष परीक्षार्थ्यांनी परीक्षेला हजेरी नोंदवित पेपर सोडविला आहे. विशेष म्हणजे नव्वद वर्षीय आजीबाईने दिला पेपर मात्र ७ हजार ४५ जण परीक्षेला गैरहजर होते. नवभारत साक्षरता अभियानांतर्गत नोंदणी झालेल्या प्रौढ निरक्षरांची रविवारी एकाचवेळी राज्यभरात परीक्षा घेण्यात आली. केंद्र सरकारने शिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून ही परीक्षा आयोजित केली होती. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कधीही परीक्षा केंद्रांवर या अन् परीक्षा द्या, अशी सवलत देण्यात आली होती. त्यामुळे विविध गावांतील नोंदणीकृत निरक्षर सकाळीच शेती कामासाठी गेले. अन् दुपारी जेवण आटोपून परीक्षा केंद्रांवर हजेरी नोंदवित परीक्षा दिली नव्वद वर्षीय लिलाबाईनी सोडविला पेपरनव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत रविवारी पार पडलेल्या चापणीत परीक्षेत मोर्शी तालुक्यातील शिरखेड केंद्रातंर्गत येणाऱ्या सावरखेड या केंद्रावर लिलाबाई गाेरखनाथ हिरडे या नव्वद वर्षीय आजीबाईनी पेपर सोडविला.या आजीबाईचे केंद्रप्रमुख अब्दुल राजिक हुसेन यांनी पुष्पगुच्छ देवून गौरव केला. पुरुषांपेक्षा महिला उत्साहीनवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात महापालिका क्षेत्रासह १५ तालुक्यांत १७ मार्च रोजी घेण्यात आलेल्या पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणीला उल्लास ॲपवरील नोंदणी केलेल्या ३१६९७ पैकी २४ हजार ६५२ निरक्षरांमध्ये सर्वाधिक १६ हजार ८७५ महिलांनी परीक्षेला हजेरीला लावली होती. तर ७ हजार ७७७ पुरुष मात्र परीक्षेत सहभाग नोंदविला. त्यामुळे या परीक्षेत महिलांचा सहभाग अन् उत्साह अधिक असल्याचे दिसून आले. ‘उल्लास ॲप’वर अशी आहे नोंदणीएकूण नोंदणी ३१६९७महिला-२१२५०पुरुष-१०४४७ नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ‘उल्लास ॲप’वर सुमारे ३१ हजार ६९७ जणांची नोंदणी झाली आहे. यापैकी २४ हजार ६५२ जणांनी १६०३ परीक्षा केंद्रांवर परीक्षा दिली आहे. मात्र, ७ हजार ४२ परीक्षार्थी परीक्षेला गैरहजर होते.-सय्यद राजीक, शिक्षणाधिकारी, योजना

टॅग्स :Amravatiअमरावतीexamपरीक्षा