शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीनेच घडविले, परतफेड करण्याची वेळ आता माझी!

By admin | Updated: November 7, 2015 00:05 IST

अमरावतीच्या भूमीत मी घडलो. पालकमंत्रिपदापर्यंतची झेपही याच भूमीची देण. आता वेळ माझी आहे.

पालकमंत्री प्रवीण पोटे : भूषणावह शहरनिर्मितीचा संकल्प, गतिमान प्रशासनाचा प्रयोग जिल्ह्यात यशस्वीलोकमत मुलाखतअमरावती : अमरावतीच्या भूमीत मी घडलो. पालकमंत्रिपदापर्यंतची झेपही याच भूमीची देण. आता वेळ माझी आहे. विकासाच्या रुपाने शक्य ते सर्व अमरावतीला परत करायचे आहे. प्रत्येकाला भूषण वाटेल, असे शहर साकारण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली गेली आहेत... अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या बोलण्यातून मायभूच्या विकासाची तळमळ झिरपत होती. निमित्त होते 'लोकमत'शी बातचितीचे. पालकमंत्रिपदाची सुत्रे स्वीकारल्यापासून अमरावती जिल्ह््यातील प्रशासनात कमालिचा बदल घडवून आणणारे ना.पोटे पाटील गतीमान व्यवस्थेवर भर देतात. सामान्य माणसांकडून आलेल्या अर्ज, तक्रारींवर निश्चित कालावधीत निर्णय व्हायलाच हवा, हा त्यांनी आखून दिलेला नियम आता येथील जिल्हा प्रशासनाच्या कार्यप्रणालीचा अंग झाला आहे. या एका महत्त्वपूर्ण निर्णयाने प्रशासन दखलनीयरित्या गतीमान झाले आहे. या आदेशांनंतरही सामान्य दुर्लक्षित रहात असतील तर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाशेजारीच असलेल्या ना. पोटे यांच्या कार्यालयातून प्रशासनाला जाब विचरणारी यंत्रणाही कार्यरत आहे. दिवा, लवाजमा, सुरक्षा ताफा यात रमण्याऐवजी जिल्हा विकासाच्या कल्पनेत रमणारे पालकमंत्री वेळ मिळेल तेव्हा, एकटेच ड्राईव्ह करीत शहराची भ्रमंती करतात. बरेचदा ते अधिकाऱ्यांना शहर दाखवितात. प्रसिद्धी माध्यमांना टाळून अवलंबल्या जाणाऱ्या या कार्यप्रणालीमागील उद्देश सांगताना ना.पोटे म्हणतात, कधिकाळी लहानगे शहर असलेली आपली अमरावती आता महानगर झाले. शहराचा स्वभाव, शहराच्या गरजा एक नागरिक म्हणून मला ठाऊक आहेत. शहराची शक्तीस्थळे आणि शहराच्या मर्यादांशी मी परीचित आहे. प्रशासनाचा क्षमतापूर्ण वापर करून घ्यावयाचा असेल तर विविध प्रशासकीय प्रमुखांना शहरातील उणे अधिक कळायला हवे. काय नेमके केले की विकास होईल, काय रोखले की लोकोपयोगिता वाढेल या बाबी एकदा का प्रशासनाला कळल्यात की निश्चित दिशा मिळते. या दिशानिश्चितीसाठीच मला हा प्रयोग महत्त्वपूर्ण वाटतोे. अमरावती शहराचा समावेश 'स्मार्ट सिटीं'च्या यादीत होणार की नाही याबाबत अमरावतीकरांना धाकधूक असतानाच ना.पोटे यांच्या ठोस प्रयत्नांनी शहराचा स्मार्ट यादीत समावेश झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मार्गदर्शन याकामी महत्त्वूपर्ण ठरल्याचे ना.पोटे आवर्जून सांगतात. या दोन नेतृत्त्वांमुळेच शहर विकासाच्या कल्पना प्रत्यक्षात साकारतील असा विश्वास ना. पोटे यांना आहे. स्मार्ट सिटी निर्मितीच्या अनुशंगाने दिल्लीहून आलेल्या विशेष अधिकाऱ्यांच्या चमुसोबत ना.पोटे यांनी स्वत: शहरभर दौरा करून रस्ते, मल्टिप्लेक्स पार्किंग कुठे व्हावेत याबाबत मार्गदर्शन केले. विकासकार्यातील त्यांचा हा सक्रीय सहभाग दखलनीय ठरला आहे. शहराचा कायापालट करण्यासाठीची पायाभूत व्यवस्था तयार करण्याच्या दिशेने शासन-प्रशासन स्तरावर अधिकृत सुरुवात झाली आहे. तिनेक वर्षांत त्याचे प्रत्यंतर येईलच, असा विश्वास ना.पोटे यांनी व्यक्त केला. 'स्मार्ट सिटी' निर्मितीसाठी आतापर्यंत घेतलेल्या परिश्रमांना फळ आले. आता प्रत्यक्ष शहर साकारण्याचा टप्पा पुढ्यात आला आहे. त्यासाठी जसा सर्वपक्षीय तसाच तमाम जनतेचा सक्रीय सहभागही व्हावा, अशीच एकंदर व्यवस्था उभारण्याकडे ना.पोटे यांनी कटाक्ष ठेवला आहे. रस्ते, पूल, उडाणपूल, पार्किंग मल्टिप्लेक्स, उद्योग, वीज, पाणी यासंबंधिच्या सर्वांगिण मुद्यांवर लक्ष केंद्रीत केलेले असतानाच नव्या पिढीच्या बुद्धीमत्तेला पोषक वातावरण उपलब्ध व्हावे यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे ना. पोटे म्हणाले. जगाला गवसणी घालावी अशी तल्लख बुद्धीमत्ता अमरावती, विदर्भातील मुलांमध्ये असल्याचा विश्वास ना.पोटे नेहमीच व्यक्त करतात.