शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

अमरावतीनेच घडविले, परतफेड करण्याची वेळ आता माझी!

By admin | Updated: November 7, 2015 00:05 IST

अमरावतीच्या भूमीत मी घडलो. पालकमंत्रिपदापर्यंतची झेपही याच भूमीची देण. आता वेळ माझी आहे.

पालकमंत्री प्रवीण पोटे : भूषणावह शहरनिर्मितीचा संकल्प, गतिमान प्रशासनाचा प्रयोग जिल्ह्यात यशस्वीलोकमत मुलाखतअमरावती : अमरावतीच्या भूमीत मी घडलो. पालकमंत्रिपदापर्यंतची झेपही याच भूमीची देण. आता वेळ माझी आहे. विकासाच्या रुपाने शक्य ते सर्व अमरावतीला परत करायचे आहे. प्रत्येकाला भूषण वाटेल, असे शहर साकारण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली गेली आहेत... अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या बोलण्यातून मायभूच्या विकासाची तळमळ झिरपत होती. निमित्त होते 'लोकमत'शी बातचितीचे. पालकमंत्रिपदाची सुत्रे स्वीकारल्यापासून अमरावती जिल्ह््यातील प्रशासनात कमालिचा बदल घडवून आणणारे ना.पोटे पाटील गतीमान व्यवस्थेवर भर देतात. सामान्य माणसांकडून आलेल्या अर्ज, तक्रारींवर निश्चित कालावधीत निर्णय व्हायलाच हवा, हा त्यांनी आखून दिलेला नियम आता येथील जिल्हा प्रशासनाच्या कार्यप्रणालीचा अंग झाला आहे. या एका महत्त्वपूर्ण निर्णयाने प्रशासन दखलनीयरित्या गतीमान झाले आहे. या आदेशांनंतरही सामान्य दुर्लक्षित रहात असतील तर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाशेजारीच असलेल्या ना. पोटे यांच्या कार्यालयातून प्रशासनाला जाब विचरणारी यंत्रणाही कार्यरत आहे. दिवा, लवाजमा, सुरक्षा ताफा यात रमण्याऐवजी जिल्हा विकासाच्या कल्पनेत रमणारे पालकमंत्री वेळ मिळेल तेव्हा, एकटेच ड्राईव्ह करीत शहराची भ्रमंती करतात. बरेचदा ते अधिकाऱ्यांना शहर दाखवितात. प्रसिद्धी माध्यमांना टाळून अवलंबल्या जाणाऱ्या या कार्यप्रणालीमागील उद्देश सांगताना ना.पोटे म्हणतात, कधिकाळी लहानगे शहर असलेली आपली अमरावती आता महानगर झाले. शहराचा स्वभाव, शहराच्या गरजा एक नागरिक म्हणून मला ठाऊक आहेत. शहराची शक्तीस्थळे आणि शहराच्या मर्यादांशी मी परीचित आहे. प्रशासनाचा क्षमतापूर्ण वापर करून घ्यावयाचा असेल तर विविध प्रशासकीय प्रमुखांना शहरातील उणे अधिक कळायला हवे. काय नेमके केले की विकास होईल, काय रोखले की लोकोपयोगिता वाढेल या बाबी एकदा का प्रशासनाला कळल्यात की निश्चित दिशा मिळते. या दिशानिश्चितीसाठीच मला हा प्रयोग महत्त्वपूर्ण वाटतोे. अमरावती शहराचा समावेश 'स्मार्ट सिटीं'च्या यादीत होणार की नाही याबाबत अमरावतीकरांना धाकधूक असतानाच ना.पोटे यांच्या ठोस प्रयत्नांनी शहराचा स्मार्ट यादीत समावेश झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मार्गदर्शन याकामी महत्त्वूपर्ण ठरल्याचे ना.पोटे आवर्जून सांगतात. या दोन नेतृत्त्वांमुळेच शहर विकासाच्या कल्पना प्रत्यक्षात साकारतील असा विश्वास ना. पोटे यांना आहे. स्मार्ट सिटी निर्मितीच्या अनुशंगाने दिल्लीहून आलेल्या विशेष अधिकाऱ्यांच्या चमुसोबत ना.पोटे यांनी स्वत: शहरभर दौरा करून रस्ते, मल्टिप्लेक्स पार्किंग कुठे व्हावेत याबाबत मार्गदर्शन केले. विकासकार्यातील त्यांचा हा सक्रीय सहभाग दखलनीय ठरला आहे. शहराचा कायापालट करण्यासाठीची पायाभूत व्यवस्था तयार करण्याच्या दिशेने शासन-प्रशासन स्तरावर अधिकृत सुरुवात झाली आहे. तिनेक वर्षांत त्याचे प्रत्यंतर येईलच, असा विश्वास ना.पोटे यांनी व्यक्त केला. 'स्मार्ट सिटी' निर्मितीसाठी आतापर्यंत घेतलेल्या परिश्रमांना फळ आले. आता प्रत्यक्ष शहर साकारण्याचा टप्पा पुढ्यात आला आहे. त्यासाठी जसा सर्वपक्षीय तसाच तमाम जनतेचा सक्रीय सहभागही व्हावा, अशीच एकंदर व्यवस्था उभारण्याकडे ना.पोटे यांनी कटाक्ष ठेवला आहे. रस्ते, पूल, उडाणपूल, पार्किंग मल्टिप्लेक्स, उद्योग, वीज, पाणी यासंबंधिच्या सर्वांगिण मुद्यांवर लक्ष केंद्रीत केलेले असतानाच नव्या पिढीच्या बुद्धीमत्तेला पोषक वातावरण उपलब्ध व्हावे यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे ना. पोटे म्हणाले. जगाला गवसणी घालावी अशी तल्लख बुद्धीमत्ता अमरावती, विदर्भातील मुलांमध्ये असल्याचा विश्वास ना.पोटे नेहमीच व्यक्त करतात.