शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

अमरावतीकरांनो, सावधान !

By admin | Updated: November 7, 2015 00:06 IST

१८ महिन्यांपासून ३६ महिन्यांत दामदुप्पट, अधिक व्याजदर आणि आकर्षक परताव्याच्या प्रलोभनाला अमरावतीकर बळी पडले आहेत.

दीड वर्षात ७७ कोटींनी फसवणूक : सहा कंपन्यांविरुद्ध १५४९ तक्रारीलोकमत विशेषअमरावती : १८ महिन्यांपासून ३६ महिन्यांत दामदुप्पट, अधिक व्याजदर आणि आकर्षक परताव्याच्या प्रलोभनाला अमरावतीकर बळी पडले आहेत. मागील दीड वर्षांत तब्बल ७७ कोटी रूपयांनी त्यांचा खिसा कापला गेला. श्रीसूर्या, सात्विक इन्व्हेस्टमेंट, बीएचआर मल्टिस्टेट क्रेडिट को-आॅपरेटिव्ह, राणा लँडमार्क, वासनकर वेल्थ मॅनेजमेंट आणि चित्रांश टेक्नॉलॉजी या सहा कंपन्यांनी अमरावतीकरांना कोट्यवधी रूपयांनी गंडविले आहे. या ६ कंपन्यांविरोधात शहरातील ५ पोलीस ठाण्यांत तब्बल १,५४९ तक्रारी दाखल झाल्या आहेत. यातील बहुतांश कंपन्यांची मालमत्ता पोलिसांनी हस्तगत केली असली तरी लुबाडल्या गेलेल्या गुंतवणूकदारांना त्यांची कोट्यवधींची रक्कम परत मिळाली नाही. बीएचआर मल्टिस्टेट वगळता कोणत्याही खासगी वित्तीय संस्थांवर प्रशासक नसल्याने गुंतविलेली रक्कम परत मिळेलच, याबाबत शाश्वती नाही.या प्रकरणांत आकर्षक व्याजदर आणि परतावा देण्याचे प्रलोभन देत एजंट, दलाल, असोशिएटसची साखळी तयार केली. एजंटस्ना बनवेगिरीच्या या व्यवसायातून कोट्यवधींची बिदागी मिळाल्याने त्यांनी लोकांना अधिक गुंतवणूक करण्यास भाग पाडले. अधिक परतावा मिळत असल्याने लोक बळी पडले.