शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

अखेर अमरावती होणार ‘स्मार्ट सिटी’

By admin | Updated: July 30, 2015 00:13 IST

पहिल्या १० शहरांत स्थान : राज्यस्तरीय उच्चाधिकार समितीची हिरवी झेंडी, अंबानगरीची मोठी उपलब्धी

लोकमत शुभवर्तमानअमरावती : देशात १०० ‘स्मार्ट सिटीज’ तयार करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर राज्य सरकारच्या नगरविकास खात्याने त्यासाठीचा प्रस्ताव मंत्रीमंडळासमोर आणण्याची पुरेपूर तयारी केली होती. त्याअनुषंगाने बुधवारी पार पडलेल्या राज्यस्तरीय उच्चाधिकार समितीने हिरवी झेंडी दिली असून अमरावती शहराचे नाव ‘स्मार्ट सिटी’च्या यादीत समाविष्ट केले आहे. ही अमरावतीकरांसाठी मोठी उपलब्धी मानली जात आहे. राज्यात पहिल्या १० शहरांत अमरावतीचे नाव समाविष्ट झाल्यानंतर शहराच्या विकासाकरिता पाच वर्षांत एक हजार कोटी रूपये मिळणार आहेत. मात्र, महापालिकेला दरवर्षी ५० कोटी रुपये उभे करावे लागणार आहेत.‘स्मार्ट सिटी’ योजनेत सहभागी होण्यासाठी २६ महापालिका व ११ नगरपरिषदांनी प्रारुप प्रस्ताव तयार केले होते. जी शहरे स्वत:च्या ताकदीवर ५० कोटी वर्षाकाठी उभे करु शकतील, त्यांचाच या योजनेत समावेश करण्यात आला होता. प्राथमिक चाचणी पूर्ण करुन मंत्रीमंडळाच्या निवड समितीपुढे हा प्रस्ताव मांडला असता अमरावती शहराने निकष व अटी पूर्ण करुन स्पर्धेत बाजी मारली आहे. पहिल्या १० स्मार्ट शहरात अमरावतीचा समावेश होणे, ही बाब अमरावतीकरांसाठी गौरवाची मानली जात आहे.अमरावतीचे नाव या यादीत समाविष्ट झाल्यानंतर आता महापालिकेला नागरिकांच्या पायाभूत सोयी-सुविधांचा अंतर्भाव करुन नव्याने विकास आराखडा तयार करावा लागेल. त्याकरिता राज्य शासन ५० लाखांच्या अनुदानाची तरतूद करणार आहे. सांडपाणी व्यवस्थापन, घर तेथे शौचालय, दारिद्र्य निर्मूलन, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला प्राधान्य देत हा ‘डीपीआर’ तयार केला जाणार आहे. (प्रतिनिधी)२०३१ पर्यंत झोपडीमुक्त शहराचे स्वप्न‘स्मार्ट सिटीचा’ प्रारुप प्रस्ताव शासनाकडे सादर करताना महापालिकेने २०३१ पर्यंत अमरावती शहर झोपडपट्टी मुक्त करण्याची ग्वाही दिली आहे. हल्ली अमरावतीत १०२ घोषित झोपडपट्ट्या आहेत. नव्याने ३० ते ३५ झोपडपट्ट्या घोषित होण्याच्या रांगेत आहेत. शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी रमाई आवास योजना आणि केंद्र शासनाच्या सर्वधर्मियांसाठी प्रस्तावित घरकुल योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून गोरगरिब व सामान्य कुटुंबांना हक्काचे घरकुल देण्याचे प्रस्तावित आहे. भविष्यात या मिळतील सुविधा‘स्मार्ट’ होणाऱ्या अमरावती शहराला भविष्यात २४ तास पाणी पुरवठा, भुयारी गटार योजना, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, वाहतूक व दळणवळण व्यवस्था, शहरी दारिद्र्य निर्मूलन, शहरी पर्यावरण, एलईडी दिव्यांचा वापर, सार्वजनिक आरोग्य सुविधा, अत्याधुनिक ई-गर्व्हनन्स, आॅनलाईन परवाने आदींच्या सुविधा मिळणार आहेत. २०० कोटीतून साकारणार ‘स्मार्ट’ शहरकेंद्र व राज्य शासनाच्या अुनदानातून ‘स्मार्ट अमरावती’ शहर साकारायचे आहे. दरवर्षी ५० कोटी रूपयांची जुळवाजुळव करून पुढील चार वर्षांत व्यवस्थित आर्थिक नियोजनाद्वारे हे शहर स्मार्ट करायचे आहे. मात्र, अमरावतीने सर्व कसोट्या पूर्ण करुन या योजनेत स्वत:चे स्थान पक्के केले आहे, हे विशेष. आयुक्तांनी पूर्ण केली अडथळ्यांची शर्यंतअमरावती महापालिकेची आर्थिक स्थिती नाजुक असताना आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी ‘स्मार्ट सिटी’ योजनेत अमरावती शहराचे नाव समाविष्ट व्हावे, यासाठी प्रयत्नांची परकाष्ठा केली. अमरावती ते मुंबई असा सलग प्रवास करुन प्रस्तावात येणाऱ्या अडचणी दूर केल्यात. त्याकरीता आयुक्त गुडेवार यांना नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांचे सहकार्य मिळाले आहे. अमरावतीचे नाव स्मार्ट सिटीत समाविष्ट झाल्यामुळे आयुक्त गुडेवार यांनी केलेले परिश्रम फळले, असे म्हटले जात आहे. ३१ जुलै रोजी अधिकृत घोषणा२६ महापालिकांमधून अमरावतीने पहिल्या १० शहरांत स्थान मिळविले आहे. राज्यस्तरीय उच्चाधिकार समितीद्वारे अमरावतीला ‘स्मार्ट सिटी’ यादीत समाविष्ट करावे, अशी शिफारस करेल आणि शासन ३१ जुलै रोजी त्याअनुषंगाने अधिकृत घोषणा करणार असल्याची माहिती आहे.३१ डिसेंबरपर्यंत होणार प्रवास पूर्णपहिल्या टप्प्यात १० शहरांचा स्मार्ट सिटीत समावेश झाल्यानंतर राज्य शासन त्रयस्थ एजन्सीजच्या माध्यमातून या शहरांची चाचपणी करेल. प्रस्तावात नमुद बाबी संबंधित शहर पूर्ण करु शकते अथवा नाही, याची पाहणी केली जाईल.३१ डिसेंबरपर्यंत राज्य शासन केंद्र शासनाकडे पाठविल्या जाणाऱ्या प्रस्तावाचा प्रवास पूर्ण करेल, अशी माहिती आहे.