शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीच्या आशिषने अनुभवले नेपाळमधील मृत्यूचे तांडव

By admin | Updated: April 29, 2015 00:12 IST

नेपाळ येथे झालेल्या भुकंपात अमरावतीच्या आशिषसह विदर्भातील ६३ पर्यटकांनी मुत्यूचा थरार अनुभवला.

वैभव बाबरेकर अमरावतीअमरावती : नेपाळ येथे झालेल्या भुकंपात अमरावतीच्या आशिषसह विदर्भातील ६३ पर्यटकांनी मुत्यूचा थरार अनुभवला. मृत्यूच्या दाढेतून सुटका झाल्याचा जितका आनंद आशिषला आहे, तितक्याच वेदना मृत पावलेल्या लोकांसाठी आशिष व्यक्त करीत होता. व्हीएमव्ही कॉलेजमागील गणेशपेठ येथील रहिवासी असलेला आशिष हरिद्वार बोके २२ एप्रिल २०१५ रोजी सॅप नृट्रियन्स कंपनीतर्फे विदर्भातील ६३ कृषी केंंद्र संचालकांसोबत काठमांडू आणि पोखरा येथे सहलीला गेले होते. शनिवारी सर्व जण काठमांडू पासून ७० किलोमिटर दूर असणाऱ्या मनोकामना मंदिर परिसरात निसर्गाचा आनंद घेत होते. दरम्यान ११.४६ वाजताच्या सुमारास ९० सेंकदाचा भुकंपाच्या धक्क्याने सर्वानाचा हादरून टाकले. काय होत आहे, कसे होत आहे. हे समजण्याचा पहिला अनुभव घेत सर्वांनीच पळापळ सुरु केली होती. सुरक्षित जागेवर सर्व जण पोहचल्यावर आजूबाजूला भयावह परिस्थीती त्यांच्या नजरेस पडली. भुकंपामुळे पहाडावरील रोप वे वरील केबल कार अचानक खाली कोसळली व पहाडावरून भुसखलन झाल्याने तब्बल ४० जण त्यांच्या डोळ्यादेखत मृत्यूमुखी पडले. हे दृष्य आशिषसोबतच्या सर्व पर्यटकांनी अनुभवले. भुकंपाचे धक्के पाहून कंपनीचा वाहनचालक वाहने सोडून सुरक्षीत ठिकाणी पळाला. काही क्षणातच भुकंपाचे धक्के बंद झाल्यावर तेथील सर्व दृष्य भयानक दिसू लागले होते. त्या परिसरातील हॉटेल व काही इमारती कोसळल्याने सर्वत्र आरडोओरड सुरू झाल्याने आशिषला दिसले. तेथून जाण्याचा पर्याय निवडुन तत्काळ सर्व पर्यटकांसह आशिषनेही काठमांडू जाण्याचे ठरविले.