शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

अमरावतीच्या आशिषने अनुभवले नेपाळमधील मृत्यूचे तांडव

By admin | Updated: April 29, 2015 00:12 IST

नेपाळ येथे झालेल्या भुकंपात अमरावतीच्या आशिषसह विदर्भातील ६३ पर्यटकांनी मुत्यूचा थरार अनुभवला.

वैभव बाबरेकर अमरावतीअमरावती : नेपाळ येथे झालेल्या भुकंपात अमरावतीच्या आशिषसह विदर्भातील ६३ पर्यटकांनी मुत्यूचा थरार अनुभवला. मृत्यूच्या दाढेतून सुटका झाल्याचा जितका आनंद आशिषला आहे, तितक्याच वेदना मृत पावलेल्या लोकांसाठी आशिष व्यक्त करीत होता. व्हीएमव्ही कॉलेजमागील गणेशपेठ येथील रहिवासी असलेला आशिष हरिद्वार बोके २२ एप्रिल २०१५ रोजी सॅप नृट्रियन्स कंपनीतर्फे विदर्भातील ६३ कृषी केंंद्र संचालकांसोबत काठमांडू आणि पोखरा येथे सहलीला गेले होते. शनिवारी सर्व जण काठमांडू पासून ७० किलोमिटर दूर असणाऱ्या मनोकामना मंदिर परिसरात निसर्गाचा आनंद घेत होते. दरम्यान ११.४६ वाजताच्या सुमारास ९० सेंकदाचा भुकंपाच्या धक्क्याने सर्वानाचा हादरून टाकले. काय होत आहे, कसे होत आहे. हे समजण्याचा पहिला अनुभव घेत सर्वांनीच पळापळ सुरु केली होती. सुरक्षित जागेवर सर्व जण पोहचल्यावर आजूबाजूला भयावह परिस्थीती त्यांच्या नजरेस पडली. भुकंपामुळे पहाडावरील रोप वे वरील केबल कार अचानक खाली कोसळली व पहाडावरून भुसखलन झाल्याने तब्बल ४० जण त्यांच्या डोळ्यादेखत मृत्यूमुखी पडले. हे दृष्य आशिषसोबतच्या सर्व पर्यटकांनी अनुभवले. भुकंपाचे धक्के पाहून कंपनीचा वाहनचालक वाहने सोडून सुरक्षीत ठिकाणी पळाला. काही क्षणातच भुकंपाचे धक्के बंद झाल्यावर तेथील सर्व दृष्य भयानक दिसू लागले होते. त्या परिसरातील हॉटेल व काही इमारती कोसळल्याने सर्वत्र आरडोओरड सुरू झाल्याने आशिषला दिसले. तेथून जाण्याचा पर्याय निवडुन तत्काळ सर्व पर्यटकांसह आशिषनेही काठमांडू जाण्याचे ठरविले.