शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

अमरावती जिल्ह्यातील बाधित खरिपाची नजरअंदाज पैसेवारी फक्त ६९ पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 13:28 IST

यंदाचा खरीप हंगाम सुरुवातीला कमी पावसामुळे व आता जास्त पावसामुळे बाधित झाला असतानाही, जिल्हाधिकाऱ्यांकडून सोमवारी १,९६४ गावांची नजरअंदाज ६९ पैसेवारी जाहीर करण्यात आली. हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार ठरला आहे.

ठळक मुद्देसोयाबीन, मूग, उडीद उद्ध्वस्त ‘महसूल’च्या नजरेत आलबेलशेतकऱ्यांच्या जखमेवर चोळले मीठ

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सुरुवातीच्या दोन महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसामुळे यंदाचा खरीप हंगाम बाधित झाला. यामध्ये अल्प कालावधीची सोयाबीन, मूग व उडीद ही पिके उद्ध्वस्त झाली. त्यानंतर ऑगस्टअखेर सुरू झालेल्या पावसाने अद्यापही खंड दिलेला नाही. एकंदर यंदाचा खरीप हंगाम सुरुवातीला कमी पावसामुळे व आता जास्त पावसामुळे बाधित झाला असतानाही, जिल्हाधिकाऱ्यांकडून सोमवारी १,९६४ गावांची नजरअंदाज ६९ पैसेवारी जाहीर करण्यात आली. हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार ठरला आहे.यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीपासूनच पाऊस लेटलतीफ राहिला. यामुळे खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या. ६० दिवसांच्या कालावधीची मूग, उडीद आदी पिके बाधित झाली. पावसाच्या खंडामुळे सोयाबीनदेखील बाधित झाले. हजारो हेक्टरमध्ये दुबार पेरणीचे संकट आले. हजारो हेक्टर शेती अजूनही नापेर आहे. मागील महिन्यापासून आलेल्या पावसाने जिल्ह्यात सरासरी पार केली असली तरी या पावसाचा उपयोग रबीसाठी होणार आहे. त्यामुळे मोड आलेल्या सोयाबीनच्या क्षेत्रात रोटाव्हेटर फिरविण्याशिवाय गत्यंतर नव्हते. पावसाअभावी सोयाबीनची वाढदेखील खुंटली आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत पिकांच्या सरासरी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. मात्र, महसूल विभागाच्या नजरेत सर्व काही आलबेल आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सोमवारी जिल्ह्यातील १,९६४ गावांसाठी नजरअंदाज पैसेवारी ही ६९ पैसे जाहीर केली. सर्वात कमी पाऊस असलेल्या भातकुली तालुक्यात ६८ पैसेवारी असल्याने महसूल विभागाला सर्व काही हिरवेच दिसते काय, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.अमरावती तालुक्यात ६६, तिवसा ७० चांदूर रेल्वे ६८, धामणगाव रेल्वे ७१, नांदगाव खंडेश्वर ६६, मोर्शी ७३, वरूड ७१, अचलपूर ७०, चांदूरबाजार ६४, दर्यापूर ६७, अंजनगाव सुर्जी ७६, धारणी ६६ व चिखलदरा तालुक्यात ६४ पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे. सुधारित व नंतर अंतिम पैसेवारी’ सुधारणेला वाव असला तरी नजरअंदाजमध्ये दाखविलेले जास्त उत्पन्न नंतरच्या पैसेवारीला बाधित करते, ही वस्तुस्थिती नजरअंदाज करता येणार नाही.

भातकुली तालुक्यातील पीकस्थिती नजरेआडजिल्ह्यात सर्वात कमी म्हणजेच सरासरीच्या ७० टक्केच पाऊस सद्यस्थितीत झालेला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पावसाच्या जून व जुलै महिन्यात या तालुक्यात सरासरीच्या ५० टक्केही पाऊस नव्हता. मात्र, जाहीर झालेली नजर अंदाज पैसेवारी ही ६८ पैसे असल्याने दुष्काळाच्या सुविधा या तालुक्यापासून हिरावण्यात आले आहे. कृषिमंत्र्याच्या गृहजिल्ह्यात शेतकºयांवर अन्याय होत असताना प्रशासनाला खडे बोल सुनावण्याचे भान या निवडणुकांच्या काळात शासनाला नाही, ही वस्तुस्थिती आहे.

टॅग्स :agricultureशेती