शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्ह्यातील बाधित खरिपाची नजरअंदाज पैसेवारी फक्त ६९ पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 13:28 IST

यंदाचा खरीप हंगाम सुरुवातीला कमी पावसामुळे व आता जास्त पावसामुळे बाधित झाला असतानाही, जिल्हाधिकाऱ्यांकडून सोमवारी १,९६४ गावांची नजरअंदाज ६९ पैसेवारी जाहीर करण्यात आली. हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार ठरला आहे.

ठळक मुद्देसोयाबीन, मूग, उडीद उद्ध्वस्त ‘महसूल’च्या नजरेत आलबेलशेतकऱ्यांच्या जखमेवर चोळले मीठ

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सुरुवातीच्या दोन महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसामुळे यंदाचा खरीप हंगाम बाधित झाला. यामध्ये अल्प कालावधीची सोयाबीन, मूग व उडीद ही पिके उद्ध्वस्त झाली. त्यानंतर ऑगस्टअखेर सुरू झालेल्या पावसाने अद्यापही खंड दिलेला नाही. एकंदर यंदाचा खरीप हंगाम सुरुवातीला कमी पावसामुळे व आता जास्त पावसामुळे बाधित झाला असतानाही, जिल्हाधिकाऱ्यांकडून सोमवारी १,९६४ गावांची नजरअंदाज ६९ पैसेवारी जाहीर करण्यात आली. हा शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच प्रकार ठरला आहे.यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातीपासूनच पाऊस लेटलतीफ राहिला. यामुळे खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या. ६० दिवसांच्या कालावधीची मूग, उडीद आदी पिके बाधित झाली. पावसाच्या खंडामुळे सोयाबीनदेखील बाधित झाले. हजारो हेक्टरमध्ये दुबार पेरणीचे संकट आले. हजारो हेक्टर शेती अजूनही नापेर आहे. मागील महिन्यापासून आलेल्या पावसाने जिल्ह्यात सरासरी पार केली असली तरी या पावसाचा उपयोग रबीसाठी होणार आहे. त्यामुळे मोड आलेल्या सोयाबीनच्या क्षेत्रात रोटाव्हेटर फिरविण्याशिवाय गत्यंतर नव्हते. पावसाअभावी सोयाबीनची वाढदेखील खुंटली आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत पिकांच्या सरासरी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. मात्र, महसूल विभागाच्या नजरेत सर्व काही आलबेल आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सोमवारी जिल्ह्यातील १,९६४ गावांसाठी नजरअंदाज पैसेवारी ही ६९ पैसे जाहीर केली. सर्वात कमी पाऊस असलेल्या भातकुली तालुक्यात ६८ पैसेवारी असल्याने महसूल विभागाला सर्व काही हिरवेच दिसते काय, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.अमरावती तालुक्यात ६६, तिवसा ७० चांदूर रेल्वे ६८, धामणगाव रेल्वे ७१, नांदगाव खंडेश्वर ६६, मोर्शी ७३, वरूड ७१, अचलपूर ७०, चांदूरबाजार ६४, दर्यापूर ६७, अंजनगाव सुर्जी ७६, धारणी ६६ व चिखलदरा तालुक्यात ६४ पैसेवारी जाहीर करण्यात आलेली आहे. सुधारित व नंतर अंतिम पैसेवारी’ सुधारणेला वाव असला तरी नजरअंदाजमध्ये दाखविलेले जास्त उत्पन्न नंतरच्या पैसेवारीला बाधित करते, ही वस्तुस्थिती नजरअंदाज करता येणार नाही.

भातकुली तालुक्यातील पीकस्थिती नजरेआडजिल्ह्यात सर्वात कमी म्हणजेच सरासरीच्या ७० टक्केच पाऊस सद्यस्थितीत झालेला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पावसाच्या जून व जुलै महिन्यात या तालुक्यात सरासरीच्या ५० टक्केही पाऊस नव्हता. मात्र, जाहीर झालेली नजर अंदाज पैसेवारी ही ६८ पैसे असल्याने दुष्काळाच्या सुविधा या तालुक्यापासून हिरावण्यात आले आहे. कृषिमंत्र्याच्या गृहजिल्ह्यात शेतकºयांवर अन्याय होत असताना प्रशासनाला खडे बोल सुनावण्याचे भान या निवडणुकांच्या काळात शासनाला नाही, ही वस्तुस्थिती आहे.

टॅग्स :agricultureशेती