शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuwanshi: सोनमच्या हातात काठी, पाठीमागे चालतोय राजा; हत्येपूर्वी युट्यूबरच्या व्हिडीओत झाले कैद
2
अवघे २० दिवस उरले...! जुन्या, नव्या 'बाबा वेंगा'नी केलीय मोठी भविष्यवाणी; आधीच्या चार ठरल्यात खऱ्या...
3
Israel Iran Conflict : इस्त्रायली हल्ल्यात इराणमध्ये दोन भारतीय विद्यार्थी जखमी; भारताने परत आणण्याची तयारी केली, या मार्गाने आणले जाणार
4
मुंबई मेट्रो- १ मार्गिकेवर तांत्रिक बिघाड, वर्सोवाकडे जाणारी वाहतूक रखडली, प्रवाशांचे हाल
5
७२ तासांच्या युद्धात भीषण विध्वंस! ४०६ इराणींचा मृत्यू, इस्रायलचे किती नुकसान? जाणून घ्या...
6
VIDEO : 'मी घरीच आहे अन्...', लाइव्ह कॅमेरॅवरच डेल स्टेनला रडू कोसळलं; नेमकं काय घडलं?
7
शूटिंगसाठी निघालेल्या मॉडेलची निर्घृण हत्या;मृतदेह कालव्यात फेकला, टॅटूवरून पटली ओळख
8
इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात हैफा बंदराचं मोठं नुकसान? अदानी समुहानं दिली अशी माहिती   
9
Pune Bridge Collapse: पुलाखाली अडकलेल्यांना काढले; पुलाचा सांगाडा काढण्यास चार क्रेन
10
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
11
इराणने थेट अमेरिकन दूतावासावर डागली मिसाइल्स, इस्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये घबराट
12
'अनेक वेळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
13
G20 च्या पडद्यामागील हिरो अमिताभ कांत यांचा राजीनामा! ४५ वर्षांच्या सेवेला का दिली पूर्ण विराम?
14
संजय कपूर यांचा शेवटचा फोटो समोर, कॅप्टनसोबत हसताना दिसले; पोलो खेळतानाच गेला जीव
15
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
16
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
17
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
18
Monsoon Picnic: सध्या पावसाळी सहलीला जाताना जरा सांभाळूनच; वाचा 'ही' मार्मिक कथा!
19
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
20
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?

अमरावती जिल्ह्यात ४८ ग्रामपंचायती अद्यापही थकबाकीदारच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 12:05 IST

अमरावती जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींना मागील तीन महिन्यापूर्वी नोटिसा बजाविण्यात आली होती. मात्र, सध्या कोरोनामुळे वसुलीच नसल्याने वरील ग्रामपंचायतींचे थकीत कर्जदार असल्याचे स्थान प्रशासकीय रेकॉर्डवर कायम आहे

ठळक मुद्देकर्जाचे हप्ते वसुली लॉकडाऊनच

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: जिल्हा परिषदेकडून कर्ज म्हणून घेतलेल्या पैसे थकविणाऱ्या जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींना मागील तीन महिन्यापूर्वी नोटिसा बजाविण्यात आली होती. मात्र, सध्या कोरोनामुळे वसुलीच नसल्याने वरील ग्रामपंचायतींचे थकीत कर्जदार असल्याचे स्थान प्रशासकीय रेकॉर्डवर कायम आहेसन २००२ मध्ये ग्रामविकास निधीमधून १ कोटी ७४ लाख ५९ हजार ८१८ रूपयाचे कर्ज उपलब्ध करून दिले होते.परंतु या सर्व ग्रामपंचायतींना अद्यापर्यतही कर्जाची परतफेड केलेली नाही.परिणामी अजूनही कर्ज व व्याजाचे रक्कमेसह १ कोटी ७३ लाख ४६ हजार २७१ रूपयाची वसुली बाकी आहे४८ ग्रामपंचायतींना २००२ ते २०१८-१९ पर्यत जिल्हा परिषदेने ग्रामविकास निधीतून कर्ज दिले होते. यातील काही ग्रामपंचायतींचे कर्ज बरेच जुने आहे.जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना जिल्हा ग्रामविकास निधी अंतर्गत विविध विकास कामांसाठी कर्ज स्वरूपात निधी देण्यात येत असतो.

पूर्वी ग्रामपंचायतींना थेट स्वरूपात मिळणारा निधी कमी स्वरूपात असल्याने पूर्वी कर्ज घेणाऱ्या ग्रामपंचायती संख्या अधिक होती. आता १४ व्या वित्त आयोगामुळे थेट स्वरूपात निधी मिळत असल्याने कर्ज घेणाऱ्या ग्रामपंचायती संख्या कमी झाली आहे. जिल्हा परिषदेकडून घेतलेले कर्ज १० वर्षार्पेक्षा अधिक काळ थकबाकीदार असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये अनेक मोठ्या गावांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या वतीने ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी व्यापारी संकुल, सार्वजनिक शौचालय, ग्रामपंचायत कार्यालय, नळ पाणीपुरवठा योजना, शाळाखोल्या, अंतर्गत रस्ते याकरता अर्थ पुरवठा करण्यात येतो हे कर्ज १० ते १२ वर्षात परतफेड करणे आवश्यक आहे. या कर्जाची वसुली करताना जिल्हा परिषदेला व्याजाची वसुली करण्याचा अधिकार आहे.या कर्ज घेतलेल्या ग्रामपंचायतींना दहा समान हप्त्यात हफ्ता भरल्यास त्यांना ५ टक्के व्याजाची आकारणी करण्यात येते.

तसेच कर्ज हप्ता न भरल्यास २.५ टक्के व्याज दंड म्हणून घेण्यात येत असताना ग्रामपंचायत दहा वषार्पेक्षा अधिक काळ कर्ज थकले आहे.त्यामुळे पंचायत विभागाने कर्जाची रक्कम भरण्यासाठी पाडून दिलेले थकीत हप्ते भरण्याचे निर्देश दिले होते. अशातच मागील मार्च महिन्यापासून सर्वत्र कोरोना महामारीचे संकट ओढविल्याने या ग्रामपंचायती अजूनही कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे थकबाकीदार सध्याही कायम आहे.४८ ग्रामपंचायतींकडे जिल्हा ग्रामनिधीतील उचल केलेल्या कर्जाची रक्कम थकीत आहे.अशा ग्रामपंचायतींना कर्जाचे हप्ते भरण्याचे लेखी आदेश दिले होते. सध्या कोरोनाचे संकट असल्याने कर्जाची वसुली करता आली नाही. ही वसुली करण्याबाबत तोडगा काढला जाईल.दिलीप मानकरउपमुख्यकार्यकारी अधिकारी, पंचायत

टॅग्स :Governmentसरकारgram panchayatग्राम पंचायत