शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

अमरावती, अकोला जिल्ह्यात सर्वाधिक कर्करुग्ण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2019 22:27 IST

अमरावतीत सर्वाधिक त्या खालोखाल अकोला जिल्ह्यातून कर्करोगाचे रुग्ण येत असल्याचा नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचा अहवाल आहे. गुटखा व खर्रा याबाबतची व्यसनाधीनताच त्यामागील मुख्य कारण आहे. त्यामुळे अवैध गुटख्याविरुद्ध पोलीस व एफडीएंनी धडक मोहीम राबवावी, असे निर्देश आमदार सुनील देशमुख यांनी शुक्रवारी येथे दिले.

ठळक मुद्देनॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचा अहवाल : गुटखा, खर्रा विक्रीला आळा घालणे दरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अमरावतीत सर्वाधिक त्या खालोखाल अकोला जिल्ह्यातून कर्करोगाचे रुग्ण येत असल्याचा नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचा अहवाल आहे. गुटखा व खर्रा याबाबतची व्यसनाधीनताच त्यामागील मुख्य कारण आहे. त्यामुळे अवैध गुटख्याविरुद्ध पोलीस व एफडीएंनी धडक मोहीम राबवावी, असे निर्देश आमदार सुनील देशमुख यांनी शुक्रवारी येथे दिले.राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण समितीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख, पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयंत मीना, जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम, आरडीसी नितीन व्यवहारे, अन्न व औषध विभागाचे अधिकारी एस.डी. केदारे, बी.के. चव्हाण आदी उपस्थित होते.अमरावती व अकोला जिल्ह्यातून अचानक कर्करुग्ण वाढल्याबाबत नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या अधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यात घशाचा व अन्ननलिकेचा कर्करुग्णांचा समावेश आहे. तरुण या व्यसनाच्या जाळ्यात अडकल्यामुळे पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने धडक मोहीम राबवावी, असे आ. देशमुख म्हणाले.गतवर्षी १७ हजार ३४८ नागरिकांची कक्षाला भेटजिल्ह्यात १६ तंबाखू नियंत्रण कक्ष असून, गत वर्षांत १७ हजार ३४८ तंबाखू खाणाºया नागरिकांनी कक्षाला भेट दिली. त्यातील १ हजार ६३२ नागरिकांनी तंबाखूचे व्यसन सोडले, अशी माहिती डॉ. निकम यांनी दिली. व्यसनमुक्तीसाठीच्या उपक्रमांचे यशापयश तपासण्यासाठी वर्षनिहाय तपशीलवार आकडेवारी, व्यसनमुक्त व्यक्तींच्या याद्या आदी माहिती सादर करणे आवश्यक असल्याचे सुनील देशमुख म्हणाले.गोदाम रखवालदार नव्हे, रॅकेटपर्यंत पोहचासर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आता गुटखा विक्रेत्याविरुद्ध भारतीय दंडसंहितेतील कलम ३२८ नुसार अजामीनपात्र गुन्हा दाखल होतो. त्याचा काहिसा धाक निर्माण झाल्याचे केदारे म्हणाले. त्याबाबत आ. देशमुख म्हणाले की, गुटखाबंदीच्या कारवाईत केवळ गोदाम रखवालदारांना पकडून उपयोग नाही. गुटखा रॅकेट कोण चालवते, ते तपासून त्याच्या मुळापर्यंत गेले पाहिजे. धाड टाकल्यावर आरोपीला सुटण्याची संधी मिळता कामा नये. गुन्हे दाखल झाल्यावर गुन्हे सिद्ध होण्याचेही प्रमाण वाढले पाहिजे.बनावट गुटखा निर्मितीला प्रतिबंध घालाशहरात बनावट गुटख्याची निर्मिती होत असल्याच्या तक्रारीही मोठ्या प्रमाणावर येत आहेत. सडक्या सुपारीला केमिकल लावून असा गुटखा इंदूरहून पाऊच मागवून पॅक होतो. त्यासाठीचे मशीन एक ते दीड लाख रुपयांत मिळत असल्याने अनेक ठिकाणी तो तयार होतो व सर्रास विकला जातो, अशी तक्रार आहे. हा अत्यंत गंभीर प्रकार असून, तो वेळीच रोखला पाहिजे, ही बाब आ. देशमुख यांनी अधिकाºयांच्या लक्षात आणून दिली.