शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

तापमानामुळे आंबिया बहाराला गळती !

By admin | Updated: April 12, 2017 00:42 IST

वाढते तापमान व खालावलेली भूजल पातळी यामुळे आंबिया बहराला गळती लागली आहे.

संत्राबागांची अवस्था बिकट : २०० ते ४०० रुपये तासाप्रमाणे घ्यावे लागते पाणीवरूड : वाढते तापमान व खालावलेली भूजल पातळी यामुळे आंबिया बहराला गळती लागली आहे. परिणामी तालुक्यातील संत्रा बागाईतदारांची अवस्था बिकट झाली आहे. वरूड तालुक्यात २० हजार ६०० हेक्टर क्षेत्रात संत्राझाडे आहेत. मागील वर्षी मृग बहर उत्तम होता. मात्र, उत्पादन जास्त झाल्याने संत्र्याला बाजारपेठांत योग्य भाव मिळत नव्हता. अखेरच्या टप्प्यात शेतकऱ्यांना संत्रा रस्त्याच्या कडेला फेकण्याची वेळ आली होती. जिल्ह्यातील सर्वच मोठ्या बाजारपेठांत संत्र्यांचे ढिगारेलागले होते. यामुळे आंबिया बहर चांगला आल्यास झालेले नुकसान भरून काढता येईल, अशी आशा संत्रा बागायतदारांना होती. दरम्यान, संत्रा आंबिया बहाराला पाणी देण्याच्या वेळीच पाणीटंचाई निर्माण झाली. वरूड तालुक्यातील विहिरी आटू लागल्या आहेत. भूजल पातळी खालवल्याने बोअर बंद पडले. सिंचन प्रकल्पामध्ये केवळ १० ते १५ टक्केच जलसाठा आहे. यामुळे पाणी वापर संस्थाना पाणी देणे बंद झाले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अतितापमानामुळे व खालावलेल्या भूजल पातळीमुळे संत्राबागा वाचविणे कठीण झाले आहे. संत्रा बागायतदार २०० ते ४०० रुपये प्रती तास याप्रमाणे पाणी उपसा करीत आहेत. पाणी मिळेल त्यावेळी बागांना सिंचन केले जात आहे. तालुक्यात वाढलेल्या जलसंकटाचा सर्वाधिक फ टका संत्रा बागाईतदारांना बसला आहे. तालुक्यात भूजल पातळी वाढावी यासाठी कोल्हापुरी बंधारे, सिमेंट प्लग, लघु मध्यम सिंचन प्रकल्प तयार केले आहेत. मात्र मार्च महिन्यानंतर भूजल पातळी खालावली. यामुळे सिंचनाचा प्रश्न निर्माणन झाला. (तालुका प्रतिनीधी)