शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

तापमानामुळे आंबिया बहाराला गळती !

By admin | Updated: April 12, 2017 00:42 IST

वाढते तापमान व खालावलेली भूजल पातळी यामुळे आंबिया बहराला गळती लागली आहे.

संत्राबागांची अवस्था बिकट : २०० ते ४०० रुपये तासाप्रमाणे घ्यावे लागते पाणीवरूड : वाढते तापमान व खालावलेली भूजल पातळी यामुळे आंबिया बहराला गळती लागली आहे. परिणामी तालुक्यातील संत्रा बागाईतदारांची अवस्था बिकट झाली आहे. वरूड तालुक्यात २० हजार ६०० हेक्टर क्षेत्रात संत्राझाडे आहेत. मागील वर्षी मृग बहर उत्तम होता. मात्र, उत्पादन जास्त झाल्याने संत्र्याला बाजारपेठांत योग्य भाव मिळत नव्हता. अखेरच्या टप्प्यात शेतकऱ्यांना संत्रा रस्त्याच्या कडेला फेकण्याची वेळ आली होती. जिल्ह्यातील सर्वच मोठ्या बाजारपेठांत संत्र्यांचे ढिगारेलागले होते. यामुळे आंबिया बहर चांगला आल्यास झालेले नुकसान भरून काढता येईल, अशी आशा संत्रा बागायतदारांना होती. दरम्यान, संत्रा आंबिया बहाराला पाणी देण्याच्या वेळीच पाणीटंचाई निर्माण झाली. वरूड तालुक्यातील विहिरी आटू लागल्या आहेत. भूजल पातळी खालवल्याने बोअर बंद पडले. सिंचन प्रकल्पामध्ये केवळ १० ते १५ टक्केच जलसाठा आहे. यामुळे पाणी वापर संस्थाना पाणी देणे बंद झाले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अतितापमानामुळे व खालावलेल्या भूजल पातळीमुळे संत्राबागा वाचविणे कठीण झाले आहे. संत्रा बागायतदार २०० ते ४०० रुपये प्रती तास याप्रमाणे पाणी उपसा करीत आहेत. पाणी मिळेल त्यावेळी बागांना सिंचन केले जात आहे. तालुक्यात वाढलेल्या जलसंकटाचा सर्वाधिक फ टका संत्रा बागाईतदारांना बसला आहे. तालुक्यात भूजल पातळी वाढावी यासाठी कोल्हापुरी बंधारे, सिमेंट प्लग, लघु मध्यम सिंचन प्रकल्प तयार केले आहेत. मात्र मार्च महिन्यानंतर भूजल पातळी खालावली. यामुळे सिंचनाचा प्रश्न निर्माणन झाला. (तालुका प्रतिनीधी)