शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

आंबियाची गळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 23:07 IST

यंदाच्या हंगामात बºयापैकी असलेल्या संत्र्याच्या आंबिया बहराची फळगळ मोठ्या प्रमाणावर होत आहे.

ठळक मुद्देरसशोषक किडींमुळे नुकसान : बुरशीसह वातावरणाचा बदलही कारणीभूत

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या हंगामात बºयापैकी असलेल्या संत्र्याच्या आंबिया बहराची फळगळ मोठ्या प्रमाणावर होत आहे. यासाठी रसशोषक किडींचा प्रादुर्भाव त्याचप्रमाणे बुरशीजन्य रोग व वातावरणातील बदलदेखील तेवढाच कारणीभूत ठरत आहे. मोठ्या प्रमाणात फळगळ होत असल्याने संत्रा उत्पादकांसमोर संकट उभे ठाकले आहे. यामुळे सरासरी उत्पादनात किमान २५ ते ३० टक्क्यांनी घट येणार असल्याने संत्रा उत्पादकांना कोट्यवधींचा फटका बसणार आहे.साधारणत: संत्र्याची फळे पक्व होण्याच्या काळात रसशोषक किडींचे मोठ्या आकाराचे व आकर्षक रंगाचे पंतग केवळ रात्रीच्या वेळी कार्यरत असतात. पतंगाचे समोरचे पंख भुरकट रंगाचे असून त्यावर ठिपकेवजा पट्टे असतात, तर मागचे पंख पिवळसर शेंदरी रंगाचे असतात. त्यावर मध्यभागी काळा किंवा अर्धचंद्राकृती काळा ठिपका असतो. हे पंतग संध्याकाळी अर्धकच्चा फळात छिद्र करून रसशोषण करतात. या छिद्रातून रोगजंतूंचा शिरकाव होऊन फळे पिवळी पडत आहेत. याच छिद्रापासून फळे सडण्यास सुरूवात होते. परिणामी कीडग्रस्त फळे गळून पडतात. मृगबहराच्या तुलनेत आंबिया बहराच्या फळांवर म्हणजेच सप्टेंबर व आॅक्टोबर या कालावधीत या किडीचा अधिक प्रभाव दिसून येत आहे.सध्या दिवसा उष्णतामान अधिक आहे. वातावरणातील बदलासह अन्नाची कमतरता व बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळे आंबियाची मोठ्या प्रमाणात फळगळ होत आहे. बोटिओडीप्लोडिया, कोलिटोट्रिकम व काही प्रमाणात आॅलटरनेटिया या बुरशीमुळेही संत्र्याची मोठ्या प्रमाणात फळगळ होत आहे. या बुरशी देठाद्वारे फळात प्रवेश करून नुकसान करतात. जुन्या वाळलेल्या फांद्या असतील तर रोग अधिक पसरतो.काळी माशी, मावा, तुडतुडे यांच्या शरीरातून निघालेल्या साखरेसारख्या पदार्थावर बुरशीची वाढ होते व पेशीक्षय होऊन फळगळ होत आहे. संत्र्यांमध्ये शेंडेमर रोगाला कारणीभूत बुरशीचा प्रादुर्भाव पावसाळ्यात होतो. मात्र, याची लक्षणे सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यात दिसून येतात. बुरशीच्या प्रादुर्भावामुळे संत्र्याचे देठ व सालीच्या जोडावर काळपट व तपकिरी रंगाचे डाग पडतात. तो भाग कुजून फळांची गळ होते. फायटोप्थोरा याबुरशीच्या प्रादुर्भावामुळे फळकुज रोग दिसून येतो. सद्यस्थितीत या बुरशींचा प्रादुर्भाव संत्र्यावर जाणवत असल्याने संत्रा फळांची गळ सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे.पतंगाचे व्यवस्थापनगळलेली फळे गोळा करून नष्ट करावीत. या पतंगाच्या अळ्या संत्रावर्गीय झाडावर जगत नाहीत. त्या बगिचाच्या बाहेरील गुळवेल, वासनवेल, चांदवेल आदी तणांवर जगतात. त्यामुळे या तणांचा नाश करावा.बगिच्यात सायंकाळी प्रकाश सापळ्याचा वापर करावा व बागेत ओला कचरा जाळून धूर करावा. बागेत विजेचे दिवे लावावेत.प्रादुर्भाव दिसताच निंबोळी अर्क ५ टक्के (५०० ग्रॅम प्रति १० लीटर पाण्यात) किंवा निंबोळीचे तेल १०० मिली अधिक १० ग्रॅम डिटर्जंट प्रती १० लीटर याप्रमाणात फवारणी करावी.पतंगाच्या नियंत्रणासाठी १० मिली मॅलॉथिआॅन किंवा क्लोरोपायरीफॉस २० टक्के ई.सी. १० मिली अधिक १०० ग्रॅम गूळ, अधिक १०० मिली फळांचा रस किंवा सिरका (व्हिनेगर) एक लीटर पाण्यात मिसळून तयार केलेले आमिश मोठे तोंड असलेल्या डब्यात घेऊन हे डबे अधून-मधून १० ते १२ या प्रमाणात प्रतीएकर जागेत टांगते ठेवावे, अशी माहिती प्रादेशिक संशोधन केंद्राचे कृषी शास्त्रज्ञ अनिल ठाकरे व राजेंद्र वानखडे यांनी दिली.