शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

आंबियाची गळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 23:07 IST

यंदाच्या हंगामात बºयापैकी असलेल्या संत्र्याच्या आंबिया बहराची फळगळ मोठ्या प्रमाणावर होत आहे.

ठळक मुद्देरसशोषक किडींमुळे नुकसान : बुरशीसह वातावरणाचा बदलही कारणीभूत

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : यंदाच्या हंगामात बºयापैकी असलेल्या संत्र्याच्या आंबिया बहराची फळगळ मोठ्या प्रमाणावर होत आहे. यासाठी रसशोषक किडींचा प्रादुर्भाव त्याचप्रमाणे बुरशीजन्य रोग व वातावरणातील बदलदेखील तेवढाच कारणीभूत ठरत आहे. मोठ्या प्रमाणात फळगळ होत असल्याने संत्रा उत्पादकांसमोर संकट उभे ठाकले आहे. यामुळे सरासरी उत्पादनात किमान २५ ते ३० टक्क्यांनी घट येणार असल्याने संत्रा उत्पादकांना कोट्यवधींचा फटका बसणार आहे.साधारणत: संत्र्याची फळे पक्व होण्याच्या काळात रसशोषक किडींचे मोठ्या आकाराचे व आकर्षक रंगाचे पंतग केवळ रात्रीच्या वेळी कार्यरत असतात. पतंगाचे समोरचे पंख भुरकट रंगाचे असून त्यावर ठिपकेवजा पट्टे असतात, तर मागचे पंख पिवळसर शेंदरी रंगाचे असतात. त्यावर मध्यभागी काळा किंवा अर्धचंद्राकृती काळा ठिपका असतो. हे पंतग संध्याकाळी अर्धकच्चा फळात छिद्र करून रसशोषण करतात. या छिद्रातून रोगजंतूंचा शिरकाव होऊन फळे पिवळी पडत आहेत. याच छिद्रापासून फळे सडण्यास सुरूवात होते. परिणामी कीडग्रस्त फळे गळून पडतात. मृगबहराच्या तुलनेत आंबिया बहराच्या फळांवर म्हणजेच सप्टेंबर व आॅक्टोबर या कालावधीत या किडीचा अधिक प्रभाव दिसून येत आहे.सध्या दिवसा उष्णतामान अधिक आहे. वातावरणातील बदलासह अन्नाची कमतरता व बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळे आंबियाची मोठ्या प्रमाणात फळगळ होत आहे. बोटिओडीप्लोडिया, कोलिटोट्रिकम व काही प्रमाणात आॅलटरनेटिया या बुरशीमुळेही संत्र्याची मोठ्या प्रमाणात फळगळ होत आहे. या बुरशी देठाद्वारे फळात प्रवेश करून नुकसान करतात. जुन्या वाळलेल्या फांद्या असतील तर रोग अधिक पसरतो.काळी माशी, मावा, तुडतुडे यांच्या शरीरातून निघालेल्या साखरेसारख्या पदार्थावर बुरशीची वाढ होते व पेशीक्षय होऊन फळगळ होत आहे. संत्र्यांमध्ये शेंडेमर रोगाला कारणीभूत बुरशीचा प्रादुर्भाव पावसाळ्यात होतो. मात्र, याची लक्षणे सप्टेंबर व आॅक्टोबर महिन्यात दिसून येतात. बुरशीच्या प्रादुर्भावामुळे संत्र्याचे देठ व सालीच्या जोडावर काळपट व तपकिरी रंगाचे डाग पडतात. तो भाग कुजून फळांची गळ होते. फायटोप्थोरा याबुरशीच्या प्रादुर्भावामुळे फळकुज रोग दिसून येतो. सद्यस्थितीत या बुरशींचा प्रादुर्भाव संत्र्यावर जाणवत असल्याने संत्रा फळांची गळ सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे.पतंगाचे व्यवस्थापनगळलेली फळे गोळा करून नष्ट करावीत. या पतंगाच्या अळ्या संत्रावर्गीय झाडावर जगत नाहीत. त्या बगिचाच्या बाहेरील गुळवेल, वासनवेल, चांदवेल आदी तणांवर जगतात. त्यामुळे या तणांचा नाश करावा.बगिच्यात सायंकाळी प्रकाश सापळ्याचा वापर करावा व बागेत ओला कचरा जाळून धूर करावा. बागेत विजेचे दिवे लावावेत.प्रादुर्भाव दिसताच निंबोळी अर्क ५ टक्के (५०० ग्रॅम प्रति १० लीटर पाण्यात) किंवा निंबोळीचे तेल १०० मिली अधिक १० ग्रॅम डिटर्जंट प्रती १० लीटर याप्रमाणात फवारणी करावी.पतंगाच्या नियंत्रणासाठी १० मिली मॅलॉथिआॅन किंवा क्लोरोपायरीफॉस २० टक्के ई.सी. १० मिली अधिक १०० ग्रॅम गूळ, अधिक १०० मिली फळांचा रस किंवा सिरका (व्हिनेगर) एक लीटर पाण्यात मिसळून तयार केलेले आमिश मोठे तोंड असलेल्या डब्यात घेऊन हे डबे अधून-मधून १० ते १२ या प्रमाणात प्रतीएकर जागेत टांगते ठेवावे, अशी माहिती प्रादेशिक संशोधन केंद्राचे कृषी शास्त्रज्ञ अनिल ठाकरे व राजेंद्र वानखडे यांनी दिली.