शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
4
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
5
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
6
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
7
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
8
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
9
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
10
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
11
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
12
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
13
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
14
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
15
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
16
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
17
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
18
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
19
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
20
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!

आंबिया बहराच्या फळ पीकविम्याची जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:13 IST

२०२०-२१ मधील १६ हजार लाभार्थी ताटकळत, चांदूर बाजार : जिल्ह्यातील १६ हजार ८१७ शेतकऱ्यांनी आंबिया बहराकरिता फळपीक विमा काढला ...

२०२०-२१ मधील १६ हजार लाभार्थी ताटकळत,

चांदूर बाजार : जिल्ह्यातील १६ हजार ८१७ शेतकऱ्यांनी आंबिया बहराकरिता फळपीक विमा काढला होता. मात्र, आंबिया बहर फळपीक विम्याचे निकष पूर्ण झाल्यानंतरही शेतकऱ्यांना पीकविमा परतावा मिळालेला नाही. यामुळे शेतकऱ्यांना केवळ प्रतीक्षा करावी लागत आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत हवामान आधारित फळ पीकविमा योजना राज्यात आंबिया व मृग बहराकरिता फळपिकांना लागू करण्यात आली आहे. सन २०२०-२१ वर्षाकरिता या योजनेत जिल्ह्यातील १६ हजार ८१७ शेतकऱ्यांनी १६,२८२ हेक्टरवर आंबिया बहर फळ पीकविमा संत्रा, मोसंबी, केळी या पिकांसाठी काढला होता. या आंबिया बहर फळ पीकविम्याचे निकष व ट्रिगर ३१ मे रोजी संपले. त्यानंतर आता तीन महिने पूर्ण झाले आहेत. असे असतानासुद्धा शासनाने अजूनपर्यंत शेतकऱ्यांना पीकविम्याच्या रकमेचे वाटप केले नाही. राज्य व केंद्र शासनाने यामध्ये लक्ष घालून हवामान आधारित फळपीक विमा, गारपीट फळपीक विमा शासनादेशानुसार दरमहा दराने लवकरात लवकर खात्यावर जमा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतर्फे केली जात आहे. २०२०-२१ यावर्षी १९ ते २२ मार्च या कालावधीत जिल्ह्यात झालेल्या गारपीट व हवामान आधारित फळपीक विमा शेतकऱ्यांना अजूनपर्यंत मिळाला नाही.

----------------

शासनाने आंबिया बहर फळपीक विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळालेला नाही. कमी पाऊस, विविध रोग-कीड यामुळे फळपीक उत्पादक शेतकरी जेरीस आले आहेत. विमाधारक शेतकऱ्यांचा अंत न पाहता लवकरात लवकर आंबिया फळपीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी.

- पुष्पक खापरे, जिल्हास्तरीय शेतकरी पीकविमा प्रतिनिधी, चांदूर बाजार