शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

सूर्यगंगा नदीचा पर्यायी पूल पुरात वाहून गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 22:26 IST

तालुक्यातील शेंदूरजना बाजार येथे उंच पुलाचे बांधकाम सुरू असून, वाहतुकीसाठी केलेला पर्यायी पूल शनिवारी रात्रीच्या पहिल्याच पावसाच्या पुराने वाहून गेला. त्यामुळे या मार्गावरील जड वाहतूक बंद करण्यात आली आहे. मात्र, नवीन पूल बांधून तयार होणास वर्षभराचा कालावधी लागणार आहे.

ठळक मुद्देनिकृष्ट दर्जाचे काम : जड वाहतूक बंद, नागरिकांचा त्रास वाढणार, नवा पूल पूर्णत्वास केव्हा?

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : तालुक्यातील शेंदूरजना बाजार येथे उंच पुलाचे बांधकाम सुरू असून, वाहतुकीसाठी केलेला पर्यायी पूल शनिवारी रात्रीच्या पहिल्याच पावसाच्या पुराने वाहून गेला. त्यामुळे या मार्गावरील जड वाहतूक बंद करण्यात आली आहे. मात्र, नवीन पूल बांधून तयार होणास वर्षभराचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी पर्यायी पूल बांधण्यात आले खरे; मात्र तोही निकृष्ट दर्जाचा बांधला असल्याने पहिल्याच पुराच्या ओघात वाहून गेला. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीची समस्या ऐरणीवर आली असून, अपघाताची शक्यता वर्तविली जात आहे.येथील सूर्यगंगा नदीवरील उंच पुलाचे बांधकाम विशेष प्रकल्प विभाग केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत सुरू आहे. त्यामुळे जुना लहान पूल पाडून हा पूल उंच बांधण्याचे काम आठ महिन्यांपासून सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी त्या बाजूला एक पयार्यी पूल बांधण्यात आला आहे. मात्र तिवसा तालुक्यात शनिवारी मुसळधार पाऊस पडल्याने या सूर्यगंगा नदीला पूर आला होता,त्यामुळे पर्यायी बांधलेल्या पुलावर पुराचे पाणी गेल्याने रात्रीच हा पूल खचून वाहून गेला. या पुलाला पाण्याने कोरपून नेले आहे. पुलाचे बांधकाम सुरू असल्याने कंत्राटदार यांनी पर्याय म्हणून या पुलाचे बांधकाम केले. परंतु तो निकृष्ट दर्जाचा बनविल्यामुळे गावातील संपर्क तुटला आहे. तिवसा बांधकाम विभाग यांचे कामावर दुर्लक्ष असल्याकारणाने कंत्राटदारांनी जुन्या पुलामधील काढलेला लोहा सरळ करून नवीन पुलाच्या बांधकामात वापरला. त्यामुळे नवीन पूलसुद्धा धोकादायक ठरू शकतो. या पुलाच्या बांधकामावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णत: दुर्लक्ष आहे. सद्यस्थितीवरून येथे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. सध्या खचलेला पूल दुरुस्ती करण्याचे काम युद्धस्तरावर सुरू असून, या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. हा रस्ता तिवसा चांदूर रेल्वे राज्य महामार्ग असल्यामुळे या पुलावरून दररोज शेकडो वाहने धावतात. मात्र, पूल पुराच्या पाण्यामुळे खचल्याने वाहतुकीस आता धोकादायक ठरणार आहे.