शहरं
Join us  
Trending Stories
1
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
2
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
3
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
4
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
5
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
6
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
7
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
8
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
9
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
10
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
11
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
12
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
13
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
14
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
16
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
17
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
18
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
19
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
20
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल

सूर्यगंगा नदीचा पर्यायी पूल पुरात वाहून गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 22:26 IST

तालुक्यातील शेंदूरजना बाजार येथे उंच पुलाचे बांधकाम सुरू असून, वाहतुकीसाठी केलेला पर्यायी पूल शनिवारी रात्रीच्या पहिल्याच पावसाच्या पुराने वाहून गेला. त्यामुळे या मार्गावरील जड वाहतूक बंद करण्यात आली आहे. मात्र, नवीन पूल बांधून तयार होणास वर्षभराचा कालावधी लागणार आहे.

ठळक मुद्देनिकृष्ट दर्जाचे काम : जड वाहतूक बंद, नागरिकांचा त्रास वाढणार, नवा पूल पूर्णत्वास केव्हा?

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : तालुक्यातील शेंदूरजना बाजार येथे उंच पुलाचे बांधकाम सुरू असून, वाहतुकीसाठी केलेला पर्यायी पूल शनिवारी रात्रीच्या पहिल्याच पावसाच्या पुराने वाहून गेला. त्यामुळे या मार्गावरील जड वाहतूक बंद करण्यात आली आहे. मात्र, नवीन पूल बांधून तयार होणास वर्षभराचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी पर्यायी पूल बांधण्यात आले खरे; मात्र तोही निकृष्ट दर्जाचा बांधला असल्याने पहिल्याच पुराच्या ओघात वाहून गेला. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीची समस्या ऐरणीवर आली असून, अपघाताची शक्यता वर्तविली जात आहे.येथील सूर्यगंगा नदीवरील उंच पुलाचे बांधकाम विशेष प्रकल्प विभाग केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत सुरू आहे. त्यामुळे जुना लहान पूल पाडून हा पूल उंच बांधण्याचे काम आठ महिन्यांपासून सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी त्या बाजूला एक पयार्यी पूल बांधण्यात आला आहे. मात्र तिवसा तालुक्यात शनिवारी मुसळधार पाऊस पडल्याने या सूर्यगंगा नदीला पूर आला होता,त्यामुळे पर्यायी बांधलेल्या पुलावर पुराचे पाणी गेल्याने रात्रीच हा पूल खचून वाहून गेला. या पुलाला पाण्याने कोरपून नेले आहे. पुलाचे बांधकाम सुरू असल्याने कंत्राटदार यांनी पर्याय म्हणून या पुलाचे बांधकाम केले. परंतु तो निकृष्ट दर्जाचा बनविल्यामुळे गावातील संपर्क तुटला आहे. तिवसा बांधकाम विभाग यांचे कामावर दुर्लक्ष असल्याकारणाने कंत्राटदारांनी जुन्या पुलामधील काढलेला लोहा सरळ करून नवीन पुलाच्या बांधकामात वापरला. त्यामुळे नवीन पूलसुद्धा धोकादायक ठरू शकतो. या पुलाच्या बांधकामावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे पूर्णत: दुर्लक्ष आहे. सद्यस्थितीवरून येथे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. सध्या खचलेला पूल दुरुस्ती करण्याचे काम युद्धस्तरावर सुरू असून, या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. हा रस्ता तिवसा चांदूर रेल्वे राज्य महामार्ग असल्यामुळे या पुलावरून दररोज शेकडो वाहने धावतात. मात्र, पूल पुराच्या पाण्यामुळे खचल्याने वाहतुकीस आता धोकादायक ठरणार आहे.