शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
2
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
3
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
4
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
5
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
6
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
7
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
8
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
9
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
10
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
11
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
12
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
13
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
14
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
16
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
17
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
18
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
19
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
20
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा

आधीच तुटवडा, त्यात तीन टक्के डोस वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:10 IST

गजानन मोहोड अमरावती : कोरोना लसींचा नियमित पुरवठा होत नसल्याने अधिकतर केंद्र बंद राहत आहेत. अशा स्थितीत तीन टक्के ...

गजानन मोहोड

अमरावती : कोरोना लसींचा नियमित पुरवठा होत नसल्याने अधिकतर केंद्र बंद राहत आहेत. अशा स्थितीत तीन टक्के डोस वाया गेल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम विदर्भात आतापर्यंत ३०.०६ लाख डोस प्राप्त झाले. यातील कोविशिल्डचे ३.५७ टक्के, तर कोव्हॅक्सिनचे १.९८ टक्के डोस वाया गेल्याचा आरोग्य यंत्रणेचा अहवाल आहे.

लसीकरण केंद्रांवर शेवटचे चार, पाच लाभार्थी असले तरी त्यांना लस द्यावीच लागते. त्यामुळे व्हायलमधील शेवटचे डोस वाया जाण्याचे प्रमाणही २.७७ टक्के असल्याचे दिसून येते. ज्या दिवशीचे व्हायल त्याच दिवसी वापरावे लागत असल्याने काही डोस रोज वाया जात असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

विभागात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. आतापर्यंत ३०,०५,९२० डोस प्राप्त झाले. बुधवारपर्यंत २८,९५,८२१ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. लसींचा पुरवठा नियमित होत नसल्याने आठवड्यातील दोन ते तीन दिवस लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची नामुस्की आरोग्य विभागावर ओढवली आहे. याशिवाय रोज सायंकाळी उशिरा दुसरा दिवसाचे नियोजन केल्या जाते. नागरिकांपर्यंत ही माहिती पोहोचत नसल्यामुळे बरेच वेळा केंद्रांवरून माघारी परतण्याची वेळ ज्येष्ठ नागरिकांवर ओढवली आहे. बरेच केंद्रांवर पहाटेपासून रांगा लागत असल्याचेही दिसून येते.

बॉक्स

आयापर्यंत ३०,०५,९२० लसींचा पुरवठा

अमरावती विभागात आतापर्यंत ३०,०५,९२० लसीचा पुरवठा करण्यात आलेला आहे. यात कोविशिल्ड २३,०७,३५०, तर कोव्हॅक्सिनचे ६,९८,५७० डोस आहेत. आतापर्यंत अकोला जिल्ह्यात ४,८६,४००, अमरावती ७,२२,४४०, बुलडाणा ६,८८,२२०, वाशिम ४,२०,७४० व यवतमाळ जिल्ह्यात ६,८८,१२० डोस प्राप्त झाले आहेत.

बॉक्स

चार तासांत वापरावे लागते व्हाॅयल

लसीकरणासाठी व्हाॅयल उघडल्यानंतर ती चार तासांच्या आत वापरावी लागते, अन्यथा वाया जाते. लसीचा साठा आयलरमध्ये ठेवल्या जातो. केंद्रांत लस ही व्हॅक्सीन कॅरिअरमध्ये ठेवली जाते. यात चार आईस पॅक असतात. यापैकी तीन आतमध्ये व एक बाहेर असतो. यासाठी कंडीशनर आईस पॅक वापरला जातो. दोन ते आठ अंश तापमानात लस ठेवली जाते.

बॉक्स

जिल्हानिहाय वाया गेलेले डोस (टक्के)

जिल्हा कोविशिल्ड कोव्हॅक्सिन

अकोला ३.२८ १.२३

अमरावती ७.२९ ०.३६

बुलडाणा २.७५ २.९३

वाशिम १.०२ २.६४

यवतमाळ ३.५२ २.६९

कोट

लसीकरणात प्रतीक्षेत असणाऱ्या लाभार्थ्याला लस द्यावी लागते, अशावेळी शेवटच्या व्हाॅयलमधील काही डोस वाया जातात. चार तासांपर्यंतच डोस वापरता येतो.

- डॉ दिलीप रणमले,

जिल्हा आरोग्य अधिकारी