शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

घरकूल बांधकामासाठी वाळू द्या, अन्यथा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 23:04 IST

मुख्यमत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे पंतप्रधान आवास योजनेसह इतरही घरकुल बांधकामासाठी लाभार्थ्यांना जिल्हा प्रशासनाने नियमानुसार ५ ब्रास वाळू उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सोमवारी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांच्याकडे धामणगाव मतदार संघातील विविध गावांच्या सरपंचांनी निवेदनाव्दारे केली. येत्या ११ फेब्रुवारीपर्यंत रेती उपलब्ध करून द्यावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.

ठळक मुद्देवीरेंद्र जगताप : जिल्हाधिकाऱ्यांना इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मुख्यमत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे पंतप्रधान आवास योजनेसह इतरही घरकुल बांधकामासाठी लाभार्थ्यांना जिल्हा प्रशासनाने नियमानुसार ५ ब्रास वाळू उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सोमवारी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांच्याकडे धामणगाव मतदार संघातील विविध गावांच्या सरपंचांनी निवेदनाव्दारे केली. येत्या ११ फेब्रुवारीपर्यंत रेती उपलब्ध करून द्यावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.जिल्ह्यातील शासकीय घरकुल मंजूर लाभार्थ्यांना शासन धोरणानुसार घरकुल बांधकामाकरिता ५ ब्रास मोफत वाळू उपलब्ध करून देण्यात यावी, यासंदर्भात आमदार वीरेंद्र जगताप यांनीे पाठपुरावा केला. त्याअनुषंगाने विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत कारवाईचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. परंतु अद्यापही कारवाई करण्यात आली नाही. अशातच झेडपी मुख्यकार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी येत्या ३१ मार्चपर्यंत घरकुलाचे कामे पूर्ण करावेत, असा तगादा लावला आहे. विहित मुदतीत घरकुल पूर्ण न झाल्यास लाभार्थ्यांना अनुदान देण्यास अडचणी निर्माण होतील. जीएसटी कपात घेऊन एक लाख रूपयांतून बाजारमूल्याने ४० हजार रुपये वाळूसाठी लागणार आहेत. परिणामी, घरकुलाचे काम होऊ शकणार नाहीत. त्यामुळे अशा लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू मोफत देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यानुसार कारवाई करावी. अन्यथा ११ फेब्रुवारी रोजी सदर मागणीसाठी जिल्हाधिकाºयांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा आमदार वीरेंद्र जगताप यांच्यासह रवी बिरे, अतुल ठाकूर, सुनील इंझळकर, ज्योतीपाल चवरे, अब्दूल जुनेद, अनिल भोयर, अमीरभाई, रमेश ठाकरे आदी सरपंच व सहकाºयांनी दिला आहे.भंडारा येथे आदेश, मग येथे का नाहीत?शासनाच्या धोरणाप्रमाणे घरकुल लाभार्थ्यांना घरकुल बांधकामसाठी भंडारा येथील जिल्हा प्रशासनाने ५ ब्रास वाळू उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हा, तहसील प्रशासनाने दिले आहेत. मग अमरावती जिल्ह्यातच का घरकुलांचे लाभार्थ्यांना शासन निर्णयाप्रमाणे पाच ब्रास वाळू उपलब्ध करून देण्यास वेळकाढू धोरण का राबविले जात आहे, असा प्रश्न आमदार वीरेंद्र जगताप यांनी जिल्हा प्रशासनाला केला आहे.