शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

घरकूल बांधकामासाठी वाळू द्या, अन्यथा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 23:04 IST

मुख्यमत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे पंतप्रधान आवास योजनेसह इतरही घरकुल बांधकामासाठी लाभार्थ्यांना जिल्हा प्रशासनाने नियमानुसार ५ ब्रास वाळू उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सोमवारी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांच्याकडे धामणगाव मतदार संघातील विविध गावांच्या सरपंचांनी निवेदनाव्दारे केली. येत्या ११ फेब्रुवारीपर्यंत रेती उपलब्ध करून द्यावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.

ठळक मुद्देवीरेंद्र जगताप : जिल्हाधिकाऱ्यांना इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मुख्यमत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे पंतप्रधान आवास योजनेसह इतरही घरकुल बांधकामासाठी लाभार्थ्यांना जिल्हा प्रशासनाने नियमानुसार ५ ब्रास वाळू उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सोमवारी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांच्याकडे धामणगाव मतदार संघातील विविध गावांच्या सरपंचांनी निवेदनाव्दारे केली. येत्या ११ फेब्रुवारीपर्यंत रेती उपलब्ध करून द्यावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.जिल्ह्यातील शासकीय घरकुल मंजूर लाभार्थ्यांना शासन धोरणानुसार घरकुल बांधकामाकरिता ५ ब्रास मोफत वाळू उपलब्ध करून देण्यात यावी, यासंदर्भात आमदार वीरेंद्र जगताप यांनीे पाठपुरावा केला. त्याअनुषंगाने विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत कारवाईचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. परंतु अद्यापही कारवाई करण्यात आली नाही. अशातच झेडपी मुख्यकार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी येत्या ३१ मार्चपर्यंत घरकुलाचे कामे पूर्ण करावेत, असा तगादा लावला आहे. विहित मुदतीत घरकुल पूर्ण न झाल्यास लाभार्थ्यांना अनुदान देण्यास अडचणी निर्माण होतील. जीएसटी कपात घेऊन एक लाख रूपयांतून बाजारमूल्याने ४० हजार रुपये वाळूसाठी लागणार आहेत. परिणामी, घरकुलाचे काम होऊ शकणार नाहीत. त्यामुळे अशा लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू मोफत देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यानुसार कारवाई करावी. अन्यथा ११ फेब्रुवारी रोजी सदर मागणीसाठी जिल्हाधिकाºयांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा आमदार वीरेंद्र जगताप यांच्यासह रवी बिरे, अतुल ठाकूर, सुनील इंझळकर, ज्योतीपाल चवरे, अब्दूल जुनेद, अनिल भोयर, अमीरभाई, रमेश ठाकरे आदी सरपंच व सहकाºयांनी दिला आहे.भंडारा येथे आदेश, मग येथे का नाहीत?शासनाच्या धोरणाप्रमाणे घरकुल लाभार्थ्यांना घरकुल बांधकामसाठी भंडारा येथील जिल्हा प्रशासनाने ५ ब्रास वाळू उपलब्ध करून देण्याचे आदेश जिल्हा, तहसील प्रशासनाने दिले आहेत. मग अमरावती जिल्ह्यातच का घरकुलांचे लाभार्थ्यांना शासन निर्णयाप्रमाणे पाच ब्रास वाळू उपलब्ध करून देण्यास वेळकाढू धोरण का राबविले जात आहे, असा प्रश्न आमदार वीरेंद्र जगताप यांनी जिल्हा प्रशासनाला केला आहे.