शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

दुष्काळनिधीचे वाटप बाकी

By admin | Updated: February 7, 2015 00:11 IST

जिल्ह्यातील साडेचार लाख अल्प, अत्यल्प व बहुभूधारक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने दुसऱ्या टप्यातील १२५ कोटी ८४ लाखांचा निधी ...

अमरावती : जिल्ह्यातील साडेचार लाख अल्प, अत्यल्प व बहुभूधारक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने दुसऱ्या टप्यातील १२५ कोटी ८४ लाखांचा निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे गुरुवारी सर्व तालुक्यांना वितरित केला. मात्र ८ जानेवारीला प्राप्त पहिल्या टप्यामधील निधीतील रक्कम तालुक्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अद्यापही जमा झालेला नाही. अचूक याद्या नसल्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. अपुऱ्या पावसामुळे खरीप २०१४ चा हंगाम उध्वस्त झाला. जिल्ह्यात पैसेवारी ५० पैश्याच्या ात ४६ पैसे आहे. त्यामूळे जिल्ह्यात १४ तालुक्यामधील १९८१ गावामध्ये शासनाचे दुष्काळ स्थिती घोषित केली. त्यामूळे जिल्ह्यातील ४ लाख ५३ हजार ९७४ शेतकऱ्यांना सोई सवलती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. जिल्ह्यात दुष्काळ निधीसाठी ३०२ कोटी ५१ लाख रुपयांची आवश्यकता असतांना ८ जोनवारी २०१५ ला १२५ कोटी ७९ लक्ष रुपयाचा निधी प्राप्त झाला. व दुसऱ्या टप्यातील १२५ कोटी ८४ लाख रुपयांचा निधी ५ फेब्रूवारीला सर्व तालुक्याला वितरीत करण्यात आला. असा एकूण ८० टक्यांचा २५१ कोटी ६३ लाखाचा निधी सर्व तालुक्याला वितरीत करण्यात आला. मात्र पहिल्या टप्यातील निधीचे केवळ ८१ ते ८३ टक्केच वितरीत झाल्याचा अहवाल आहे. प्रत्यक्षात यापेक्षा कमी प्रमाणात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात निधी जमा झाला आहे. एका पेक्षा अधिक गावांचा तलाठ्यांकडे असनारा अधिभार, याद्या अचूक नसने, शेतकऱ्यांचे वारंवार बदलनारे बँक खाते क्रमांक आदी कारणामुळे काही गावामधील शेतकऱ्यांच्या हा निधी मिळू शकलेला नाही.