शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

दुष्काळनिधीचे वाटप बाकी

By admin | Updated: February 7, 2015 00:11 IST

जिल्ह्यातील साडेचार लाख अल्प, अत्यल्प व बहुभूधारक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने दुसऱ्या टप्यातील १२५ कोटी ८४ लाखांचा निधी ...

अमरावती : जिल्ह्यातील साडेचार लाख अल्प, अत्यल्प व बहुभूधारक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने दुसऱ्या टप्यातील १२५ कोटी ८४ लाखांचा निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे गुरुवारी सर्व तालुक्यांना वितरित केला. मात्र ८ जानेवारीला प्राप्त पहिल्या टप्यामधील निधीतील रक्कम तालुक्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अद्यापही जमा झालेला नाही. अचूक याद्या नसल्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. अपुऱ्या पावसामुळे खरीप २०१४ चा हंगाम उध्वस्त झाला. जिल्ह्यात पैसेवारी ५० पैश्याच्या ात ४६ पैसे आहे. त्यामूळे जिल्ह्यात १४ तालुक्यामधील १९८१ गावामध्ये शासनाचे दुष्काळ स्थिती घोषित केली. त्यामूळे जिल्ह्यातील ४ लाख ५३ हजार ९७४ शेतकऱ्यांना सोई सवलती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. जिल्ह्यात दुष्काळ निधीसाठी ३०२ कोटी ५१ लाख रुपयांची आवश्यकता असतांना ८ जोनवारी २०१५ ला १२५ कोटी ७९ लक्ष रुपयाचा निधी प्राप्त झाला. व दुसऱ्या टप्यातील १२५ कोटी ८४ लाख रुपयांचा निधी ५ फेब्रूवारीला सर्व तालुक्याला वितरीत करण्यात आला. असा एकूण ८० टक्यांचा २५१ कोटी ६३ लाखाचा निधी सर्व तालुक्याला वितरीत करण्यात आला. मात्र पहिल्या टप्यातील निधीचे केवळ ८१ ते ८३ टक्केच वितरीत झाल्याचा अहवाल आहे. प्रत्यक्षात यापेक्षा कमी प्रमाणात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात निधी जमा झाला आहे. एका पेक्षा अधिक गावांचा तलाठ्यांकडे असनारा अधिभार, याद्या अचूक नसने, शेतकऱ्यांचे वारंवार बदलनारे बँक खाते क्रमांक आदी कारणामुळे काही गावामधील शेतकऱ्यांच्या हा निधी मिळू शकलेला नाही.