शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

दुष्काळनिधीचे वाटप बाकी

By admin | Updated: February 7, 2015 00:11 IST

जिल्ह्यातील साडेचार लाख अल्प, अत्यल्प व बहुभूधारक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने दुसऱ्या टप्यातील १२५ कोटी ८४ लाखांचा निधी ...

अमरावती : जिल्ह्यातील साडेचार लाख अल्प, अत्यल्प व बहुभूधारक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने दुसऱ्या टप्यातील १२५ कोटी ८४ लाखांचा निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे गुरुवारी सर्व तालुक्यांना वितरित केला. मात्र ८ जानेवारीला प्राप्त पहिल्या टप्यामधील निधीतील रक्कम तालुक्यामधील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अद्यापही जमा झालेला नाही. अचूक याद्या नसल्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. अपुऱ्या पावसामुळे खरीप २०१४ चा हंगाम उध्वस्त झाला. जिल्ह्यात पैसेवारी ५० पैश्याच्या ात ४६ पैसे आहे. त्यामूळे जिल्ह्यात १४ तालुक्यामधील १९८१ गावामध्ये शासनाचे दुष्काळ स्थिती घोषित केली. त्यामूळे जिल्ह्यातील ४ लाख ५३ हजार ९७४ शेतकऱ्यांना सोई सवलती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. जिल्ह्यात दुष्काळ निधीसाठी ३०२ कोटी ५१ लाख रुपयांची आवश्यकता असतांना ८ जोनवारी २०१५ ला १२५ कोटी ७९ लक्ष रुपयाचा निधी प्राप्त झाला. व दुसऱ्या टप्यातील १२५ कोटी ८४ लाख रुपयांचा निधी ५ फेब्रूवारीला सर्व तालुक्याला वितरीत करण्यात आला. असा एकूण ८० टक्यांचा २५१ कोटी ६३ लाखाचा निधी सर्व तालुक्याला वितरीत करण्यात आला. मात्र पहिल्या टप्यातील निधीचे केवळ ८१ ते ८३ टक्केच वितरीत झाल्याचा अहवाल आहे. प्रत्यक्षात यापेक्षा कमी प्रमाणात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात निधी जमा झाला आहे. एका पेक्षा अधिक गावांचा तलाठ्यांकडे असनारा अधिभार, याद्या अचूक नसने, शेतकऱ्यांचे वारंवार बदलनारे बँक खाते क्रमांक आदी कारणामुळे काही गावामधील शेतकऱ्यांच्या हा निधी मिळू शकलेला नाही.