शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहाय्य हाच अजेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 22:06 IST

जिल्ह्यातील दुष्काळी भागात प्राधान्याने सुविधा, पाणीटंचाईवर मात व किसान सन्मान योजना आपल्या अजेंड्यावर राहणार आहेत. यासोबतच जिल्ह्यासाठी जे काही महत्त्वाचे आहे, त्याला आपण प्राधान्य देऊ. हाच अजेंडा राहणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : स्थानिक प्राधान्यानुसार व्हिजन, माध्यमांना ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील दुष्काळी भागात प्राधान्याने सुविधा, पाणीटंचाईवर मात व किसान सन्मान योजना आपल्या अजेंड्यावर राहणार आहेत. यासोबतच जिल्ह्यासाठी जे काही महत्त्वाचे आहे, त्याला आपण प्राधान्य देऊ. हाच अजेंडा राहणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.अमरावतीचे जिल्हाधिकारी म्हणूून शैलेश नवाल यांनी मंगळवारी कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनाबाबत नवाल म्हणाले, लोकशाहीत लोकांनी मत मांडणे महत्त्वाचे आहे. ज्या समस्येचा तोडगा माझ्या अधिनस्थ विभागाकडून निघणार असेल, तो तातडीने निकाली काढण्यावर भर देणार आहोत. काही प्रश्न हे शासनस्तरावरचे असतात. त्याचाही आपण पाठपुरावा करू. जिल्हा संवेदनशील असल्याने स्थानिक समस्यांचा त्वरित निपटारा व्हावा, यासाठी वॉर रूम सुरू करणार आहे. त्या माध्यमातून अधिकाधिक समस्या सोडविण्याचा आपला प्रयत्न राहील, असे नवाल म्हणालेमेळघाटातील रिक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरतीसंदर्भात नुकताच शासननिर्णय निघाला. यावर जिल्हास्तरावर तोडगा काढण्यात येईल. आरोग्यसेवेच्या माध्यमातून कुपोषणावर मात करण्याचा प्रयत्न राहणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे. सद्यस्थितीत याद्या तयार होत आहेत. योजनेत शेतकऱ्यांनी त्वरित कागदपत्रे द्यावीत, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.२०१० तुकडीचे अधिकारीमूळचे राजस्थान येथील शैलेश नवाल यापूर्वी वर्धा तेथे जिल्हाधिकारी होते. ते २०१० च्या आयएएस तुकडीचे अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी डहाणू येथे सहायक जिल्हाधिकारी तथा आदिवासी विभागाचे प्रकल्प संचालक म्हणून २०१४ पर्यंत कार्य केले. त्यानंतर अहमदनगरला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी म्हनून काम पाहिले. ते दिल्ली स्कुल आॅफ इकानॉमिक्सचे विद्यार्थी आहेत. त्यांनी एम.ए. अर्थशास्त्रात प्रथम श्रेणी प्राप्त केली आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये त्यांनी आॅनलाइन सेवा देण्यावर भर दिला.