शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहाय्य हाच अजेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 22:06 IST

जिल्ह्यातील दुष्काळी भागात प्राधान्याने सुविधा, पाणीटंचाईवर मात व किसान सन्मान योजना आपल्या अजेंड्यावर राहणार आहेत. यासोबतच जिल्ह्यासाठी जे काही महत्त्वाचे आहे, त्याला आपण प्राधान्य देऊ. हाच अजेंडा राहणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : स्थानिक प्राधान्यानुसार व्हिजन, माध्यमांना ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील दुष्काळी भागात प्राधान्याने सुविधा, पाणीटंचाईवर मात व किसान सन्मान योजना आपल्या अजेंड्यावर राहणार आहेत. यासोबतच जिल्ह्यासाठी जे काही महत्त्वाचे आहे, त्याला आपण प्राधान्य देऊ. हाच अजेंडा राहणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.अमरावतीचे जिल्हाधिकारी म्हणूून शैलेश नवाल यांनी मंगळवारी कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनाबाबत नवाल म्हणाले, लोकशाहीत लोकांनी मत मांडणे महत्त्वाचे आहे. ज्या समस्येचा तोडगा माझ्या अधिनस्थ विभागाकडून निघणार असेल, तो तातडीने निकाली काढण्यावर भर देणार आहोत. काही प्रश्न हे शासनस्तरावरचे असतात. त्याचाही आपण पाठपुरावा करू. जिल्हा संवेदनशील असल्याने स्थानिक समस्यांचा त्वरित निपटारा व्हावा, यासाठी वॉर रूम सुरू करणार आहे. त्या माध्यमातून अधिकाधिक समस्या सोडविण्याचा आपला प्रयत्न राहील, असे नवाल म्हणालेमेळघाटातील रिक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरतीसंदर्भात नुकताच शासननिर्णय निघाला. यावर जिल्हास्तरावर तोडगा काढण्यात येईल. आरोग्यसेवेच्या माध्यमातून कुपोषणावर मात करण्याचा प्रयत्न राहणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे. सद्यस्थितीत याद्या तयार होत आहेत. योजनेत शेतकऱ्यांनी त्वरित कागदपत्रे द्यावीत, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.२०१० तुकडीचे अधिकारीमूळचे राजस्थान येथील शैलेश नवाल यापूर्वी वर्धा तेथे जिल्हाधिकारी होते. ते २०१० च्या आयएएस तुकडीचे अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी डहाणू येथे सहायक जिल्हाधिकारी तथा आदिवासी विभागाचे प्रकल्प संचालक म्हणून २०१४ पर्यंत कार्य केले. त्यानंतर अहमदनगरला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी म्हनून काम पाहिले. ते दिल्ली स्कुल आॅफ इकानॉमिक्सचे विद्यार्थी आहेत. त्यांनी एम.ए. अर्थशास्त्रात प्रथम श्रेणी प्राप्त केली आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये त्यांनी आॅनलाइन सेवा देण्यावर भर दिला.