शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
3
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
4
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
5
Technology: SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
6
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
7
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
8
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
9
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
10
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
11
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
12
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
13
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
14
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
15
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
16
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
17
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
18
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
19
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
20
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन

शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहाय्य हाच अजेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 22:06 IST

जिल्ह्यातील दुष्काळी भागात प्राधान्याने सुविधा, पाणीटंचाईवर मात व किसान सन्मान योजना आपल्या अजेंड्यावर राहणार आहेत. यासोबतच जिल्ह्यासाठी जे काही महत्त्वाचे आहे, त्याला आपण प्राधान्य देऊ. हाच अजेंडा राहणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी : स्थानिक प्राधान्यानुसार व्हिजन, माध्यमांना ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील दुष्काळी भागात प्राधान्याने सुविधा, पाणीटंचाईवर मात व किसान सन्मान योजना आपल्या अजेंड्यावर राहणार आहेत. यासोबतच जिल्ह्यासाठी जे काही महत्त्वाचे आहे, त्याला आपण प्राधान्य देऊ. हाच अजेंडा राहणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.अमरावतीचे जिल्हाधिकारी म्हणूून शैलेश नवाल यांनी मंगळवारी कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनाबाबत नवाल म्हणाले, लोकशाहीत लोकांनी मत मांडणे महत्त्वाचे आहे. ज्या समस्येचा तोडगा माझ्या अधिनस्थ विभागाकडून निघणार असेल, तो तातडीने निकाली काढण्यावर भर देणार आहोत. काही प्रश्न हे शासनस्तरावरचे असतात. त्याचाही आपण पाठपुरावा करू. जिल्हा संवेदनशील असल्याने स्थानिक समस्यांचा त्वरित निपटारा व्हावा, यासाठी वॉर रूम सुरू करणार आहे. त्या माध्यमातून अधिकाधिक समस्या सोडविण्याचा आपला प्रयत्न राहील, असे नवाल म्हणालेमेळघाटातील रिक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरतीसंदर्भात नुकताच शासननिर्णय निघाला. यावर जिल्हास्तरावर तोडगा काढण्यात येईल. आरोग्यसेवेच्या माध्यमातून कुपोषणावर मात करण्याचा प्रयत्न राहणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना आहे. सद्यस्थितीत याद्या तयार होत आहेत. योजनेत शेतकऱ्यांनी त्वरित कागदपत्रे द्यावीत, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.२०१० तुकडीचे अधिकारीमूळचे राजस्थान येथील शैलेश नवाल यापूर्वी वर्धा तेथे जिल्हाधिकारी होते. ते २०१० च्या आयएएस तुकडीचे अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी डहाणू येथे सहायक जिल्हाधिकारी तथा आदिवासी विभागाचे प्रकल्प संचालक म्हणून २०१४ पर्यंत कार्य केले. त्यानंतर अहमदनगरला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी म्हनून काम पाहिले. ते दिल्ली स्कुल आॅफ इकानॉमिक्सचे विद्यार्थी आहेत. त्यांनी एम.ए. अर्थशास्त्रात प्रथम श्रेणी प्राप्त केली आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये त्यांनी आॅनलाइन सेवा देण्यावर भर दिला.