शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

अप्पर वर्धाची सर्व दारे पुन्हा उघडली, धरण ९९.६४ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:14 IST

मोर्शी : विदर्भातील सर्वात मोठे धरण म्हणून गणल्या जाणाऱ्या अप्पर वर्धा धरणात २३ सप्टेंबर रोजी ९९.६४ टक्के जलसाठा झाला. ...

मोर्शी : विदर्भातील सर्वात मोठे धरण म्हणून गणल्या जाणाऱ्या अप्पर वर्धा धरणात २३ सप्टेंबर रोजी ९९.६४ टक्के जलसाठा झाला. त्यामुळे सर्व १३ दारे ५० सेंटिमीटरने उघडण्यात आली आहेत. त्यामधून १०५३ घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग वर्धा नदीपात्रात होत आहे. या तेराही दरवाजातून वाहणाऱ्या पाण्याचे विहंगम दृश्य बघण्यासाठी पर्यटकांनी पुन्हा मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

मोर्शीजवळ असलेल्या अप्पर वर्धा धरण क्षेत्रामध्ये कमी पाऊस पडल्याने भर पावसाळ्यात या धरणात केवळ ७८ टक्के पाण्याचा साठा झाला होता. शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या नळ-दमयंती सागर म्हणजेच अप्पर वर्धा धरणाची पाणी साठवण्याची मर्यादा ३४२.५० एवढी आहे. २३ सप्टेंबर रोजी या धरणामध्ये ३४२.४८ मीटर पाणीसाठा झाला आहे. पहिल्यांदाच ११ सप्टेंबर रोजी पाच दारे ५० सेंटिमीटरने उघडण्यात आली होती. परंतु, धरणात पाण्याचा येवा वाढत असल्याचे पाहून त्याच दिवशी रात्री ११ वाजता धरणाची १३ दरवाजे उघडण्यात आली होती.

गुरुवारी सकाळपर्यंत सहा दरवाजे उघडी ठेवण्यात आली होती. मात्र, मध्य प्रदेशातून वाहणाऱ्या नद्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने आवक वाढत गेली. सध्या अप्पर वर्धा धरणाची निर्धारित लेव्हल व धरण १०० टक्के पूर्णत्वास जात असल्याचे पाहून तेराही दारे उघडून मोठ्या प्रमाणात विसर्ग वर्धा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. तेराही गेटमधून सोडण्यात येणारे पाण्याचे विहंगम दृश्य बघण्यासाठी व पाण्याचे तुषार अंगावर घेण्यासाठी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहेत. अप्पर वर्धा धरण परिसरात मोर्शी पोलीस ठाण्याच्यवतीने बॅरिकेड लावण्यात आले आहेत. धरणाचे अधिकारी व बीट अंमलदार राहुल वानखडे परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.