शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

‘अमृत’ची चौफेर नाकेबंदी

By admin | Updated: January 24, 2017 00:18 IST

अतिरिक्त सुरक्षा रक्षक पुरवून महापालिकेची आर्थिक फसवणूक करणाऱ्या ‘अमृत’ संस्थेची चौफेर नाकाबंदी करण्यात आली आहे.

अनियमिततेवर अंकुश : आयुक्तांची पारदर्शक भूमिकाअमरावती : अतिरिक्त सुरक्षा रक्षक पुरवून महापालिकेची आर्थिक फसवणूक करणाऱ्या ‘अमृत’ संस्थेची चौफेर नाकाबंदी करण्यात आली आहे. अमृत संस्थेकडून विविध शासकीय करापोटी ३३.९२ लाख रुपयांचा भरणा होत नाही, तोपर्यंत पुढील देयके संस्थेस अदा करू नयेत, अशी शिफारस अतिरिक्त आयुक्तांकडून केल्यानंतर ‘अमृत’ची देयके थांबविण्यात आली आहेत. महापालिकेतील एक-दोन विशिष्ट अधिकाऱ्यांना खिशात ठेवून, त्यांना महिन्याकाठी बिदागी देवून अमृतने हा गोरखधंदा चालविला होता. महापालिकेतील काहींनी या आर्थिक अनियमिततेकडे डोळेझाक केल्याने आपले कुणी बिघडवूच शकत नाही, या अविर्भावात अमृतचे म्होरके होते. स्वत:च्या संस्थेची देयके काढण्यासाठी आवश्यक असलेले सर्व सोपस्कार दोन ते तीन तासात करून ‘अमृत’ने त्यांच्यावरील प्रशासकीय वरदहस्ताची चुणूकही सात महिने दाखवून दिली. सुरक्षारक्षकांची कुठलीही हजेरी, संबंधित विभागप्रमुखांचा अहवाल, शासकीय अंशदान भरल्याच्या चालान हे सर्व अत्यावश्यक कागदपत्रे न देता ‘अमृत’ची महिन्याकाळी १६ ते १७ लाख रुपयांची देयके विनासायास काढण्यात आली. १७८ सुरक्षारक्षक नेमके कुठ कार्यरत आहेत, हे तपासून पाहण्याचे सौजन्य सामान्य प्रशासन विभाग आणि संबंधित घटकाने दाखविले नाही आणि त्यामुळेच ‘अमृत’चे फावले. अतिरिक्त आयुक्त आणि तत्पूर्वी पर्यावरण अधिकारी महेश देशमुख यांनी दिलेल्या अहवालातून ‘अमृत’ची ही बदमाशी उघड झाली. शेटेंनी तर या आर्थिक अनियमिततेची जबाबदारी उपायुक्त औगड, मुख्यलेखाधिकारी प्रेमदास राठोड आणि कार्यालय अधीक्षक दुर्गादास मिसाळ यांच्यावर निश्चित केली. या तीनही घटक प्रमुखांनी वेळीच या प्रकाराकडे लक्ष घातले असते तर महापालिकेला ३३.९२ कोटींनी चुना लावण्याचे धाडस ‘अमृत’ला करता आले नसते. मात्र, अर्थपूर्ण संबंधाने हा गोरखधंदा आॅगस्ट २०१६ पर्यंत सुरू राहिला. (प्रतिनिधी)अशा आहेत शिफारशीमाहे फेब्रुवारी २०१७ पासून सुरक्षारक्षाकांची आवश्यकसंख्या निश्चित करण्याकरिता सामान्य प्रशासन विभागाने विभागनिहाय आढावा घ्यावा, अत्यावश्यक तेवढे सुरक्षारक्षक नेमण्याकरिता अधिकृत नोंदणीकृत व ३ वर्षाचे लेखापरीक्षण झालेल्या संस्थेकडून रितसर ई-निविदा मागविण्याची कारवाई त्वरित सुरू करावी, अशी शिफारस अहवालातून केली आहे. ‘अमृत’ला नो एन्ट्री!‘अमृत’ सुरक्षारक्षक पुरविणारी संस्था १० फेब्रुवारीला नोंदणिकृत झाली व लगेचच २५ फेब्रुवारी २०१६ रोजी स्थायी समितीवर सुरक्षारक्षक पुरवठा करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. ही बाब नियमबाह्य ठरविण्यात आल्याने आणि अधिकृृत नोंदणिकृत व ३ वर्षांचे लेखापरीक्षण झालेल्या संस्थेकडूनच ई-निविदा मागविण्याची शिफारस करण्यात आल्याने ‘अमृत’ला भविष्यात नो एन्ट्री राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अमृत नियमबाह्यचअमृत सुरक्षारक्षक पुरविणारी सहकारी संस्था नोंदणीकृत होताच महापालिकेने त्यांना सुरक्षारक्षक पुरविण्याचे कंत्राट दिले. हे कंत्राट नियमबाह्य पद्धतीने दिल्याने या संस्थेवरील कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येवू नये, अशी शिफारस सोमनाथ शेटे यांनी केली आहे. अमृत संस्थेने काही विभागात आवश्यक नसताना सुरक्षारक्षक नेमल्याने महापालिकेला उगाचाच अधिकचा आर्थिक भुर्दंड बसला आहे.