शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

अकोला राष्ट्रीय महामार्ग बनला धोक्याचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:12 IST

बडनेरा : अकोला राष्ट्रीय महामार्गाचा अरुंद रस्ता प्रामुख्याने रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांना अत्यंत धोक्याचा ठरत आहे. चौपदरीकरणाच्या कामाला गती द्या, ...

बडनेरा : अकोला राष्ट्रीय महामार्गाचा अरुंद रस्ता प्रामुख्याने रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांना अत्यंत धोक्याचा ठरत आहे. चौपदरीकरणाच्या कामाला गती द्या, असे वाहनचालकांमध्ये संतप्तपणे बोलले जात आहे. हल्ली अपघाताचे प्रमाण प्रचंड वाढले आहेत.

दोन ते अडीच वर्षांपासून चौपदरीकरणाच्या कामासाठी बडनेरा ते अकोला महामार्ग अर्धा खोदून ठेवला आहे. कंत्राटदार कामे सोडून गेल्याने या महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम थांबले होते. अलीकडेच कामाला सुरुवात झाली आहे. मात्र, बडनेरा शहरापासून जवळच असणाऱ्या याच महामार्गावरील लोणी तसेच जवळपासच्या खेड्यांतील नागरिक बडनेरा, अमरावती शहरात दररोज कामानिमित्त येतात. मात्र, चौपदरीकरणाच्या कामामुळे अरुंद असणारा रस्ता या सर्वांसाठी अत्यंत धोक्याचा झाला आहे. रात्रीच्या वेळी गाडी खड्ड्यात जाते की काय? अशी भीती असते. दुचाकीस्वारांना जीव मुठीत घेऊन महामार्गावरून प्रवास करावा लागत आहे. रस्त्याच्या कडेला कमीत कमी रस्ता दिसेल, असे काही प्रयोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. रस्त्याच्या कडेला केवळ पोते ठेवण्यात आले. त्यावरचे स्टिकर्स गायब झाले. यामुळे रात्रीच्या वेळी वाहनचालकांना महामार्गावरून प्रवास करणे धोक्याचे झाले आहे. नागपूरहून मुंबई, पुणे या मुख्य शहरांकडे याच मार्गावरून जावे लागतात. त्यामुळे सारखी वाहनांची वर्दळ असते. अकोला महामार्गावरील चौपदरीकरणाला गती द्यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांची आहे. संबंधित प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे.

बॉक्स

अरुंद रस्ता, भरधाव वाहने

अकोला महामार्गावर अर्ध्या रस्त्याचे खोदकाम झाल्याने हा रस्ता अरुंद झाला आहे. वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. वाहने भरधाव धावतात. दुचाकीस्वारांना प्रचंड धोका पत्करून या महामार्गावरून प्रवास करावा लागत आहे. स्त्यावर खड्डे आहेत. रस्त्याच्या खाली उतरताना वाहन घसरेल आणि भरधाव येणारे मागील वाहन धडक मारेल का? ही भीती दुचाकीस्वारांना सतावत आहे. तेव्हा प्रशासनाने अरुंद रस्ता दुचाकीस्वारांसाठी कसा सुरक्षित राहील, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.