शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

अजिंक्य गजाआड, ललित मोकळाच!

By admin | Updated: December 27, 2014 22:43 IST

तपोवनातील बालगृहात बिनदिक्कतपणे वावरणारा, मुलींच्या खोलीत प्रवेश करणारा तत्कालिन सचिव श्रीराम गोसावी याचा मुलगा अजिंक्य याला पोलिसांनी जेरबंद केले. त्याच बालगृहात

नियमसंगत कारवाईची अपेक्षा : अमरावतीच्या बाल कल्याण समितीकडे नजरा गणेश देशमुख - अमरावतीतपोवनातील बालगृहात बिनदिक्कतपणे वावरणारा, मुलींच्या खोलीत प्रवेश करणारा तत्कालिन सचिव श्रीराम गोसावी याचा मुलगा अजिंक्य याला पोलिसांनी जेरबंद केले. त्याच बालगृहात नियमबाह््यरित्या वावरणारा, मुलींच्या कक्षात बिनदिक्कत प्रवेश करणारा, मुलीला मारहाण करणारा ललित अग्निहोत्री हा तरुण मात्र मोकळाच आहे.तपोवनात लावण्यात आलेल्या तक्रारपेटीत अजिंक्यच्या कारनाम्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यात. तपोवनातील मुलींनी पोलिसांना दिलेल्या बयाण आणि तक्रारीवरून अजिंक्यविरुद्ध कारवाई करणे पोलिसांना नियमसंगत झाले. जसा अजिंक्यचा बालगृहाशी कुठलाही संबंध नव्हता तसाच ललित अग्निहोत्री या तरुणाचाही बालगृहाशी कुठलाच संबंध नव्हता. त्रयस्थ असतानाही ललित बालगृहात नेहमीच त्याच्या इच्छेप्रमाणे प्रविष्ठ व्हायचा, वावरायचा. ललित बालगृहातील मुलींच्या खोलीत प्रवेश करायचा, अनेकवेळा अमानुष मारहाण करायचा. बालगृहात वास्तव्यास असलेल्या मुलींना याबाबत विचारल्यास बहुतांश मुली ललितच्या या कृत्याची आजही कबुली देतात. प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींजवळ काही मुलींनी अलीकडेच ललितच्या वागणुकीचे धक्कादाय किस्से कथन केलेत. वसतिगृहाचा तत्कालिन अधीक्षक गजानन चुटे याने देखील ललितचा नियमबाह्य प्रवेश आणि मारहाण याबाबतचा अधिकृत अहवाल सादर केलेला आहे. तपोवनातील मुलगी इतर महाविद्यालयातील वसतीगृहात असताना ललित त्या मुलीला भेटायला जात असल्याचा आणि मारहाण करीत असल्याचा उल्लेख अधिकृत दस्तऐवजांमध्ये आढळतो. खासगी महाविद्यालयाच्या अधिक्षेकेनेही याबाबत वक्तव्य केलेले आहे. नागपूरच्या बालकल्याण समितीने ललितच्या या वागणुकीविरुद्ध पोलीस तक्रार करण्याचेही आदेशित केलेले आहे. त्याची अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही. ललितची वागणूक गैरकायदेशीर होती, हे पुराव्यासकट सिद्ध होत असताना त्याला पाठिशी का घातले जाते, हा गुढ प्रश्न आहे. अमरावतीच्या बालकल्याण समितीने तपोवनातील मुलींच्या सुरक्षेची चिंता वाहत त्यांना स्थानांतरीत करण्याचा निर्णय घेतला. तो स्तुत्य आहे. ललित अग्निहोत्री या त्रयस्थ तरुणाच्या बेकायदा वागणुकीबाबतही अमरावतीच्या बालकल्याण समितीने कायदेसंगत निर्णय घेऊन नियमांचा आणि कायद्याचा आदर राखावा, अशी लोकभावना आहे.