शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अजिंक्य गजाआड, ललित मोकळाच!

By admin | Updated: December 27, 2014 22:43 IST

तपोवनातील बालगृहात बिनदिक्कतपणे वावरणारा, मुलींच्या खोलीत प्रवेश करणारा तत्कालिन सचिव श्रीराम गोसावी याचा मुलगा अजिंक्य याला पोलिसांनी जेरबंद केले. त्याच बालगृहात

नियमसंगत कारवाईची अपेक्षा : अमरावतीच्या बाल कल्याण समितीकडे नजरा गणेश देशमुख - अमरावतीतपोवनातील बालगृहात बिनदिक्कतपणे वावरणारा, मुलींच्या खोलीत प्रवेश करणारा तत्कालिन सचिव श्रीराम गोसावी याचा मुलगा अजिंक्य याला पोलिसांनी जेरबंद केले. त्याच बालगृहात नियमबाह््यरित्या वावरणारा, मुलींच्या कक्षात बिनदिक्कत प्रवेश करणारा, मुलीला मारहाण करणारा ललित अग्निहोत्री हा तरुण मात्र मोकळाच आहे.तपोवनात लावण्यात आलेल्या तक्रारपेटीत अजिंक्यच्या कारनाम्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यात. तपोवनातील मुलींनी पोलिसांना दिलेल्या बयाण आणि तक्रारीवरून अजिंक्यविरुद्ध कारवाई करणे पोलिसांना नियमसंगत झाले. जसा अजिंक्यचा बालगृहाशी कुठलाही संबंध नव्हता तसाच ललित अग्निहोत्री या तरुणाचाही बालगृहाशी कुठलाच संबंध नव्हता. त्रयस्थ असतानाही ललित बालगृहात नेहमीच त्याच्या इच्छेप्रमाणे प्रविष्ठ व्हायचा, वावरायचा. ललित बालगृहातील मुलींच्या खोलीत प्रवेश करायचा, अनेकवेळा अमानुष मारहाण करायचा. बालगृहात वास्तव्यास असलेल्या मुलींना याबाबत विचारल्यास बहुतांश मुली ललितच्या या कृत्याची आजही कबुली देतात. प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींजवळ काही मुलींनी अलीकडेच ललितच्या वागणुकीचे धक्कादाय किस्से कथन केलेत. वसतिगृहाचा तत्कालिन अधीक्षक गजानन चुटे याने देखील ललितचा नियमबाह्य प्रवेश आणि मारहाण याबाबतचा अधिकृत अहवाल सादर केलेला आहे. तपोवनातील मुलगी इतर महाविद्यालयातील वसतीगृहात असताना ललित त्या मुलीला भेटायला जात असल्याचा आणि मारहाण करीत असल्याचा उल्लेख अधिकृत दस्तऐवजांमध्ये आढळतो. खासगी महाविद्यालयाच्या अधिक्षेकेनेही याबाबत वक्तव्य केलेले आहे. नागपूरच्या बालकल्याण समितीने ललितच्या या वागणुकीविरुद्ध पोलीस तक्रार करण्याचेही आदेशित केलेले आहे. त्याची अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही. ललितची वागणूक गैरकायदेशीर होती, हे पुराव्यासकट सिद्ध होत असताना त्याला पाठिशी का घातले जाते, हा गुढ प्रश्न आहे. अमरावतीच्या बालकल्याण समितीने तपोवनातील मुलींच्या सुरक्षेची चिंता वाहत त्यांना स्थानांतरीत करण्याचा निर्णय घेतला. तो स्तुत्य आहे. ललित अग्निहोत्री या त्रयस्थ तरुणाच्या बेकायदा वागणुकीबाबतही अमरावतीच्या बालकल्याण समितीने कायदेसंगत निर्णय घेऊन नियमांचा आणि कायद्याचा आदर राखावा, अशी लोकभावना आहे.