शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
3
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
4
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
5
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
6
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
7
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
8
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
9
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
10
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
11
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
12
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
13
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
14
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
15
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
16
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
17
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
18
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
19
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
20
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 

संत्र्याला हवा २५ हजार हमीभाव

By admin | Updated: October 12, 2015 00:27 IST

वरुड-मोर्शी तालुक्यात संत्रा उत्पादकांची संख्या मोठी आहे. हजारो हेक्टर जमिनीत संत्रा उत्पादन घेतले जाते.

शासनाकडून घोर निराशा : संत्रा उत्पादक शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात संजय खासबागे वरुडवरुड-मोर्शी तालुक्यात संत्रा उत्पादकांची संख्या मोठी आहे. हजारो हेक्टर जमिनीत संत्रा उत्पादन घेतले जाते. परंतु इतर पिकांप्रमाणे संत्र्याला हमीभाव मिळत नसल्याने संत्रा उत्पादक हैराण झाला आहे. त्यामुळे संत्र्याला देखील अन्य पिकांप्रमाणे प्रति टन २५ हजार रुपयप्रमाणे हमीभाव जाहीर करण्याची मागणी संत्रा उत्पादकांनी केली आहे. जिल्ह्यातील संत्र्याचे क्षेत्र ७० हजार हेक्टर इतके आहे. जिल्ह्यातून वरुड-मोर्शी तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ३५ हजार हेक्टर जमिनीत संत्राचे पीक घेतले जाते. वरूड तालुक्यात संत्रा लागवडीखाली २१ हजार हेक्टर शेतजमीन असून उत्पादन घेणारी संत्रा झाडे १७ हजार ६७१ हेक्टर ६७ आर. जमिनीवर आहे. दरवर्षी मृग बहाराचे संत्रा उत्पादन घेतले जात होते. परंतु गेल्या चार वर्षांपासून सतत गारपिट आणि अतिवृष्टीमुळे संत्रा उत्पादकांना लाखो रुपयांचा फटका बसत असल्याने मृग बहारापेक्षा आंबिया बहाराची फळे घेण्यास ७० टक्के संत्रा उत्पादकांनी सुरुवात केली. जिल्ह्यात साडेपाच लाख टन संत्रा उत्पादन घेतले जाते. यामध्ये साडेतीन लाख टन आंबिया बहाराचे तर दोन लाख टन मृग बहाराचे उत्पादन घेतले जाते. ७० टक्के आंबियाबहार घेतला जातो. संत्रा उत्पादकांना सुगीचे दिवस येण्याकरिता मध्यस्थी करुन विकला जाणाऱ्या संत्र्याची पध्दत बंद होऊन थेट मार्केटिंगची व्यवस्था आणि अधिक क्षमतेचे प्रक्रिया केंद्र उभारल्यास संत्रा उत्पादकांना चांगले दिवस येतील. परंतु हे होणार तरी कधी? हा प्रश्न आहे. संत्र्यापासून ९०० कोटी रुपयांपेक्षा अधिक आर्थिक उलाढाल करणारी आणि हजारो मजुरांच्या हाताला काम देणारी बाजारपेठ निर्माण होऊ शकते. परंतु राजाश्रया अभावी संत्रा उत्पादक परंतु पणन आणि प्रक्रिया नसल्याने संत्रा उत्पादकांना अखेरची घरघर लागण्याची शक्यता आहे. राज्य, केंद्र शासनाकडून शेतकऱ्यांकडून कृषी उत्पादनामध्ये ज्वारी, तूर, कापूस, ऊस, संत्रा कलमा यासह आदी काही पिकांना शासनाकडून हमीभावाने खरेदी केले जाते. याच धर्तीवर संत्रासुध्दा हमीभावाने राज्य शासनाने खरेदी करुन वायनरी, रस प्रक्रिया केंद्र आदींसाठी संत्र्यांचा वापर केल्यास बहुगुणी संत्र्याला नक्कीच चांगले दिवस येतील, अशी अपेक्षा आहे. मुख्यमंत्र्यांनी अलीकडेच दिलेल्या आश्वासनामुळे संत्रा उत्पादकांच्या आशा उंचावल्या आहेत.