लोकमत न्यूज नेटवर्कधारणी / अमरावती : देशातील पहिले ‘डिजिटल ग्राम’ हरिसालसह मेळघाट परिसरातील कृषी अधिकारी, सहायक यांनी तेथील शेतकºयांच्या समस्यांबाबत प्रत्यक्ष शेतात पाहणी करून मार्गदर्शन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी दिल्यात.हरिसाल येथील विविध विकासकामांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत अधिकाºयांना मार्गदर्शन केले यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी आरोग्य अधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी, प्रफुल्ल कणाके, पौर्णिमा उपाध्याय, श्रिया रंगराजन व गणेश येवले उपस्थित होते. जिल्हाधिकारी बांगर म्हणाले, हरिसालमध्ये ८८५ बँक खाती उघडण्यात आली आहेत. रुपे कार्ड देण्यात आले आहे. गावातील उर्वरित नागरिकांचीही खाती उघडावीत. तसेच, एटीएम वापराबाबत कार्यशाळा घ्यावी. रोजगार हमी योजनेच्या कामांबाबत स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात यावा. शिबिर घेऊन सर्वांची आधारकार्ड नोंदणी पूर्ण करावी. प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधा वाढविण्यात याव्या, तसेच नेत्र तपासणी शिबिरे नियमित घ्यावी, असेही ते म्हणाले. हरिसाल येथे अद्ययावत व्यायामशाळा उभारण्यासह स्वच्छता व इतर विविध सुविधांत वाढ करण्याबाबत प्रस्ताव द्यावे, अशा सूचना त्यांनी केल्यात.स्वस्त धान्य विक्रेत्यांवर कारवाई करा हरिसालच्या स्वस्त धान्य दुकानदाराकडून नागरिकांना पावत्या दिल्या जात नसल्याची तक्रार आहे. त्याची चौकशी करुन कारवाई करावी, तसेच डिजिटल शिधापत्रिकेचा प्रभावी वापर व्हावा, असे निर्देश त्यांनी जिल्हा पुरवठा अधिकाºयाला दिले.
कृषी अधिकाºयांनी करावी प्रत्यक्ष पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 23:40 IST
देशातील पहिले ‘डिजिटल ग्राम’ हरिसालसह मेळघाट परिसरातील कृषी अधिकारी, सहायक यांनी तेथील शेतकºयांच्या समस्यांबाबत प्रत्यक्ष शेतात पाहणी करून मार्गदर्शन करावे,....
कृषी अधिकाºयांनी करावी प्रत्यक्ष पाहणी
ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांच्या सूचना : ‘डिजिटल ग्राम’मधील सुविधांबाबत आढावा