शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

विमा कंपनीविरुद्ध कृषी विभागाचा एफआयआर 

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: June 5, 2023 17:25 IST

कंपनीच्या दिरंगाईने शेतकरी परताव्यापासून वंचित, एसएओंची तक्रार

अमरावती : भारतीय कृषिविमा कंपनी प्रतिनिधींच्या त्रुटी, दिरंगाई व हलगर्जीपणामुळे जिल्ह्यातील शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहत आहे. त्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी कंपनीचे राज्य व्यवस्थापक दीपक पाटील, क्षेत्रीय व्यवस्थापक शकुंतला शेट्टी व जिल्हा समन्वयक नितीन सावळे यांच्याविरुद्ध गाडगेनगर ठाण्यात शनिवारी तक्रार दाखल केली.

पीकविमा कंपनीच्या मनमानी कारभारामुळे कृषिविभाग त्रस्त झालेला आहे. मागच्या खरीप हंगामात स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणीपश्चात नुकसान, यामध्ये प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने पंचनाम्याच्या प्रतीची मागणी सप्टेंबर, २०२२ पासून कृषी विभागाद्वारा सतत करण्यात आली आहे. मात्र, कंपनीद्वारा अद्यापही पंचनाम्याच्या प्रती देण्यात आल्या नाहीत. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील सभेत कंपनीद्वारा परताव्याची प्रलंबित १० कोटींपर्यंतची रक्कम १५ दिवसांत देण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात अद्यापर्यंत परतावा दिलेला नाही.

पीकविम्यासाठी लोकप्रतिनिधी, संघटना, यांचे समाधान कंपनीद्वारा केल्या जात नाही. वारंवार पाठपुरावा करण्यात येत असताना कंपनीद्वारा सहकार्य करण्यात येत नाही. त्यामुळे योजनेत सहभागी शेतकरी लाभापासून वंचित राहणार असल्याचे स्पष्ट झाल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद आहे.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाagricultureशेतीAmravatiअमरावती