शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

विमा कंपनीविरुद्ध कृषी विभागाचा एफआयआर 

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: June 5, 2023 17:25 IST

कंपनीच्या दिरंगाईने शेतकरी परताव्यापासून वंचित, एसएओंची तक्रार

अमरावती : भारतीय कृषिविमा कंपनी प्रतिनिधींच्या त्रुटी, दिरंगाई व हलगर्जीपणामुळे जिल्ह्यातील शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहत आहे. त्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी कंपनीचे राज्य व्यवस्थापक दीपक पाटील, क्षेत्रीय व्यवस्थापक शकुंतला शेट्टी व जिल्हा समन्वयक नितीन सावळे यांच्याविरुद्ध गाडगेनगर ठाण्यात शनिवारी तक्रार दाखल केली.

पीकविमा कंपनीच्या मनमानी कारभारामुळे कृषिविभाग त्रस्त झालेला आहे. मागच्या खरीप हंगामात स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणीपश्चात नुकसान, यामध्ये प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने पंचनाम्याच्या प्रतीची मागणी सप्टेंबर, २०२२ पासून कृषी विभागाद्वारा सतत करण्यात आली आहे. मात्र, कंपनीद्वारा अद्यापही पंचनाम्याच्या प्रती देण्यात आल्या नाहीत. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील सभेत कंपनीद्वारा परताव्याची प्रलंबित १० कोटींपर्यंतची रक्कम १५ दिवसांत देण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात अद्यापर्यंत परतावा दिलेला नाही.

पीकविम्यासाठी लोकप्रतिनिधी, संघटना, यांचे समाधान कंपनीद्वारा केल्या जात नाही. वारंवार पाठपुरावा करण्यात येत असताना कंपनीद्वारा सहकार्य करण्यात येत नाही. त्यामुळे योजनेत सहभागी शेतकरी लाभापासून वंचित राहणार असल्याचे स्पष्ट झाल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद आहे.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाagricultureशेतीAmravatiअमरावती