शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

विमा कंपनीविरुद्ध कृषी विभागाचा एफआयआर 

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: June 5, 2023 17:25 IST

कंपनीच्या दिरंगाईने शेतकरी परताव्यापासून वंचित, एसएओंची तक्रार

अमरावती : भारतीय कृषिविमा कंपनी प्रतिनिधींच्या त्रुटी, दिरंगाई व हलगर्जीपणामुळे जिल्ह्यातील शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहत आहे. त्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी कंपनीचे राज्य व्यवस्थापक दीपक पाटील, क्षेत्रीय व्यवस्थापक शकुंतला शेट्टी व जिल्हा समन्वयक नितीन सावळे यांच्याविरुद्ध गाडगेनगर ठाण्यात शनिवारी तक्रार दाखल केली.

पीकविमा कंपनीच्या मनमानी कारभारामुळे कृषिविभाग त्रस्त झालेला आहे. मागच्या खरीप हंगामात स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणीपश्चात नुकसान, यामध्ये प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने पंचनाम्याच्या प्रतीची मागणी सप्टेंबर, २०२२ पासून कृषी विभागाद्वारा सतत करण्यात आली आहे. मात्र, कंपनीद्वारा अद्यापही पंचनाम्याच्या प्रती देण्यात आल्या नाहीत. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील सभेत कंपनीद्वारा परताव्याची प्रलंबित १० कोटींपर्यंतची रक्कम १५ दिवसांत देण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात अद्यापर्यंत परतावा दिलेला नाही.

पीकविम्यासाठी लोकप्रतिनिधी, संघटना, यांचे समाधान कंपनीद्वारा केल्या जात नाही. वारंवार पाठपुरावा करण्यात येत असताना कंपनीद्वारा सहकार्य करण्यात येत नाही. त्यामुळे योजनेत सहभागी शेतकरी लाभापासून वंचित राहणार असल्याचे स्पष्ट झाल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद आहे.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाagricultureशेतीAmravatiअमरावती