शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

विमा कंपनीविरुद्ध कृषी विभागाचा एफआयआर 

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: June 5, 2023 17:25 IST

कंपनीच्या दिरंगाईने शेतकरी परताव्यापासून वंचित, एसएओंची तक्रार

अमरावती : भारतीय कृषिविमा कंपनी प्रतिनिधींच्या त्रुटी, दिरंगाई व हलगर्जीपणामुळे जिल्ह्यातील शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहत आहे. त्यामुळे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांनी कंपनीचे राज्य व्यवस्थापक दीपक पाटील, क्षेत्रीय व्यवस्थापक शकुंतला शेट्टी व जिल्हा समन्वयक नितीन सावळे यांच्याविरुद्ध गाडगेनगर ठाण्यात शनिवारी तक्रार दाखल केली.

पीकविमा कंपनीच्या मनमानी कारभारामुळे कृषिविभाग त्रस्त झालेला आहे. मागच्या खरीप हंगामात स्थानिक नैसर्गिक आपत्ती व काढणीपश्चात नुकसान, यामध्ये प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने पंचनाम्याच्या प्रतीची मागणी सप्टेंबर, २०२२ पासून कृषी विभागाद्वारा सतत करण्यात आली आहे. मात्र, कंपनीद्वारा अद्यापही पंचनाम्याच्या प्रती देण्यात आल्या नाहीत. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील सभेत कंपनीद्वारा परताव्याची प्रलंबित १० कोटींपर्यंतची रक्कम १५ दिवसांत देण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात अद्यापर्यंत परतावा दिलेला नाही.

पीकविम्यासाठी लोकप्रतिनिधी, संघटना, यांचे समाधान कंपनीद्वारा केल्या जात नाही. वारंवार पाठपुरावा करण्यात येत असताना कंपनीद्वारा सहकार्य करण्यात येत नाही. त्यामुळे योजनेत सहभागी शेतकरी लाभापासून वंचित राहणार असल्याचे स्पष्ट झाल्याचे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद आहे.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाagricultureशेतीAmravatiअमरावती