शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

जलशिवार, मग्रारोहयोच्या कामावर कृषी सहायकांचा बहिष्कार

By admin | Updated: February 17, 2016 00:10 IST

राज्यातील कृषी सहायक संवर्गाच्या विविध मागण्या शासनस्तरावर प्रलंबित आहेत.

सेवाज्येष्ठतेनेच पदोन्नती हवी : राज्यात टप्प्याटप्प्यात आंदोलनास सुरुवातअमरावती : राज्यातील कृषी सहायक संवर्गाच्या विविध मागण्या शासनस्तरावर प्रलंबित आहेत. याविषयी कृषी आयुक्तांनी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिलेल्या असताना प्रस्ताव झालेले नाहीत. या अन्यायाविरोधात राज्य कृषी सहायक संघटनेनी एल्गार पुकारला व टप्प्याटप्प्यांत आंदोलन सुरू केले आहे. जलयुक्त शिवार अभियान व मग्रारोहयो योजनेच्या कामावर बहिष्कार टाकल्याने शासनाच्या या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला अडथळा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यात कृषी विभागामध्ये ११,५०० कृषी सहायकांची पदे मंजूर आहे व कृषी पर्यवेक्षकपदी पदोन्नती देताना कृषी सहाय्यकामधून ७० टक्के, ३० टक्के सरळ सेवेने पदे भरण्यात येतात. अन्य विभागात हे प्रमाण ७५ टक्क्याचे आहे. त्यामुळे ७० ते ८० टक्के कृषी सहायक हे त्याच पदावर निवृत्त होतात. याविषयीचा प्रस्ताव शासनस्तरावर तयार करण्यात आला. मात्र तो प्रलंबित आहे. आता पुन्हा जुन्याच प्रक्रियेने जागा भरण्याचा घाट रचला असल्याचा संघटनेचा आरोप आहे. कृषी सहायकांना १२ वर्षांच्या सेवेनंतर पहिली व २४ वर्षाच्या सेवेनंतर दुसरी कालबद्ध पदोन्नती लागू करण्याचा निकाल मॅटने दिला आहे. त्याचा लाभ देण्याची मागणी संघटनेने केली आहे. तसेच ३ वर्षांचा कालावधी सेवाज्येष्ठता व १२ वर्षे कालबद्ध पदोन्नतीसाठी व ईतर सर्व लाभांसाठी अर्हताकारी सेवा म्हणून ग्राह्य करण्यात यावी. कृषी पर्यवेक्षक पदाच्या पदोन्नतीत राज्यात सर्वंकक्ष एकच धोरण व कालमर्यादा निश्चित करण्यात यावी व रिक्त असलेल्या कृषी पर्यवेक्षकांच्या पदांवर कृषी सहायकांना पदोन्नती देऊन भरण्यात यावी, यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी कृषी सहायकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.