शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
3
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
4
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
5
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
6
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
7
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
8
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
9
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
10
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
11
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
12
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
13
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
14
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
15
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
16
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
17
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
18
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
19
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
20
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!

कोरडवाहू अभियानांतर्गत शेती विकास

By admin | Updated: June 2, 2014 00:39 IST

एकूण पिकाखालील क्षेत्रापैकी ८0 टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे.

एकूण पिकाखालील क्षेत्रापैकी ८0 टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. या क्षेत्रामधील पिकाच्या उपलब्धतेमध्ये पावसाच्या चढ-उतारामुळे उत्पादकतेवर परिणाम होतो. कोरडवाहू क्षेत्रात पडणारा पाऊस आणि उपलब्ध स्थानिक संसाधनाचे योग्य पद्धतीने नियोजन केल्यास तसेच या भागातील शेतकर्‍यांना विविध पीक पद्धती आणि शेती पूरक व्यवसायाची सांगड घातल्यास विकास होऊ शकतो. यासाठी शासनाने स्वतंत्र निधीची तरतूद करून कोरडवाहू शेती अभियान सुरू केले आहे.

या योजनेंतर्गत जिल्ह्यामधील १३ गावांचा समावेश आहे. यासाठी शासनाने यावर्षी ९७.७२ कोटी रूपयांची तरतूद केली आहे. कोरडवाहू शेती अभियान अंतर्गत मनुष्यबळ विकास, संरक्षित सिंचन सुविधा, यांत्रिकीकरण, कोरडवाहू पिकांच्या सुधारित वाणाची प्रात्यक्षिके, संरक्षित शेती, प्राथमिक कृषी प्रक्रिया व पणन इत्यादी घटकांचा वापर करून सन २0१४-१५ ते २0१८-१९ या कालावधीत २0,000 कोटींचा कार्यक्रम राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. तसेच या आर्थिक वर्षासाठी ९५.७२ कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहे. सन २0१४-१५ या वर्षात राज्यामधील ४0३ गावांत हे कोरडवाहू शेती अभियान राबविण्यात येत आहे.

सिंचनाच्या अत्यंत सीमित सुविधा, अवर्षणप्रवण क्षेत्राची, अवनत जमिनीची, हलक्या जमिनीची व्याप्ती ही पिकांच्या कमी उत्पादकतेचे प्रमुख कारण आहेत. त्यामुळे राज्यातील कोरडवाहू शेती ही अत्यंत जिकरीची व जोखमीची झालेली आहे. या शेतीचा कायमस्वरुपी विकास करून कृषी उत्पादनात सातत्य व स्थिरता आणणे हे राज्य शासनाचे धोरण आहे.

राज्यात पडणार्‍या पावसाचे विषम प्रमाण तसेच पिकांच्या वाढीच्या काळात दरवर्षी राज्यात कोठे ना कोठे पावसात प्रदीर्घ खंड पडून दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असल्याने राज्याच्या कृषी उत्पादनात सातत्य दिसून येत नाही. या कारणास्तव राज्य शासनाने कोरडवाहू शेतीच्या विकासाला प्राधान्य देण्याचे धोरण स्वीकारले आहे.

या अभियानांतर्गत मातीमधील अन्नांशाचे प्रमाण तपासून व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार खातांची मात्रा देण्यात येते. याकरिता पीक प्रात्यक्षिक संख्येच्या प्रमाणात मृद नमुने तपासणी करण्यासाठी शेतकर्‍यांना प्रोत्साहित करण्यात येते. जेणेकरुन शेतातील पिकांच्या उत्पन्नात वाढ व्हावी व जमिनीचे आरोग्य चांगले रहावे.