शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

कोरडवाहू अभियानांतर्गत शेती विकास

By admin | Updated: June 2, 2014 00:39 IST

एकूण पिकाखालील क्षेत्रापैकी ८0 टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे.

एकूण पिकाखालील क्षेत्रापैकी ८0 टक्के क्षेत्र कोरडवाहू आहे. या क्षेत्रामधील पिकाच्या उपलब्धतेमध्ये पावसाच्या चढ-उतारामुळे उत्पादकतेवर परिणाम होतो. कोरडवाहू क्षेत्रात पडणारा पाऊस आणि उपलब्ध स्थानिक संसाधनाचे योग्य पद्धतीने नियोजन केल्यास तसेच या भागातील शेतकर्‍यांना विविध पीक पद्धती आणि शेती पूरक व्यवसायाची सांगड घातल्यास विकास होऊ शकतो. यासाठी शासनाने स्वतंत्र निधीची तरतूद करून कोरडवाहू शेती अभियान सुरू केले आहे.

या योजनेंतर्गत जिल्ह्यामधील १३ गावांचा समावेश आहे. यासाठी शासनाने यावर्षी ९७.७२ कोटी रूपयांची तरतूद केली आहे. कोरडवाहू शेती अभियान अंतर्गत मनुष्यबळ विकास, संरक्षित सिंचन सुविधा, यांत्रिकीकरण, कोरडवाहू पिकांच्या सुधारित वाणाची प्रात्यक्षिके, संरक्षित शेती, प्राथमिक कृषी प्रक्रिया व पणन इत्यादी घटकांचा वापर करून सन २0१४-१५ ते २0१८-१९ या कालावधीत २0,000 कोटींचा कार्यक्रम राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. तसेच या आर्थिक वर्षासाठी ९५.७२ कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहे. सन २0१४-१५ या वर्षात राज्यामधील ४0३ गावांत हे कोरडवाहू शेती अभियान राबविण्यात येत आहे.

सिंचनाच्या अत्यंत सीमित सुविधा, अवर्षणप्रवण क्षेत्राची, अवनत जमिनीची, हलक्या जमिनीची व्याप्ती ही पिकांच्या कमी उत्पादकतेचे प्रमुख कारण आहेत. त्यामुळे राज्यातील कोरडवाहू शेती ही अत्यंत जिकरीची व जोखमीची झालेली आहे. या शेतीचा कायमस्वरुपी विकास करून कृषी उत्पादनात सातत्य व स्थिरता आणणे हे राज्य शासनाचे धोरण आहे.

राज्यात पडणार्‍या पावसाचे विषम प्रमाण तसेच पिकांच्या वाढीच्या काळात दरवर्षी राज्यात कोठे ना कोठे पावसात प्रदीर्घ खंड पडून दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असल्याने राज्याच्या कृषी उत्पादनात सातत्य दिसून येत नाही. या कारणास्तव राज्य शासनाने कोरडवाहू शेतीच्या विकासाला प्राधान्य देण्याचे धोरण स्वीकारले आहे.

या अभियानांतर्गत मातीमधील अन्नांशाचे प्रमाण तपासून व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार खातांची मात्रा देण्यात येते. याकरिता पीक प्रात्यक्षिक संख्येच्या प्रमाणात मृद नमुने तपासणी करण्यासाठी शेतकर्‍यांना प्रोत्साहित करण्यात येते. जेणेकरुन शेतातील पिकांच्या उत्पन्नात वाढ व्हावी व जमिनीचे आरोग्य चांगले रहावे.