शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
4
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
5
पाकिस्ताने भारतातील १५ ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली; एस-४०० 'सुदर्शन चक्र'ने हवेतच केली उद्ध्वस्त
6
Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
7
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा
8
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
9
Raigad Accident: रायगडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि एसटीच्या धडकेत चौघांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी
10
आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
11
"डॉक्टरांच्या चुकीमुळे गर्भपात झाला", प्रसिद्ध अभिनेत्रीची दुःखद कहाणी, म्हणाली- "तिसऱ्या महिन्यातच मला..."
12
Operation Sindoor: मोठी बातमी! कंदहार प्लेन हायजॅकचा मास्टरमाईंड रौफ असगरचा हल्ल्यात खात्मा
13
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सर्वपक्षीय एकत्र; बैठक संपताच काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले...
14
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानच्या दोन मित्रराष्ट्रांचे परराष्ट्र मंत्री भारत दौऱ्यावर, जयशंकर यांची भेट
15
Operation Sindoor : एअर स्ट्राइक दिवशी झाला जन्म, कुटुंबीयांनी मुलीचे नाव 'सिंदूर' ठेवले
16
तुम्हीही वारंवार पर्सनल लोन घेता? मग 'हे' ५ मोठे तोटे समजून घ्या; अनेकजण करतात दुर्लक्ष
17
Mumbai: पत्नीची हत्या करून मृतदेह बेडमध्ये लपवला, मुंबईतील गोरेगाव येथील धक्कादायक प्रकार
18
"मी रात्रभर त्यांच्या फोनची वाट पाहिली, पण..."; ढसाढसा रडली शहीद दिनेश कुमार यांची पत्नी
19
"तुमच्या हातात माईक दिलाय म्हणून तुम्ही काहीही बडबडू नका..."; रोहित शर्मा समालोचकांवर भडकला
20
'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच! किती आतंकवादी मारले? संरक्षण मंत्र्यांनी आकडाच सांगितला!

कृषी योजनांना आता ‘मिशन मोड’ची झळाळी

By admin | Updated: May 29, 2014 23:30 IST

शेतकर्‍यांसाठी केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणार्‍या कृषी विभागाच्या सर्वच योजनांमध्ये बदल होणार आहे. मिशम मोडच्या माध्यमातून योजनांमध्ये नवे तंत्रज्ञान जोडून त्या नव्या स्वरुपात

अमरावती : शेतकर्‍यांसाठी केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणार्‍या कृषी विभागाच्या सर्वच योजनांमध्ये बदल होणार आहे. मिशम मोडच्या माध्यमातून योजनांमध्ये नवे तंत्रज्ञान जोडून त्या नव्या स्वरुपात शेतकर्‍यांपर्यंत पोहचविण्यासाठी कृषी विभागात वरिष्ठ पातळीवर नवे धोरण ठरविण्यात येणार आहे. शेतीला शेतीपुरक व्यवसायाची जोड असावी, यासाठी शासनस्तरावर नेहमीच प्रयत्न केले जातात. याकरिता नव्या-नव्या संकल्पनाही कृषी विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येतात. याच पार्श्‍वभूमीवर सध्या राज्यभरात जिल्हा परिषद, कृषी विभाग आणि राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकर्‍यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. मात्र, याच योजनांमध्ये नवे तंत्रज्ञान जोडून बदल केले जाणार आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या जिल्हा परिषद, कृषी विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणार्‍या अनुसूचित जाती उपाययोजना, आदिवासी उपयोजना, कृषी यांत्रिकीकरण योजना आदी योजना जिल्हा परिषद कृषी विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येतात. मात्र याच जुन्या योजनांना नवी झळाळी देऊन आता या योजना नव्या स्वरुपात राबविण्यात येणार आहेत. शेतकर्‍यांसाठी राबविल्या जाणार्‍या योजनांना तंत्रज्ञानाची जोड मिळणार असल्याने या योजना अधिक पारदर्शकपणे राबविता येणे शक्य होणार आहे.