शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

इतवारा बाजार परिसरात अग्नितांडव

By admin | Updated: May 29, 2014 01:30 IST

गजबजलेला चौक म्हणून ओळख असलेल्या स्थानिक इतवारा बाजार परिसरातील फळ मार्केमध्ये बुधवारी पहाटे ४ वाजता अचानक आग लागली. या

अमरावती : गजबजलेला चौक म्हणून ओळख असलेल्या स्थानिक इतवारा बाजार परिसरातील फळ मार्केमध्ये बुधवारी पहाटे ४ वाजता अचानक आग लागली. या आगीत सुमारे ४८ फळ विक्रीच्या दुकानांची राखरांगोळी झाली आहे. यामध्ये व्यापार्‍यांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने या भीषण आगीत जिवीत हानी टळली.

इतवारा बाजारात परिसरातील मुर्गी गल्लीत फळ विक्रीचे होलसेल मार्केट आहे. तेथे हापुस आंबा, टरबुज, खरबुज, अननस, अंगुर इत्यादी फळांची होलसेल विक्री केली जाते. या मार्केटमधील फळ विक्रीच्या दुकानांना बुधवारी पहाटे ४ वाजता अचानक आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रुप धारण केल्याने ही आग सर्वत्र पसरुन तेथे मोठा अग्नितांडव सुरु झाला. परिसरात पहाटे फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांचे याकडे लक्ष जाताच त्यांनी घटनेची माहिती शहर कोतवाली पोलिसांना दिली. शहर कोतवालीचे पोलीस निरीक्षक विजय साळुंखे यांनी कर्मचार्‍यांसह घटनास्थळी धाव घेतली. तेथे अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी १८ बंबाच्या साहायाने तब्बल तीन तासाने आगीवर नियंत्रण मिळविले. तो पर्यंत सुमारे ४८ दुकानांची राखरांगोळी होऊन करोडो रुपयांचे नुकसान झाले.

हापूस आंबा जळून खाक

भीषण अग्नितांडवात फळ मार्केटमधील दुकानातील संपुर्ण साहित्य व फळे जळून खाक झाली. यामध्ये शेख शकील यांच्या दुकानातील सुमारे दोन लाख रुपये किमतीच्या हापुस आंब्यासह प्लास्टिकचे कॅरेट जळून खाक झाले. शेख शकीलचे आगीत सर्वाधिक नुकसान झाल्याची माहिती तेथील काही प्रत्यक्षदश्री व्यापार्‍यांनी दिली.

३0 हातगाड्यांची राखरांगोळी

इतवारा बाजार परिसरातील फळ मार्केटमध्ये लागलेल्या भीषण आगीत दुकानांसह तेथे ठेवलेल्या काही विक्रेत्यांच्या जवळपास तीस हातगाड्यांचीही राखरांगोळी झाल्याची माहिती तेथील नागरिकांनी दिली.

अग्निशमन दलाविरुध्द रोष

फळ मार्केटमध्ये भीषण आग लागल्याची माहिती व्यापार्‍यांना मिळताच व्यापार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी त्यांनी अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांना दुरध्वनीवर कळविले. परंतु वाहन चालक उपलब्ध नाही अशी कारणे देऊन कर्मचार्‍यांनी पुर्वी घटनास्थळी पोहचण्यास नकार दिला. अखेर काही संतप्त व्यापार्‍यांनी अग्निशमन दलाच्या कार्यालयावर धाव घेतल्याने अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली, असा आरोप करुन व्यापार्‍यांनी संताप व्यक्त केला.