शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

चारघड प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन तीव्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 00:10 IST

खोपडा येथील निम्न चारघड प्रकल्पामध्ये झालेल्या गैरप्रकाराची चौकशी, बुडीत क्षेत्राकरिता संपादित करण्यात आलेल्या घरांचे पुनसर्वेक्षण आणि वाढीव मोबदला या प्रमुख मागण्यांसाठी आरंभलेले बेमुदत उपोषण तीव्र करण्यात आले आहे. आंदोलकांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्देआत्मदहनाचा इशारा : आंदोलकांचा आकडा पाचशेवर

लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : खोपडा येथील निम्न चारघड प्रकल्पामध्ये झालेल्या गैरप्रकाराची चौकशी, बुडीत क्षेत्राकरिता संपादित करण्यात आलेल्या घरांचे पुनसर्वेक्षण आणि वाढीव मोबदला या प्रमुख मागण्यांसाठी आरंभलेले बेमुदत उपोषण तीव्र करण्यात आले आहे. आंदोलकांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी प्रशासनाच्यावतीने कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने मंगळवारी खोपडा येथील पंडित भोजने, दिलीप कोठाळे, प्रकाश कुरवाळे, विलास मेश्राम, गणेश नाखले, अरुण लुंगे व सुधाकर अमझरे या सात प्रकल्पग्रस्तांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला. आंदोलनात सहभागी महिलांनी टाळ-मृदंगावर भजन आंदोलन सुरू केले. वरूड पंचायत समितीचे सभापती विक्रम ठाकरे यांच्या नेतृत्वातील या आंदोलनात २६ फेब्रुवारी रोजी सुमारे ५०० महिला-पुरुष सहभागी झालेत. मोर्शी येथील उपविभागीय अधिकारी मनोहर कडू यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन ठाकरे यांच्याशी चर्चा केली.खोपडा येथील गावठाण निम्न चारघड प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्राकरिता संपादित करण्यात आलेल्या घरांची संयुक्त मोजणी भूसंपादन अधिकाऱ्यांनी केली असता, २०१४ मध्ये घरांची संख्या ४९८, तर २०१८ मध्ये ५१६ इतकी दाखविण्यात आली. सन २०१४ च्या संयुक्त मोजणी अहवालानुसार घराच्या बांधकामासहीत क्षेत्र हे वेगळे असून, २०१८ च्या नोटीसमध्ये जास्त दाखविण्यात येऊन मूल्यांकन वाढविण्यात आले. या सर्व प्रकाराला ग्रामसचिव, ग्रामपंचायत सदस्य जबाबदार असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांपुढे झालेला गैरप्रकार पुराव्यासहित सादर केला. मात्र, त्यावर कोणत्याही प्रकारची चौकशी करण्यात आली नाही. तरी खोपडा गावाचा निवाडा करताना झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात येऊन जुन्या संयुक्त मोजणी अहवालानुसार निवाडा पारित करण्यात यावा तसेच नवीन भूसंपादन कायद्यानुसार गुणांक २ लावून चारपट मोबदला देण्यात यावा, अन्यथा न्याय मिळेपर्यंत हे उपोषण सुरूच राहील, असा निर्धार प्रकल्पग्रस्तांचा आहे. खोपडा येथील मोठा जनसमुदाय उपोषणाला बसल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले.