शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

धामणगावात महिलांनीच उभारले कृषिसेवा केंद्र, अवजार बँक

By admin | Updated: May 25, 2016 00:42 IST

महिलांमध्ये पुरूषांपेक्षा अधिक काम करण्याची जिद्द, सचोटी व पारदर्शक व्यवहारासोबतच अथक परिश्रम घेण्याची शक्ती ...

माविमचा हातभार : भरारी लोकसंचालित केंद्राचा पुढाकारमोहन राऊत धामणगाव रेल्वे महिलांमध्ये पुरूषांपेक्षा अधिक काम करण्याची जिद्द, सचोटी व पारदर्शक व्यवहारासोबतच अथक परिश्रम घेण्याची शक्ती असल्यामुळे आता महिलांनी एक पाऊल पुढे टाकत जिल्ह्यात सर्वात प्रथम कृषिसेवा केंद्र व अवजार बँक धामणगावात उभारली आहे़ या क्रांतिकारी पावलासाठी भरारी लोकसंचालित साधन केंद्राने पुढाकार घेतला, तर माविमने हातभार लावला आहे़जिल्ह्यात सर्वाधिक महिला बचत गट धामणगाव तालुक्यात आहेत़ महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत या तालुक्यात भरारी लोकसंचालित साधन केंद्राची स्थापना सन २०१० मध्ये करण्यात आली. या केंद्राअंतर्गत २७५ महिला बचतगटांना प्रशिक्षण देणे आर्थिक व्यवहारात हातभार लावणे़ 'रेकॉर्ड अपडेट' ठेवण्यासाठी संगणकाचे धडे देणे, असा उपक्रम सुरू आहे़जिल्ह्यात पहिले कृषिसेवा केंद्र भरारी लोकसंचालित साधन केंद्राच्या अध्यक्षा प्रभा ढाणके, सचिव शालिनी ब्राम्हणकर यांनी व्यवस्थापिका स्वाती चव्हाण यांच्या पुढाकाराने तालुक्यातील महिला बचतगटाकडून सहा लाख रूपयांचा निधी कर्ज स्वरूपात उभारला. माविम अंतर्गत तेजस्विनी प्रकल्पाकडून अडीच लाखाचा निधी घेऊन जिल्ह्यात पहिले कृषिसेवा केंद्र उभारले आहे़या कृषिसेवा केंद्रात सर्वच प्रकारचे बियाणे, खते, गांडूळखत, दशपर्णी, उपलब्ध आहेत.धामणगाव तालुक्यात २७५ महिला बचत गटांतील साडेतीन हजार महिलांपैकी तीन हजार महिलांकडे शेती असून याच कृषिसेवा केंद्रातून खरीप हंगामात लागणारे बियाणे खरेदी करण्याचा मानस या महिलांनी व्यक्त केला आहे़अवजार बँकेत ट्रॅक्टर, डिझेलपंपभरारी लोक संचालित साधन केंद्राच्यावतीने उभारण्यात आलेल्या अवजार बँकेत टॅ्रक्टर, ट्रॉली, रोटावेटर, पंजी, व्ही-पास, पेरणी यंत्र, फवारणी यंत्र, डिझेलपंप, दशमेश, थे्रशर, सेफ्रेटर आदी अवजारे उपलब्ध असून आयडीएचने या अवजार बँकेला मदत केली आहे़एक जुटीचा विजययेथे सुरू झालेल्या कृषिसेवा केंद्र व अवजार बँक उभारण्यासाठी महिला बचतगट व सहयोगिनींचे अथक परिश्रम आहेत़ आज माविमचे जिल्हा समन्वयक खुशाल राठोड, गटविकास अधिकारी कपिलनाथ कलोडे, रविकांत घाटोड, प्रभा ढाणके, शालिनी ब्राम्हणकर, सुरेखा सावळे, मीनाक्षी शेंडे, प्रतिक भेंडे, व्यवस्थापिका स्वाती चव्हाण,सुरेश चवरे, अर्चना गोमासे, रेखा गावंडे, वंदना गोंदाळे, वनमाला मेश्राम यांचे सहकार्य लाभले. बचतगटाच्या एकजुटीचा हा विजय मानला जात आहे़