शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

शेतकºयांवर पुन्हा कुठाराघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 23:51 IST

जिल्ह्यातील लाखो शेतकºयांकडे कृषिपंपाची ७०० कोटी रुपयांची वीज देयके थकीत असल्याने या महिन्यात वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांनी आतापर्यंत १२५० शेतकºयांचे कृषिपंपावरील वीज जोडणी कापल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्दे१२५० कृषिपंपाची वीज कापलीशेतकºयांचा किती पाहणार अंत : रबी हंगाम धोक्यात

संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील लाखो शेतकºयांकडे कृषिपंपाची ७०० कोटी रुपयांची वीज देयके थकीत असल्याने या महिन्यात वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांनी आतापर्यंत १२५० शेतकºयांचे कृषिपंपावरील वीज जोडणी कापल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रबी हंगामाच्या तोंडावरच हा प्रकार घडल्याने शेतकरीवर्ग पुन्हा चिंताग्रस्त झाला आहे.जिल्ह्यात १ लाख २७ हजार ९७६ शेतकरी कृषीपंप वीज जोडणीचे ग्राहक आहेत. या सर्व शेतकºयांकडे गेल्या सहा वर्षांपासून ७०० कोटी रूपयांची थकबाकी असून आतपर्यंत फक्त दोन हजार शेतकºयांनी दिड कोटी रूपये भरल्याची माहिती आहे. चालु वर्षातील मार्च व जुन अशा दोन महिन्याची थकबाकी तातडीने शेतकºयांनी भरावी अशी विज वितरण कंपनीने कृषीपंप ग्राहक शेतकºयांना यापूर्वी कळविले होते. सद्यस्थितीत शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटामुळे मेटाकुटीस आला आहे. त्यामुळे संसाराचा गाडा हाकणेच कठीण झाल्याने ते कृषिपंपाचे देयक भरू शकला नाही. अशातच वीज जोडणी कापल्याने रबी हंगामात पिकांच्या ओलित कसे करावे, असा यक्षप्रश्न त्याच्यासमोर उभा ठाकला आहे. ज्या शेतकºयांकडे कृषिपंपांची वीज देयके थकीत आहेत त्यांची वीज जोडणी कापा, असे आदेश वरिष्ठ पातळीवरून आल्याची माहिती आहे. निदान चालु वर्षातील दोन महिन्याची थकबाकी तातडीने भरणे गरजेचे असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.या वर्षात पावसाने दडी मारल्यामुळे मुगाचे नुकसान झाले, तर सोयाबीनलाही योग्य भाव नसल्यामुळे कवडीमोल भावात सोयाबीन विकावे लागत आहे. त्यामुळे शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले असून अनेक शेतकरी हवालदिल झाल्याच्या भावना अनेक तालुक्यातील शेतकरी बांधवांनी व्यक्त केल्या आहेत. कर्जमाफी प्रमाणेच कृषिपंपाची थकबाकीही माफ होईल, अशी अपेक्षा शेतकºयांना आहे.या वर्षी नवीन कृषी वीज जोडणीकरिता सात हजार शेतकºयांनी अर्ज केले असताना वीज जोडणीच्या कामांसाठी निधीच नसल्याचे कारण सांगत एकाही शेतकºयांना कृषीपंपासाठी विज जोडणी देण्यात आली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नवीन वीज जोडणीसाठी ११५ कोटी रूपयांचा प्रस्ताव वीज वितरण कंपनीने शासनाकडे पाठविला आहे. पण या निधीला अद्यापही निधी मिळाला नाही. मागील तीन वर्षांत २३३ कोटींच्या या कामांसाठी निधीला मंजुरी मिळाली होती. आतापर्यंत १५९ कोटींचा निधी मिळाला असून तो या कामांवर खर्चसुध्दा झाला आहे. नवीन वीज जोडणीसाठी निधीच नसेल तर कामे होतील कसे, ही तर शेतकºयांची फसवणुक असल्याचे शेतकºयांची ओरड असून वीज जोडण्यासाठी शासनाने निधी द्यावा अशी मागणी होत आहे.तीन वर्षांत १८ हजार कृषिपंपाच्या वीज जोडण्याशेतकºयांसाठी मंजूर झालेल्या विशेष पॅकजमधून गेल्या तीन वर्षांत १८ हजार २७८ कृषिपंपांच्या वीज जोडण्यांची झाल्याची माहिती आहे. यामध्ये २०१५-१६ करिता १० हजार ७०१, २०१६-१६ मध्ये ७ हजार ०७७, व २०१७-१८ मध्ये मार्चपूर्वी ११०० शेतकºयांना वीज जोडण्या देण्यात आल्या. पण मार्च नंतर या आर्थिक वर्षात या कामांवर निधी नसल्यामुळे कंत्राटदारांनी कामे बंद केली. त्यामुळे ७ हजार शेतकºयांचे नवीन अर्ज प्राप्त असतानाही कामे रखडली आहेत.सहा हजार एकरांतील पीक होणार बाधित१२५० शेतकºयांची वीज खंडित केल्यास सुमारे सहा हजार एकरंतील रबी पीक बाधित होणार असल्याचे मत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चाण यांनी व्यक्त केले. कृषीतज्ज्ञ विश्वासराव देशमुख यांच्या मतेही पाण्याअभावी नुकसान होणारे शेतीक्षेत्र साडेसहा हजार एकर असेल.खरिपातील सोयाबीन किडीमुळे हाती लागले नाही. रबी हंगामात जी पिके घेतली जातात त्यांना सिंचन अत्यावश्यक आहे. अन्यथा शेतकºयांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढेल. अशा स्थितीत वीज कापणी कदापिही योग्य नाही.- विश्वासराव देशमुख, प्रगतिशील शेतकरीकृषिपंप ग्राहकांकडे कोट्यवधी रूपयांची थकबाकी असल्याने वीज वितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयातील वरिष्ठांच्या आदेशानेच वीज जोडण्या कापण्याची मोहीम राबविण्यात आली आहे.- सुहास रंगारी, मुख्य अभियंता वीज वितरण