शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांवर पुन्हा कुठाराघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 23:51 IST

जिल्ह्यातील लाखो शेतकºयांकडे कृषिपंपाची ७०० कोटी रुपयांची वीज देयके थकीत असल्याने या महिन्यात वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांनी आतापर्यंत १२५० शेतकºयांचे कृषिपंपावरील वीज जोडणी कापल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्दे१२५० कृषिपंपाची वीज कापलीशेतकºयांचा किती पाहणार अंत : रबी हंगाम धोक्यात

संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील लाखो शेतकºयांकडे कृषिपंपाची ७०० कोटी रुपयांची वीज देयके थकीत असल्याने या महिन्यात वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांनी आतापर्यंत १२५० शेतकºयांचे कृषिपंपावरील वीज जोडणी कापल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रबी हंगामाच्या तोंडावरच हा प्रकार घडल्याने शेतकरीवर्ग पुन्हा चिंताग्रस्त झाला आहे.जिल्ह्यात १ लाख २७ हजार ९७६ शेतकरी कृषीपंप वीज जोडणीचे ग्राहक आहेत. या सर्व शेतकºयांकडे गेल्या सहा वर्षांपासून ७०० कोटी रूपयांची थकबाकी असून आतपर्यंत फक्त दोन हजार शेतकºयांनी दिड कोटी रूपये भरल्याची माहिती आहे. चालु वर्षातील मार्च व जुन अशा दोन महिन्याची थकबाकी तातडीने शेतकºयांनी भरावी अशी विज वितरण कंपनीने कृषीपंप ग्राहक शेतकºयांना यापूर्वी कळविले होते. सद्यस्थितीत शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटामुळे मेटाकुटीस आला आहे. त्यामुळे संसाराचा गाडा हाकणेच कठीण झाल्याने ते कृषिपंपाचे देयक भरू शकला नाही. अशातच वीज जोडणी कापल्याने रबी हंगामात पिकांच्या ओलित कसे करावे, असा यक्षप्रश्न त्याच्यासमोर उभा ठाकला आहे. ज्या शेतकºयांकडे कृषिपंपांची वीज देयके थकीत आहेत त्यांची वीज जोडणी कापा, असे आदेश वरिष्ठ पातळीवरून आल्याची माहिती आहे. निदान चालु वर्षातील दोन महिन्याची थकबाकी तातडीने भरणे गरजेचे असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.या वर्षात पावसाने दडी मारल्यामुळे मुगाचे नुकसान झाले, तर सोयाबीनलाही योग्य भाव नसल्यामुळे कवडीमोल भावात सोयाबीन विकावे लागत आहे. त्यामुळे शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले असून अनेक शेतकरी हवालदिल झाल्याच्या भावना अनेक तालुक्यातील शेतकरी बांधवांनी व्यक्त केल्या आहेत. कर्जमाफी प्रमाणेच कृषिपंपाची थकबाकीही माफ होईल, अशी अपेक्षा शेतकºयांना आहे.या वर्षी नवीन कृषी वीज जोडणीकरिता सात हजार शेतकºयांनी अर्ज केले असताना वीज जोडणीच्या कामांसाठी निधीच नसल्याचे कारण सांगत एकाही शेतकºयांना कृषीपंपासाठी विज जोडणी देण्यात आली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नवीन वीज जोडणीसाठी ११५ कोटी रूपयांचा प्रस्ताव वीज वितरण कंपनीने शासनाकडे पाठविला आहे. पण या निधीला अद्यापही निधी मिळाला नाही. मागील तीन वर्षांत २३३ कोटींच्या या कामांसाठी निधीला मंजुरी मिळाली होती. आतापर्यंत १५९ कोटींचा निधी मिळाला असून तो या कामांवर खर्चसुध्दा झाला आहे. नवीन वीज जोडणीसाठी निधीच नसेल तर कामे होतील कसे, ही तर शेतकºयांची फसवणुक असल्याचे शेतकºयांची ओरड असून वीज जोडण्यासाठी शासनाने निधी द्यावा अशी मागणी होत आहे.तीन वर्षांत १८ हजार कृषिपंपाच्या वीज जोडण्याशेतकºयांसाठी मंजूर झालेल्या विशेष पॅकजमधून गेल्या तीन वर्षांत १८ हजार २७८ कृषिपंपांच्या वीज जोडण्यांची झाल्याची माहिती आहे. यामध्ये २०१५-१६ करिता १० हजार ७०१, २०१६-१६ मध्ये ७ हजार ०७७, व २०१७-१८ मध्ये मार्चपूर्वी ११०० शेतकºयांना वीज जोडण्या देण्यात आल्या. पण मार्च नंतर या आर्थिक वर्षात या कामांवर निधी नसल्यामुळे कंत्राटदारांनी कामे बंद केली. त्यामुळे ७ हजार शेतकºयांचे नवीन अर्ज प्राप्त असतानाही कामे रखडली आहेत.सहा हजार एकरांतील पीक होणार बाधित१२५० शेतकºयांची वीज खंडित केल्यास सुमारे सहा हजार एकरंतील रबी पीक बाधित होणार असल्याचे मत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चाण यांनी व्यक्त केले. कृषीतज्ज्ञ विश्वासराव देशमुख यांच्या मतेही पाण्याअभावी नुकसान होणारे शेतीक्षेत्र साडेसहा हजार एकर असेल.खरिपातील सोयाबीन किडीमुळे हाती लागले नाही. रबी हंगामात जी पिके घेतली जातात त्यांना सिंचन अत्यावश्यक आहे. अन्यथा शेतकºयांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढेल. अशा स्थितीत वीज कापणी कदापिही योग्य नाही.- विश्वासराव देशमुख, प्रगतिशील शेतकरीकृषिपंप ग्राहकांकडे कोट्यवधी रूपयांची थकबाकी असल्याने वीज वितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयातील वरिष्ठांच्या आदेशानेच वीज जोडण्या कापण्याची मोहीम राबविण्यात आली आहे.- सुहास रंगारी, मुख्य अभियंता वीज वितरण