शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
6
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
7
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
8
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
10
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
11
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
12
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
13
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
14
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
15
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
16
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
17
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
18
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
19
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
20
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...

शेतकºयांवर पुन्हा कुठाराघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 23:51 IST

जिल्ह्यातील लाखो शेतकºयांकडे कृषिपंपाची ७०० कोटी रुपयांची वीज देयके थकीत असल्याने या महिन्यात वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांनी आतापर्यंत १२५० शेतकºयांचे कृषिपंपावरील वीज जोडणी कापल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्दे१२५० कृषिपंपाची वीज कापलीशेतकºयांचा किती पाहणार अंत : रबी हंगाम धोक्यात

संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील लाखो शेतकºयांकडे कृषिपंपाची ७०० कोटी रुपयांची वीज देयके थकीत असल्याने या महिन्यात वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांनी आतापर्यंत १२५० शेतकºयांचे कृषिपंपावरील वीज जोडणी कापल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रबी हंगामाच्या तोंडावरच हा प्रकार घडल्याने शेतकरीवर्ग पुन्हा चिंताग्रस्त झाला आहे.जिल्ह्यात १ लाख २७ हजार ९७६ शेतकरी कृषीपंप वीज जोडणीचे ग्राहक आहेत. या सर्व शेतकºयांकडे गेल्या सहा वर्षांपासून ७०० कोटी रूपयांची थकबाकी असून आतपर्यंत फक्त दोन हजार शेतकºयांनी दिड कोटी रूपये भरल्याची माहिती आहे. चालु वर्षातील मार्च व जुन अशा दोन महिन्याची थकबाकी तातडीने शेतकºयांनी भरावी अशी विज वितरण कंपनीने कृषीपंप ग्राहक शेतकºयांना यापूर्वी कळविले होते. सद्यस्थितीत शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटामुळे मेटाकुटीस आला आहे. त्यामुळे संसाराचा गाडा हाकणेच कठीण झाल्याने ते कृषिपंपाचे देयक भरू शकला नाही. अशातच वीज जोडणी कापल्याने रबी हंगामात पिकांच्या ओलित कसे करावे, असा यक्षप्रश्न त्याच्यासमोर उभा ठाकला आहे. ज्या शेतकºयांकडे कृषिपंपांची वीज देयके थकीत आहेत त्यांची वीज जोडणी कापा, असे आदेश वरिष्ठ पातळीवरून आल्याची माहिती आहे. निदान चालु वर्षातील दोन महिन्याची थकबाकी तातडीने भरणे गरजेचे असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.या वर्षात पावसाने दडी मारल्यामुळे मुगाचे नुकसान झाले, तर सोयाबीनलाही योग्य भाव नसल्यामुळे कवडीमोल भावात सोयाबीन विकावे लागत आहे. त्यामुळे शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले असून अनेक शेतकरी हवालदिल झाल्याच्या भावना अनेक तालुक्यातील शेतकरी बांधवांनी व्यक्त केल्या आहेत. कर्जमाफी प्रमाणेच कृषिपंपाची थकबाकीही माफ होईल, अशी अपेक्षा शेतकºयांना आहे.या वर्षी नवीन कृषी वीज जोडणीकरिता सात हजार शेतकºयांनी अर्ज केले असताना वीज जोडणीच्या कामांसाठी निधीच नसल्याचे कारण सांगत एकाही शेतकºयांना कृषीपंपासाठी विज जोडणी देण्यात आली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नवीन वीज जोडणीसाठी ११५ कोटी रूपयांचा प्रस्ताव वीज वितरण कंपनीने शासनाकडे पाठविला आहे. पण या निधीला अद्यापही निधी मिळाला नाही. मागील तीन वर्षांत २३३ कोटींच्या या कामांसाठी निधीला मंजुरी मिळाली होती. आतापर्यंत १५९ कोटींचा निधी मिळाला असून तो या कामांवर खर्चसुध्दा झाला आहे. नवीन वीज जोडणीसाठी निधीच नसेल तर कामे होतील कसे, ही तर शेतकºयांची फसवणुक असल्याचे शेतकºयांची ओरड असून वीज जोडण्यासाठी शासनाने निधी द्यावा अशी मागणी होत आहे.तीन वर्षांत १८ हजार कृषिपंपाच्या वीज जोडण्याशेतकºयांसाठी मंजूर झालेल्या विशेष पॅकजमधून गेल्या तीन वर्षांत १८ हजार २७८ कृषिपंपांच्या वीज जोडण्यांची झाल्याची माहिती आहे. यामध्ये २०१५-१६ करिता १० हजार ७०१, २०१६-१६ मध्ये ७ हजार ०७७, व २०१७-१८ मध्ये मार्चपूर्वी ११०० शेतकºयांना वीज जोडण्या देण्यात आल्या. पण मार्च नंतर या आर्थिक वर्षात या कामांवर निधी नसल्यामुळे कंत्राटदारांनी कामे बंद केली. त्यामुळे ७ हजार शेतकºयांचे नवीन अर्ज प्राप्त असतानाही कामे रखडली आहेत.सहा हजार एकरांतील पीक होणार बाधित१२५० शेतकºयांची वीज खंडित केल्यास सुमारे सहा हजार एकरंतील रबी पीक बाधित होणार असल्याचे मत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चाण यांनी व्यक्त केले. कृषीतज्ज्ञ विश्वासराव देशमुख यांच्या मतेही पाण्याअभावी नुकसान होणारे शेतीक्षेत्र साडेसहा हजार एकर असेल.खरिपातील सोयाबीन किडीमुळे हाती लागले नाही. रबी हंगामात जी पिके घेतली जातात त्यांना सिंचन अत्यावश्यक आहे. अन्यथा शेतकºयांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढेल. अशा स्थितीत वीज कापणी कदापिही योग्य नाही.- विश्वासराव देशमुख, प्रगतिशील शेतकरीकृषिपंप ग्राहकांकडे कोट्यवधी रूपयांची थकबाकी असल्याने वीज वितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयातील वरिष्ठांच्या आदेशानेच वीज जोडण्या कापण्याची मोहीम राबविण्यात आली आहे.- सुहास रंगारी, मुख्य अभियंता वीज वितरण