शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
2
"ते मराठीत न बोलल्याने भाषेला भोकं पडणार का?’’, अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान
3
IND vs ENG 4th Test Day 2 Stumps: मॅच आधी गिलनं ज्यांना डिवचलं त्या दोघांनीच दमवलं; शेवटी...
4
हे सारं मी त्यांच्या सांगण्यावरून केलं, बनावट दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनचा धक्कादायक दावा   
5
Asia Cup 2025 : बीसीसीआय UAE च्या मैदानात स्पर्धा घेणार; भारत-पाक हायहोल्टेज मॅचही पाहायला मिळणार?
6
Anshul Kamboj vs Ben Duckett: अंशुल कंबोजची पहिली टेस्ट विकेट! बेन डकेट 'नर्व्हस नाइंटी'चा शिकार
7
"देशासाठी लढणारा मराठी माणूस कधी..., काहींना शिवरायांच्या नावाची ॲलर्जी"; मुख्यमंत्री फडणवीस यांचं जोरदार भाषण
8
Hulk Hogan Death: 'बालपणीचा सुपरहिरो' प्रसिद्ध WWE स्टार हल्क होगनचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
9
मग मृतांना निवडणुकीत मतदान करायला द्यायचं का? राहुल-तेजस्वींना निवडणूक आयोगाचा सवाल
10
VIDEO: ती आली अन् थेट त्याला बिलगली... चहल-महावशची एकमेकांना घट्ट मिठी, क्लिप व्हायरल
11
चक्क दारूच्या ट्रकवर राज्यामंत्र्याचे नाव, ४० लाखांची विदेशी दारू, सात आराेपींना घेतले ताब्यात
12
'या लोकांचे प्रफुल्ल लोढासोबत काय संबंध आहेत?', गिरीश महाजनांच्या संयमाचा कडेलोट, 'मविआ'ला थेट फोटोच दाखवले
13
दिल्लीतील JNU मधील देवेंद्र फणडवीसांच्या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांचं आंदोलन, महायुती सरकारविरोधात घोषणाबाजी
14
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी गुप्तचर संस्थेत नोकरी; मुंबई, नागपूरसाठी 'इतक्या' जागा राखीव!
15
Rishabh Pant Fifty : भारताच्या 'जखमी वाघा'ची डरकाळी! लढवय्या पंतनं ठोकली सॉलिड फिफ्टी
16
₹1600 वर पोहोचू शकतो इलेक्ट्रिक बस बनवणाऱ्या कंपनीचा शेअर, खरेदीसाठी उडालीय लोकांची झुंबड; करतोय मालामाल!
17
स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी राहुल गांधी यांना नाशिकच्या कोर्टात जामीन
18
वाघाच्या काळजाचा! जखमी असूनही इंग्लंडशी भिडला, मँचेस्टरमध्ये पंतची विक्रमी खेळी
19
धनंजय मुंडेंना हायकोर्टाचा दिलासा! कृषी विभागाची 'ती' खरेदी नियमानुसारच झाल्याचा निर्णय
20
मक्का मशीद आणि अजमेर ब्लास्ट प्रकरणात का केले नाही अपील? सरकारवर एवढे का भडकले ओवेसी?

शेतकºयांवर पुन्हा कुठाराघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 23:51 IST

जिल्ह्यातील लाखो शेतकºयांकडे कृषिपंपाची ७०० कोटी रुपयांची वीज देयके थकीत असल्याने या महिन्यात वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांनी आतापर्यंत १२५० शेतकºयांचे कृषिपंपावरील वीज जोडणी कापल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ठळक मुद्दे१२५० कृषिपंपाची वीज कापलीशेतकºयांचा किती पाहणार अंत : रबी हंगाम धोक्यात

संदीप मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील लाखो शेतकºयांकडे कृषिपंपाची ७०० कोटी रुपयांची वीज देयके थकीत असल्याने या महिन्यात वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांनी आतापर्यंत १२५० शेतकºयांचे कृषिपंपावरील वीज जोडणी कापल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रबी हंगामाच्या तोंडावरच हा प्रकार घडल्याने शेतकरीवर्ग पुन्हा चिंताग्रस्त झाला आहे.जिल्ह्यात १ लाख २७ हजार ९७६ शेतकरी कृषीपंप वीज जोडणीचे ग्राहक आहेत. या सर्व शेतकºयांकडे गेल्या सहा वर्षांपासून ७०० कोटी रूपयांची थकबाकी असून आतपर्यंत फक्त दोन हजार शेतकºयांनी दिड कोटी रूपये भरल्याची माहिती आहे. चालु वर्षातील मार्च व जुन अशा दोन महिन्याची थकबाकी तातडीने शेतकºयांनी भरावी अशी विज वितरण कंपनीने कृषीपंप ग्राहक शेतकºयांना यापूर्वी कळविले होते. सद्यस्थितीत शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटामुळे मेटाकुटीस आला आहे. त्यामुळे संसाराचा गाडा हाकणेच कठीण झाल्याने ते कृषिपंपाचे देयक भरू शकला नाही. अशातच वीज जोडणी कापल्याने रबी हंगामात पिकांच्या ओलित कसे करावे, असा यक्षप्रश्न त्याच्यासमोर उभा ठाकला आहे. ज्या शेतकºयांकडे कृषिपंपांची वीज देयके थकीत आहेत त्यांची वीज जोडणी कापा, असे आदेश वरिष्ठ पातळीवरून आल्याची माहिती आहे. निदान चालु वर्षातील दोन महिन्याची थकबाकी तातडीने भरणे गरजेचे असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.या वर्षात पावसाने दडी मारल्यामुळे मुगाचे नुकसान झाले, तर सोयाबीनलाही योग्य भाव नसल्यामुळे कवडीमोल भावात सोयाबीन विकावे लागत आहे. त्यामुळे शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले असून अनेक शेतकरी हवालदिल झाल्याच्या भावना अनेक तालुक्यातील शेतकरी बांधवांनी व्यक्त केल्या आहेत. कर्जमाफी प्रमाणेच कृषिपंपाची थकबाकीही माफ होईल, अशी अपेक्षा शेतकºयांना आहे.या वर्षी नवीन कृषी वीज जोडणीकरिता सात हजार शेतकºयांनी अर्ज केले असताना वीज जोडणीच्या कामांसाठी निधीच नसल्याचे कारण सांगत एकाही शेतकºयांना कृषीपंपासाठी विज जोडणी देण्यात आली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नवीन वीज जोडणीसाठी ११५ कोटी रूपयांचा प्रस्ताव वीज वितरण कंपनीने शासनाकडे पाठविला आहे. पण या निधीला अद्यापही निधी मिळाला नाही. मागील तीन वर्षांत २३३ कोटींच्या या कामांसाठी निधीला मंजुरी मिळाली होती. आतापर्यंत १५९ कोटींचा निधी मिळाला असून तो या कामांवर खर्चसुध्दा झाला आहे. नवीन वीज जोडणीसाठी निधीच नसेल तर कामे होतील कसे, ही तर शेतकºयांची फसवणुक असल्याचे शेतकºयांची ओरड असून वीज जोडण्यासाठी शासनाने निधी द्यावा अशी मागणी होत आहे.तीन वर्षांत १८ हजार कृषिपंपाच्या वीज जोडण्याशेतकºयांसाठी मंजूर झालेल्या विशेष पॅकजमधून गेल्या तीन वर्षांत १८ हजार २७८ कृषिपंपांच्या वीज जोडण्यांची झाल्याची माहिती आहे. यामध्ये २०१५-१६ करिता १० हजार ७०१, २०१६-१६ मध्ये ७ हजार ०७७, व २०१७-१८ मध्ये मार्चपूर्वी ११०० शेतकºयांना वीज जोडण्या देण्यात आल्या. पण मार्च नंतर या आर्थिक वर्षात या कामांवर निधी नसल्यामुळे कंत्राटदारांनी कामे बंद केली. त्यामुळे ७ हजार शेतकºयांचे नवीन अर्ज प्राप्त असतानाही कामे रखडली आहेत.सहा हजार एकरांतील पीक होणार बाधित१२५० शेतकºयांची वीज खंडित केल्यास सुमारे सहा हजार एकरंतील रबी पीक बाधित होणार असल्याचे मत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चाण यांनी व्यक्त केले. कृषीतज्ज्ञ विश्वासराव देशमुख यांच्या मतेही पाण्याअभावी नुकसान होणारे शेतीक्षेत्र साडेसहा हजार एकर असेल.खरिपातील सोयाबीन किडीमुळे हाती लागले नाही. रबी हंगामात जी पिके घेतली जातात त्यांना सिंचन अत्यावश्यक आहे. अन्यथा शेतकºयांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढेल. अशा स्थितीत वीज कापणी कदापिही योग्य नाही.- विश्वासराव देशमुख, प्रगतिशील शेतकरीकृषिपंप ग्राहकांकडे कोट्यवधी रूपयांची थकबाकी असल्याने वीज वितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयातील वरिष्ठांच्या आदेशानेच वीज जोडण्या कापण्याची मोहीम राबविण्यात आली आहे.- सुहास रंगारी, मुख्य अभियंता वीज वितरण