शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

पेरण्या झाल्या, वीजपुरवठा अखंडित ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:14 IST

अमरावती : जिल्ह्यात वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येत आहेत. कोविडकाळात आधीच विविध क्षेत्रांचे नुकसान झाले. आता ...

अमरावती : जिल्ह्यात वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येत आहेत. कोविडकाळात आधीच विविध क्षेत्रांचे नुकसान झाले. आता खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. अशा काळात वीजपुरवठा खंडित करून शेतकरी बांधव, नागरिकांची गैरसोय होता कामा नये. जिल्ह्यात सर्व ठिकाणी वीजपुरवठा अखंडित ठेवण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शुक्रवारी दिले.

महावितरणकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी आमदार बळवंत वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हाधिकारी पवनीत कौर, अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे व महावितरणचे विविध अधिकारी उपस्थित होते.

बिल न भरल्याचे, तसेच इतरही अनेक कारणे दाखवून वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या सतत तक्रारी येत आहेत. वास्तविकत: कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांचे नुकसान झाले. त्यामुळे याबाबत संयमाने व संवेदनशीलपणे परिस्थिती हाताळण्याची गरज आहे. नागरिकांची परिस्थिती जाणून टप्प्याटप्प्याने रक्कम वसूल करता येणे शक्य आहे. त्याबाबत शासनाच्याही सूचना आहेत. दुरुस्ती किंवा अन्य कारणासाठी वीजपुरवठ्यात काही काळ कपात होत असेल तर त्याचे वेळापत्रक जाहीर केले पाहिजे. याची कल्पना नागरिकांना दिल्यास त्यांची गैरसोय टळेल, असे पालकमंत्री म्हणाल्या. महावितरणला उच्चदाब वितरण प्रणाली योजनेंतर्गत ५० कोटी व जिल्हा नियोजनांतर्गत १५ कोटी रुपये निधी मिळाला आहे. याअंतर्गत सावळापूर, बेलोरा उपकेंद्र कार्यान्वित करण्यात आले असून, आष्टीचे कामकाज प्रगतिपथावर आहे. चांदूर रेल्वे तालुक्यात ३३/११ केव्ही राजुरा उपकेंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. उर्वरित कामांनाही गती देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.