शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

पेरण्या झाल्या, वीजपुरवठा अखंडित ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:12 IST

अमरावती : जिल्ह्यात वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येत आहेत. कोविडकाळात आधीच विविध क्षेत्रांचे नुकसान झाले. आता ...

अमरावती : जिल्ह्यात वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येत आहेत. कोविडकाळात आधीच विविध क्षेत्रांचे नुकसान झाले. आता खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. अशा काळात वीजपुरवठा खंडित करून शेतकरी बांधव, नागरिकांची गैरसोय होता कामा नये. जिल्ह्यात सर्व ठिकाणी वीजपुरवठा अखंडित ठेवण्याचे निर्देश महिला व बालविकासमंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शुक्रवारी दिले.

महावितरणकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी आमदार बळवंत वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हाधिकारी पवनीत कौर, अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे व महावितरणचे विविध अधिकारी उपस्थित होते.

बिल न भरल्याचे, तसेच इतरही अनेक कारणे दाखवून वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या सतत तक्रारी येत आहेत. वास्तविकत: कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांचे नुकसान झाले. त्यामुळे याबाबत संयमाने व संवेदनशीलपणे परिस्थिती हाताळण्याची गरज आहे. नागरिकांची परिस्थिती जाणून टप्प्याटप्प्याने रक्कम वसूल करता येणे शक्य आहे. त्याबाबत शासनाच्याही सूचना आहेत. दुरुस्ती किंवा अन्य कारणासाठी वीजपुरवठ्यात काही काळ कपात होत असेल तर त्याचे वेळापत्रक जाहीर केले पाहिजे. याची कल्पना नागरिकांना दिल्यास त्यांची गैरसोय टळेल, असे पालकमंत्री म्हणाल्या. महावितरणला उच्चदाब वितरण प्रणाली योजनेंतर्गत ५० कोटी व जिल्हा नियोजनांतर्गत १५ कोटी रुपये निधी मिळाला आहे. याअंतर्गत सावळापूर, बेलोरा उपकेंद्र कार्यान्वित करण्यात आले असून, आष्टीचे कामकाज प्रगतिपथावर आहे. चांदूर रेल्वे तालुक्यात ३३/११ केव्ही राजुरा उपकेंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. उर्वरित कामांनाही गती देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.