शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

जिल्हा परिषद नोकर भरतीत तोंडी परीक्षा बाद

By admin | Updated: September 4, 2014 23:28 IST

जिल्हा परिषदेतील गट ‘ब’ आणि गट ‘क’ मधील अराजपत्रीत पद भरती करताना उमेदवारांची मौखीक परीक्षा न घेता लेखी परीक्षेतील त्यांच्या गुणवत्तेनुसार निवड सुची तयार करून पद भरतीची प्रक्रिया

शासन निर्णय : गैरप्रकाराला आळा बसणारअमरावती : जिल्हा परिषदेतील गट ‘ब’ आणि गट ‘क’ मधील अराजपत्रीत पद भरती करताना उमेदवारांची मौखीक परीक्षा न घेता लेखी परीक्षेतील त्यांच्या गुणवत्तेनुसार निवड सुची तयार करून पद भरतीची प्रक्रिया करण्याबाबतचा निर्णय राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे खऱ्या अर्थाने तयारी करून वरील पदाकरिता परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना याचा फायदा होणार आहे. याशिवाय नोकर भरतीत होणाऱ्या गैरप्रकारांनाही आळा बसणार आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने १९ आॅक्टोबर २००७ रोजी भुतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट ‘क’ मधील लिपीकवर्गीय पदांकरीता मौखीक परीक्षा न घेता लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार निवड सुची तयार करून पदभरती करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. याशिवाय २६ डिसेंबर २०११ ला सुद्धा शासनाने गट ‘क’ वर्गातील पदभरतीसाठी वरीलप्रमाणे निकष वापरण्याच्या सूचना पुन्हा देण्यात आल्या होत्या. याच शासन निर्णयात शासनाने दुरूस्ती करीत ५ जून २०१४ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयात गट ‘क’ आणि गट ‘ब’ अराजपत्रीत मधील कुठल्याही पदाकरिता उमेदवारांची निवड करताना मौखीक परीक्षा मुलाखती घेऊ नये असे स्पष्टेपणे नमूद केले आहे. त्याऐवजी या पदांकरिता उमेदवार निवडताना त्यांची २०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात यावी त्या परीक्षेत प्राप्त गुणाच्या आधारे निवड सुची तयार करून त्यांची गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात यावी. ज्या पदांसाठी लेखी परीक्षा व व्यावसायिक चाचणी घेणे आवश्यक असेल अशा पदांसाठी १२० गुणांची लेखी परीक्षा आणि ८० गुणांची व्यावसायिक चाचणी अशी गुण विभागणी करावी. सुतार, गवंडी, वाहन चालक अशा शालांत परीक्षा उत्तीर्ण पेक्षा कमी अर्हता आवश्यक असणाऱ्या पदांसाठी ६० गुणांची व्यावसायिक, चाचणी आणि ४० गुणाची शारीरिक चाचणी घेऊन त्यांची निवड करावी. ज्या पदासाठी शारीरिक क्षमता चाचणीची गरज नाही अशा पदांसाठी शंभर गुणाची व्यावसायिक चाचणी घेऊन उमेदवारांची निवड करावी असे शासनाने जारी केलेल्या निर्णयात म्हटले आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद नोकरभरतीत मौखीक परीक्षा घेतली जाणार नाही. (प्रतिनिधी)