शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद नोकर भरतीत तोंडी परीक्षा बाद

By admin | Updated: September 4, 2014 23:28 IST

जिल्हा परिषदेतील गट ‘ब’ आणि गट ‘क’ मधील अराजपत्रीत पद भरती करताना उमेदवारांची मौखीक परीक्षा न घेता लेखी परीक्षेतील त्यांच्या गुणवत्तेनुसार निवड सुची तयार करून पद भरतीची प्रक्रिया

शासन निर्णय : गैरप्रकाराला आळा बसणारअमरावती : जिल्हा परिषदेतील गट ‘ब’ आणि गट ‘क’ मधील अराजपत्रीत पद भरती करताना उमेदवारांची मौखीक परीक्षा न घेता लेखी परीक्षेतील त्यांच्या गुणवत्तेनुसार निवड सुची तयार करून पद भरतीची प्रक्रिया करण्याबाबतचा निर्णय राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे खऱ्या अर्थाने तयारी करून वरील पदाकरिता परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना याचा फायदा होणार आहे. याशिवाय नोकर भरतीत होणाऱ्या गैरप्रकारांनाही आळा बसणार आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने १९ आॅक्टोबर २००७ रोजी भुतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट ‘क’ मधील लिपीकवर्गीय पदांकरीता मौखीक परीक्षा न घेता लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार निवड सुची तयार करून पदभरती करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. याशिवाय २६ डिसेंबर २०११ ला सुद्धा शासनाने गट ‘क’ वर्गातील पदभरतीसाठी वरीलप्रमाणे निकष वापरण्याच्या सूचना पुन्हा देण्यात आल्या होत्या. याच शासन निर्णयात शासनाने दुरूस्ती करीत ५ जून २०१४ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयात गट ‘क’ आणि गट ‘ब’ अराजपत्रीत मधील कुठल्याही पदाकरिता उमेदवारांची निवड करताना मौखीक परीक्षा मुलाखती घेऊ नये असे स्पष्टेपणे नमूद केले आहे. त्याऐवजी या पदांकरिता उमेदवार निवडताना त्यांची २०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात यावी त्या परीक्षेत प्राप्त गुणाच्या आधारे निवड सुची तयार करून त्यांची गुणवत्तेनुसार शिफारस करण्यात यावी. ज्या पदांसाठी लेखी परीक्षा व व्यावसायिक चाचणी घेणे आवश्यक असेल अशा पदांसाठी १२० गुणांची लेखी परीक्षा आणि ८० गुणांची व्यावसायिक चाचणी अशी गुण विभागणी करावी. सुतार, गवंडी, वाहन चालक अशा शालांत परीक्षा उत्तीर्ण पेक्षा कमी अर्हता आवश्यक असणाऱ्या पदांसाठी ६० गुणांची व्यावसायिक, चाचणी आणि ४० गुणाची शारीरिक चाचणी घेऊन त्यांची निवड करावी. ज्या पदासाठी शारीरिक क्षमता चाचणीची गरज नाही अशा पदांसाठी शंभर गुणाची व्यावसायिक चाचणी घेऊन उमेदवारांची निवड करावी असे शासनाने जारी केलेल्या निर्णयात म्हटले आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद नोकरभरतीत मौखीक परीक्षा घेतली जाणार नाही. (प्रतिनिधी)