शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

स्वच्छ सर्वेक्षणापश्चात ‘संशयकल्लोळ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2017 01:23 IST

शहरातील स्वच्छतेचे मूल्यांकन करुन औरंगाबादेस तपासणीसाठी गेलेल्या ‘क्यूसीआय’ पथकाला

निकालाकडे लक्ष : लाचखोरीचे गालबोट, महापालिका यंत्रणेला होणार विचारणा अमरावती : शहरातील स्वच्छतेचे मूल्यांकन करुन औरंगाबादेस तपासणीसाठी गेलेल्या ‘क्यूसीआय’ पथकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्याने सर्वेक्षणापश्चात संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी अभियानाला गालबोट लावण्याचे काम करणाऱ्या लाचखोर सर्वेक्षण पथकाच्या कारनाम्याचा अहवाल नगरविकास विभागाच्या प्रधानसचिवांसह केंद्रसरकारकडे पोहोचता करण्यात आला आहे. औरंगाबादेपूर्वी यापथकाने ज्या शहरांची तपासणी केली तेथे असा काही प्रकार घडला का, याबाबत चाचपणीचे संकेत मिळाल्याने संशयाला वाव मिळाला आहे. स्वच्छ सर्वेक्षण-२०१७ अंतर्गत शहराची स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापन व अन्य अनुषंगिक बाबी तपासणीसाठी ‘क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडिया’चे त्रिसदस्यीय पथक १७ ते १९ जानेवारीदरम्यान शहरात होते. यापथकात ‘चिफ असेसर’ चारूदत्त पाठक यांच्यासह विजय जोशी आणि गोविंद घिमिर यांचा समावेश होता. स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशपातळीवर घेण्यात येत असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत ५०० शहरांचे स्वच्छताविषयक मूल्यांकन केले जात आहे. ४ जानेवारी ते ४ फेब्रुवारी या कालावधीत स्वच्छ शहराची तपासणी करण्याचे नियोजन ‘क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडिया’ने केले आहे. कौन्सिलने सूरत येथिल ‘न्यू स्टार डॉट कॉम’ कंपनीला विविध शहरांनी केलेल्या कामांचे मूल्यमापन करून संपूर्ण अहवाल केंद्र सरकारला सादर करण्याचे कंत्राट दिले आहे. त्यानुसार पाठक, जोशी आणि गिरामे अमरावतीत आले होते. १९ जानेवारीला यापथकातील चारूदत्त पाठक वगळता विजय जोशी आणि गोविंद घिमिर हे अमरावतीची तपासणी आटोपून औरंगाबादला गेले. तेथे जोशी आणि घिमिर यांच्यासह ‘न्यू स्टार डॉट कॉम’ कंपनीचे वरिष्ठ सहायक शैलेश बंजानिया यांनी औरंगाबाद शहर स्वच्छतेचे मूल्यांकन केले. ‘निगेटिव्ह मार्किंग’चा धाक दाखवून स्वच्छ शहरांच्या यादीत पहिल्या २०मध्ये यायचे असेल तर अडीच लाख रूपये द्यावे लागतील, अशी थेट मागणी बंजानिया यांनी स्वच्छता अभिायनाच्या प्रमुख जयश्री कुलकर्णी यांचेकडे केली. प्रकरण पीएमओंकडे स्वच्छ भारत अभियानांतर्गत सर्वेक्षण आणि मूल्यमापनाच्या कामातील लाचखोरीच्या प्रकरणाची गंभीर दखल केंद्र सरकारने घेतली आहे. हेप्रकरण आता पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचले असून त्यात कठोर कारवाईचे संकेत आहेत. स्वच्छ अभियान मिशनचे प्रमुख आणि केंद्र सरकारचे सहसचिव प्रवीण प्रकाश यांनीही याप्रकाराची दखल घेतली आहे. यापथकातील दोघांनी औरंगाबादपूर्वी अमरावती शहराचे मूल्यांकन केल्याने त्या मूल्यांकनावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहे.