शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ सर्वेक्षणापश्चात ‘संशयकल्लोळ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2017 01:23 IST

शहरातील स्वच्छतेचे मूल्यांकन करुन औरंगाबादेस तपासणीसाठी गेलेल्या ‘क्यूसीआय’ पथकाला

निकालाकडे लक्ष : लाचखोरीचे गालबोट, महापालिका यंत्रणेला होणार विचारणा अमरावती : शहरातील स्वच्छतेचे मूल्यांकन करुन औरंगाबादेस तपासणीसाठी गेलेल्या ‘क्यूसीआय’ पथकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्याने सर्वेक्षणापश्चात संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी अभियानाला गालबोट लावण्याचे काम करणाऱ्या लाचखोर सर्वेक्षण पथकाच्या कारनाम्याचा अहवाल नगरविकास विभागाच्या प्रधानसचिवांसह केंद्रसरकारकडे पोहोचता करण्यात आला आहे. औरंगाबादेपूर्वी यापथकाने ज्या शहरांची तपासणी केली तेथे असा काही प्रकार घडला का, याबाबत चाचपणीचे संकेत मिळाल्याने संशयाला वाव मिळाला आहे. स्वच्छ सर्वेक्षण-२०१७ अंतर्गत शहराची स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापन व अन्य अनुषंगिक बाबी तपासणीसाठी ‘क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडिया’चे त्रिसदस्यीय पथक १७ ते १९ जानेवारीदरम्यान शहरात होते. यापथकात ‘चिफ असेसर’ चारूदत्त पाठक यांच्यासह विजय जोशी आणि गोविंद घिमिर यांचा समावेश होता. स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशपातळीवर घेण्यात येत असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत ५०० शहरांचे स्वच्छताविषयक मूल्यांकन केले जात आहे. ४ जानेवारी ते ४ फेब्रुवारी या कालावधीत स्वच्छ शहराची तपासणी करण्याचे नियोजन ‘क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडिया’ने केले आहे. कौन्सिलने सूरत येथिल ‘न्यू स्टार डॉट कॉम’ कंपनीला विविध शहरांनी केलेल्या कामांचे मूल्यमापन करून संपूर्ण अहवाल केंद्र सरकारला सादर करण्याचे कंत्राट दिले आहे. त्यानुसार पाठक, जोशी आणि गिरामे अमरावतीत आले होते. १९ जानेवारीला यापथकातील चारूदत्त पाठक वगळता विजय जोशी आणि गोविंद घिमिर हे अमरावतीची तपासणी आटोपून औरंगाबादला गेले. तेथे जोशी आणि घिमिर यांच्यासह ‘न्यू स्टार डॉट कॉम’ कंपनीचे वरिष्ठ सहायक शैलेश बंजानिया यांनी औरंगाबाद शहर स्वच्छतेचे मूल्यांकन केले. ‘निगेटिव्ह मार्किंग’चा धाक दाखवून स्वच्छ शहरांच्या यादीत पहिल्या २०मध्ये यायचे असेल तर अडीच लाख रूपये द्यावे लागतील, अशी थेट मागणी बंजानिया यांनी स्वच्छता अभिायनाच्या प्रमुख जयश्री कुलकर्णी यांचेकडे केली. प्रकरण पीएमओंकडे स्वच्छ भारत अभियानांतर्गत सर्वेक्षण आणि मूल्यमापनाच्या कामातील लाचखोरीच्या प्रकरणाची गंभीर दखल केंद्र सरकारने घेतली आहे. हेप्रकरण आता पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचले असून त्यात कठोर कारवाईचे संकेत आहेत. स्वच्छ अभियान मिशनचे प्रमुख आणि केंद्र सरकारचे सहसचिव प्रवीण प्रकाश यांनीही याप्रकाराची दखल घेतली आहे. यापथकातील दोघांनी औरंगाबादपूर्वी अमरावती शहराचे मूल्यांकन केल्याने त्या मूल्यांकनावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहे.